Translate

Thursday, December 30, 2010

डीएम, सीएम, पीएम सॉब सुनिए- ये किसान कुछ कह रहा है

हमारे देश में धरातल पर समस्याएं कुछ और होती हैं, योजनाकार कुछ और योजना बना देते हैं और ऊपर से हल कुछ और सुझाया जाता है। इस स्थिति में समाधान ही समस्या बन जाता है। सरकारी योजनाओं के नाकाम होने का मुख्य कारण होता है योजनाकारों का आम लोगों से नहीं जुड़ना। दैनिक भास्कर डॉट कॉम लोगों के विचारों, उनकी समस्याओं को इन योजनाकारों तक पहुंचाने का एक प्रयास कर रहा है। हम अपने पाठकों के विचारों को, उनकी समस्याओं, उनके सुझावों को वेबसाइट पर प्रकाशित कर रहे हैं।
इस कड़ी में हमें पहला लेख राजस्थान के एक गांव से एक किसान का मिला है। हरविंदर बरार यूं तो किसान हैं लेकिन खुद को अपडेट रखने के लिए वो ब्रॉडबैंड से जुड़े हैं।
 
पढ़िए हरविंदर का यह लेख          
भारत में ग्रामीण कल्याण के लिए बनने वाली सरकारी योजनाओं के बारे 
में आम राय यह है कि वो शुरु तो गंगा की तरह होती हैं लेकिन गांवों तक 

Wednesday, December 29, 2010

काळे अठरा अध्याय असलेल्या आपल्या महान लोकशाही देशाला तरी म्हणतात मेरा देश महान!!

१) आपण अश्या देशात राहतो जेथे भारतातील देश बांधवाना  मदत करणे हा गुन्हा आहे तर देश बांधवाना लुटणे हा इंडियन सत्ताधाऱ्यांचा हक्क आहे.
२) आपण अश्या देशात राहतो जेथे भ्रष्ट्राचार, बेईमानी, भूखंड ,शिक्षण माफिया बाहुबली गुंड  हे सत्ताधारी होतात आणि समाजसेवक जेल मध्ये सडतात.
३) आपण अश्या देशात राहतो जेथे १९४७ पासून लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवताना भ्रष्ट्राचारी बेईमान देशद्रोही यांना जाहीर फाशी देण्याची पंतप्रधान घोषणा करतात पण तेच भ्रष्ट्र लोक सत्ताधारी होतात.

Friday, December 24, 2010

डोंगरदऱ्यांनी फुलविलेली ‘कविता’

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=124022:2010-12-23-18-03-47&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194


Wednesday, December 22, 2010

one set of footprints

          
                                                

Tuesday, December 21, 2010

प्रधानमंत्री लालू राष्ट्र परिधान:- धोती कुर्ता

  लालू प्रसाद यादव को तो सभी जानते हैं। वो वही करते हैं जो उन्हें अच्छा लगता है। अब अगर उन्हें देश का प्रधानमंत्री बना दिया जाए तो भारत का तो नक्शा ही बदल जाएगा। और नक्शा बदले या न बदले कुछ तो बदलाव होंगे ही। इन बदलावों पर जरा अपनी नजरें इनायत करें:-
राष्ट्र परिधान:- धोती कुर्ता
राष्ट्र पेय:- ताजा भैंस का दूध

Friday, December 17, 2010

विकीलीक्स अहिंसेच्या मार्गा पेक्षा अधिक परिणामकारक आहे

बेईमानी, सरकारी देश  विदेश पातळी  जागतिक खोटे व्यवहार, महाकाय उत्पादक कंपन्याची भ्रष्ट्र नीती, अन्याय, अमेरिकेची मुजोरी, जनतेची फसवणूक   या  विरुद्ध अनेक पातळ्यावर लढा नेहमीच लढला जातो. नक्षलवादी,माओवादी ते लादेन यांनी प्रस्थापित शासनाच्या विरोधात  सशस्त्र , गामिनी लढा उभारला आहे. तो जायज का नजायज हा मुद्दा गौण आहे. जेंव्हा प्रस्थापित यंत्रणा अन्यायाची परिसीमा ओलांडते आणि या शासन संस्थे मध्ये आपणास न्याय

Saturday, December 11, 2010

ते काम बिहारच्या नितीश कुमारने अंमलात आणले

सत्याच्या प्रयोगवाल्या वाल्या गांधीचा रात्रंदिवस जप करत भारतात भ्रष्ट्राचाराची गंगा निर्माण करणाऱ्या कॉंग्रेस ने भ्रष्ट्राचारा विरुद्ध कायदे अमलात आणले नाही  फक्त लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवताना  भ्रष्ट्राचार काळा बझार करणाऱ्यांना जाहीरपणे  घोषणा केल्या.पण कांहीच कार्यवाई केली नाही उलट त्यांना साथ दिली.........     . ते काम बिहारच्या नितीश कुमारने अंमलात आणून भ्रष्ट्र अधिकाऱ्याची अलिशान घरे जप्त करून त्यात शाळा सुरु करण्याचे काम सुरु केले.आमदारांच्या मलिद्यावरही कुऱ्हाड! नितीश भाई आगे बढो देश तुम्हारे साथ है.चारा खाऊ लालू आत्ता तरी नितीशच्या विजयाचे रहस्य समजले का?

फ्रिमॉन्ट् , हेवर्ड , बिजिंग ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे."



' मेरा भारत महान '
" बघतोस काय ? मुजरा कर .....! "
बघतोस काय रागाने , ओव्हरटेक केलंय वाघाने!
" बघ माझी आठवण येते का ?"
" पाहतेस काय प्रेमात पडशील "
"साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस."
अं हं. घाई करायची नाही.
तुमच्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही
" गपगुमान माझ्या मागं मागं सांग-लीला येतीस का ?"

Tuesday, December 7, 2010

अविनाश वाचस्पति: निकम्‍मी नहीं, लुटेरी है सरकार

अविनाश वाचस्पति: निकम्‍मी नहीं, लुटेरी है सरकार

It Happens Only In India

It Happens Only In India भ्रष्ट्राचार की देशभर में जोरशोर से बाते हो रही बाते, कोर्ट का इसके खिलाफ कड़ा रुख, अनेक घोटाले में घिरी सरकार जनता का गुस्सा देखकर सब बौखलाए गये है ! इन सबपर से जनता का ध्यान दूसरी और लगाने के लिये क्या ये बोम्ब स्फोट कराये गये क्या? इसके बरे में जाँच होनी चाहिए ! क्योंकि भारत में कुछ भी हॊ सकता है
देशात गाजत असलेल्या भ्रष्ट्राचाराच्या मुद्या वरून जनतेचे लक्ष उडवण्या करता हा स्फोट घडवून आणला गेला का? या दृष्टीने सुद्धा तपास होणे आवश्यक आहे. जनतेचा भ्रष्ट्राचारा विरुद्धचा संताप, न्यायालयाचे भ्रष्ट्र व्यवहारा विरूद्धचे धोरण, दक्षता आयोगाचे भ्रष्ट्र थामस, लावासा, आदर्श प्रकरण  या सर्व भ्रष्ट्र व्यवहारात अडकलेले केंद्र, राज्य  सरकार मंत्री, नोकरशाही यांच्या विरुद्ध जनतेच्या मनात राग निर्माण झाला या सर्व प्रकरणान वरून जनतेचे लक्ष उडवण्या करता राजकारणी कांही हि करतात  it happens only in india !!



Sunday, December 5, 2010

भ्रष्ट्र राज्यकर्त्यांचे भ्रष्ट्र राज्यकर्त्यांच्या भ्रष्ट्राचारा साठी फक्त जनते कडून निवडलेले शासन- लोकशाही - ठणठणपाळ Quotes


विकीलीक्स ने जे गुप्त कागद पत्रे उघड केली हे कृत्य गुन्हेगारी स्वरूपाचे आहे असे म्हणत  आज अमेरिका बोंब मारत आहे आणि ही साईट बंद करण्या करता आकाश पाताळ एक करत आहे.सर्व्हर कंपनीवर दबाब आणण्या पासून ते अनेक देशा वर जेथून ही साईट प्रसिद्ध होते त्यांना धमकावण्याचे प्रकार चालू केले. पण या साईट चे व्यवस्थापन अमेरिकेला पुरून उरले आहे.रोज नवीन बोंब फुटत आहेत जे अणुबॉम्ब पेक्षा भयानक संहारक आहेत. पण एक मात्र बरे आहे सामान्य जनतेच्या मालमत्तेचे,जीवाचे कांही नुकसान होत नाही. याबाबत दैनिक भास्कर या हिंदी वर्तमान पत्रात खूप माहिती आली आहे, http://www.bhaskar.com/article/INT-indias-response-to-disclosures-mature-u-1615928.html?HT1=  ती वाचण्या सारखी आहे.

Friday, December 3, 2010

तेंव्हा कोठे गेला होता अमेरीकानसुता तुझा धर्म ?


शोध पत्रकारीता हा प्रकार आजच्या बाजारू वर्तमानपत्राच्या जगात जवळपास नष्ट झाल्यातच जमा झाला आहे. आज वर्तमान पत्रातील बातम्यावर लहान पोर ही विश्वास ठेवत नाही. कारण प्रत्येक बातमी ही जवळपास पैसा देवूनच छापून आणावी लागते हे कटू सत्य आहे. आणि आजच्या वर्तमान पत्रात माजी मुख्यमंत्र्याच्या  शब्दात सांगायचे तर  विकतची बातमी छापून आणण्याची कुवत  फक्त राजकारणी, बिल्डर आणि काळा धंदा करणाऱ्याचीच आहे. ती  सामान्य माणूस आणि समाज सेवा करणाऱ्यात नाही.
म्हणूनच जेंव्हा विकीलीक्स सारखे माध्यम नेट वरून अमेरिकेचा त्याच्या दुपट्टी वागण्याचा दहशदवादाचा सभ्य बुरखा लाखो सरकारी गुपित कागद पत्रे जीवाची पर्वा न करता प्रसिद्ध करत टराटरा फाडते तेंव्हा साहजिकच त्या माणसाला प्रणाम करावे लागते.
अमेरिके सारख्या बलाढ्य सत्तेशी आज युद्ध करण्याची कोणाची ताकद नाही. पण त्याच बरोबर अमेरिका आणि त्याच्या महाकाय कंपन्यांना जगातील सर्वजण त्रासून गेले आहे, हे उघड बोलण्याची त्यांच्याशी सामना करण्याची हिम्मत कोणी करत नाही. आणि जर त्यांना विरोध झालाच तर साम, दाम, भेद दंड करून त्याला जगातून नाहीसा करण्याचे कट कारस्थान अमेरिकन सरकार आणि  या महाकाय कंपन्या अमेरिकन गुप्तहेर संघटना तसेच  जगभरात असलेल्या अमेरिकन राजकीय दुतवासाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करत असतात  याला  अमेरिकन अध्यक्ष सुद्धा बळी पडले आहेत . यांना पुरून उरला तो फक्त A revolution is not a bed of roses. म्हणणारा  फिडेल केस्ट्रो क्युबा , अमेरिकन गुप्तहेर संघटनेने याला मारण्यासाठी शेकडो वेळा प्रयत्न केले पण तो यांना पुरून उरला आणि आज त्या  संघटने  सुद्धा हे केलेले कट कारस्थाना चे प्रयत्न मोजण्याचे  सोडून दिले आहे.
आज अमेरिकेला हारवण्या साठी प्रत्यक्ष युद्ध न करता त्याच्यावर दहशदवादी हल्ले करण्याचे आणि त्यास धडा शिकवण्याचे तंत्र आणि मंत्र त्याच्या शत्रूंनी अवलबंण्यास सुरुवात केली आहे. जे  शिवाजी महाराजांनी ४०० वर्षा पूर्वी महाराष्ट्रात मोगलांना हरवण्या साठी वापरून औरंगजेबला येथेच प्राण ठेवण्यास मजबूर केले.
11/09/2001 च्या आंतकी हल्ल्यातून अमेरिका सावरत असतानाच हा सरकारी बेईमानीची गुपित माहिती उघड करण्याचा हल्ला अमेरिकेवर झाला. यावरून माहितीच्या अधिकाराचे महत्व किती मोठ्या प्रमाणात आहे हे लक्षात येते. या हल्ल्यात संपूर्ण अमेरिकन सरकारच जायबंदी झाले आहे. संगणक क्रांती मुळे सरकारी फाईली मधून बाहेर पडलेले हे माहितीचे भूत आता अमेरिकन दहशदवादाच्या मुळावरच घाव घालत आहे. या हल्ल्याला कसे सामोरे जावे, याचा कसा प्रतिकार करावा असा संभ्रम अमेरिकन सरकारला पडला , आणि यातूनच हा हल्ला सर्व जगभरावर आहे म्हणत नेहमी प्रमाणे हा सर्व जगाचा प्रश्न आहे म्हणत  गोबेल्स ला लाजवेल  असा प्रचार अमेरिकेने सुरु केला.
सरकारी गुपित माहिती उघड करणे हे नैतिक नाही अशी भलावण हे अनैतिक शासन करत आहे. बेईमानी करत भ्रष्ट्राचार करत स्वतः च्या स्वार्था साठी  जगाला वेठीस धरत असताना, तेंव्हा कोठे गेला होता अमेरीकानसुता तुझा धर्म ? असा प्रश्न विचारावासा वाटतो.हे माहिती उघड करणे  नैतिक का अनैतिक  त्या बद्दल पुढील भागात चर्चा करुत.
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:- http://www.thanthanpal.blogspot.com

Wednesday, December 1, 2010

ठणठणपाळ उवाच !! ठणठणपाळ उवाच !!

कोकण किनाऱ्यावरील जैतापूर नागरी अणुऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याच्यादृष्टीने फ्रान्सचे अध्यक्ष निकोल्स सार्कोझी यांच्या आगामी भारत दौऱ्यात पुढचे पाऊल पडणार असून, "त्या संदर्भात समझोत्यावर स्वाक्षऱ्या होतील,
ठणठणपाळ उवाच :-फ्रान्सचे अध्यक्ष निकोल्स सार्कोझी यांच्या आगामी भारत दौऱ्यात जैतापूर प्रकल्प- करार होणार, अमेरिकन अध्यक्ष भारत दोऱ्यावर येण्या आधी अणुकराराच्या सर्व अटी मान्य करत ओबामांच्या भेटीत अणुकरार सह्या . या सरकारच्या काम करण्याच्या पद्धतीवरून हे भारत सरकार भारतीय जनते करता काम करत आहे का आंतरराष्ट्रीय कंपन्यान चे दलाल म्हणून काम करत आहे हा प्रश्न निर्माण होतो. 
नवी दिल्ली- "मालन्यूट्रिशन'ला हिंदीत काय म्हणतात...? कुपोषणविरोधी मोहिमेचा "ब्रॅंड ऍम्बेसिडर' म्हणून झेंडा खांद्यावर घ्यायला आलेल्या आमीर खानला पहिल्याच दिवशी प्रश्‍न पडला. संसदेबाहेर आमीरच्या या प्रश्‍नाने कुपोषणविरोधी मोहिमेचे कुपोषण होते की काय, अशी शंकेची पाल उपस्थितांच्या मनात चुकचुकली.
ठणठणपाळ उवाच :-कुपोषणविरोधी मोहिमेचा "ब्रॅंड ऍम्बेसिडर' म्हणून अभय बंग आणि राणी बंग या डॉक्टर दांपत्य यांच्या शिवाय दुसरा कोणी योग्य नाही. पण आपले नौटंकी राजकारणी सरकार यांचा काम करण्या पेक्षा नौटंकी करणाऱ्यावरच जास्त भर असल्यामुळे तद्दन फिल्मी नट नट्यांना राजदूत म्हणून नेमून संसदेत हि तमाशा केला जातो आणि या बाजारू संस्कृती मुळे चांगल्या  योजनेचे हसे होते ते वेगळे.
आयडॉल्सना 'रेस' भोवली! 
ठणठणपाळ उवाच :-हे आमचे नकली आयडॉल्स ज्यांना आम्ही मुर्खा सारखे डोक्यावर घेवून नाचतो. योगायोगाने किंवा अचानक मिळालेले यश पचवण्याची ताकद असावी लागते. नाही तर गाढवाने वाघाचे कातडे पांघरले तरि गाढव हे गाढवच राहते अशी गत होण्यास वेळ लागत नाही.



Raja disregarded PM's advice, govt tells SC

                     भ्रष्ट्राचार के तीन दलाल नेता, मिडिया और नोकरशहा!!!!!!!!
       "ये सरकार आकंठ भ्रष्टाचारमें डूबी है,''  दूरसंचार खात्याचे सचिव असलेल्या 60 वर्षीय थॉमस यांची पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नुकतीच केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून नेमणूक केली होती. तसेच, ते केरळ सरकारमध्ये असताना झालेल्या पामोलिन घोटाळ्याच्या आरोपपत्रातही त्यांचे नाव होते. राजीनामानाट्यानंतर आक्रमक झालेल्या मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी दिल्लीतील पत्रकारांमार्फत विलासराव देशमुखांना गोवण्याचा प्रयत्न केल्यामुळे संतप्त विलासरावांनी आज उघडपणे अशोक चव्हाणांना "आदर्श' प्रकरणात जबाबदार ठरवले आहे. लवासा हिल सिटीला केंदीय पर्यावरण मंत्रालयाने गेल्या आठवड्यात कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. लवासा उभारताना पर्यावरण मंत्रालयाची परवानगी घेण्यात आलेली नाही.
स्पेक्ट्रम २जी वाटपानंतर कॉर्पोरेट क्षेत्रातील नीरा राडिया यांनी अनेक उद्योजक, राजकारणी आणि पत्रकारांशी केलेले संभाषण काही मासिकांनी उघड केल्यानंतर झालेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी केंद्राने या टेप प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. काँग्रेस पक्षातील काही नेते काँग्रेस-डीएमके युतीला हादरा देण्याच्या प्रयत्नात आहे, असल्याचा गौप्यस्फोट तामिळनाडूचे मुख्यमंत्री ए. करुणानिधी यांनी आज केला.

Friday, November 26, 2010

अब तो जेजस ख्राईस्ट को ही कुछ करने के लिए मन्नत मंगनी पड़ेगी

नही मेरे लाल उन्होंने तुम्हे नही मुझे गंदा कहा. फ़िलहाल अपन खामोश रहेंगे. क्योंकि जनता नामक  शनि ग्रह हमारे जनम कुंडली में आया है,  और उसके कोप से बिहार में अपनका बहोत नुकसान हुवा मगर मुझे उससे ज्यादा दुःख: उसने राहुलबाबा को भी नाकाम बनाया इसका है. अब तो जेजस ख्राईस्ट को ही कुछ करने के लिए मन्नत मंगनी पड़ेगी 

सांप को पिंजरे में कैद नहीं किया जाता

हमारे प्रधान्संत्री मंदमोहन जी की मंद बुद्धि देखिये - सांप को पिंजरे में कैद करने के लिये पोर्कियो को बोल रहे हैं अमरीकी दवाब में !

हमारे प्रधान्संत्री जी बोल रहे हैं की २६/११ के अपराधियों को सजा देंगे... कोई उनसे पूछे कब सजा देंगे? शायद जब ३-४ और आतंकवादी हमले हो जायेंगे ? कसाब को सरकारी दामाद क्यों बना कर रखा हैं अभी तक? अब क्या अमरीकी निर्देश की प्रतीक्षा हो रही हैं ?ये कैसा आया है दौर........
देश हांकते सारे चोर........जिसको नहीं देश का ज्ञान.. उस राहुल को कहे महान.......
चापलूस दे दे कर पैसा  टीवी पर उसे बताते नेता

कुल मजदूरी जिसकी चार ......घूम फिर कर पूरा बिहार .....
टीवी वाले कहै राजकुमार .....मीडिया तो पैसे का यार ...
कोई मंदमोहन को बताये की सांप को पिंजरे में कैद नहीं किया जाता ! जहरीले सांपो को कुचला जाता हैं मंद बुद्धि मंदमोहन जी !

Thursday, November 25, 2010

पैसा सर्वस्व नाही...!

पैसा सर्वस्व नाही...!

1923 मध्ये जगातील आठ सर्वात श्रीमंत व्यक्ती एकत्र भेटल्या.त्यांची एकत्रित संपत्ती;त्या वेळच्या अमेरिकन सरकारच्या संपत्तीपेक्षा अधिक होती,असा अंदाज होता.अर्थातच संपत्ती कशी कमवायची,हे या लोकांना चांगलं माहीत होतं.पण 25 वर्षाँनंतर त्यांचं काय झालं ते पहा.

1.पोलादनिर्मिती क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपनीचा अध्यक्ष चार्ल्स श्वाब उधार भांडवलावर 5 वर्षे जगला आणि नंतर दिवाळखोर होऊन मरण पावला.
2.सर्वात मोठ्या पेट्रोलियम कंपनीचा अध्यक्ष हॉवर्ड हब्सन याला वेड लागलं.
3.सर्वात मोठा व्यापारी आर्थर क्युटन दिवाळखोर होऊन मेला.
4.न्युयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा अध्यक्ष रिचर्ड व्हिटनी याला तुरुंगात जावं लागलं.
5.आयुष्याचे शेवटचे दिवस घरी घालवायला मिळावे,म्हणून अमेरिकेच्या मंत्रिमंडळाचे एक सदस्य अल्बर्ट फॉल यांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली.
6.वॉल स्ट्रीटवरचा सर्वात मोठा शेअरदलाल जेसी लीव्हमोर याने आत्महत्या केली.
7.काडेपेटीच्या उत्पादनात जगात आपली मक्तेदारी निर्माण करणारे आयव्हर क्रूगर यांनी आत्महत्या केली.
8.'बॅँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेँट'चे अध्यक्ष लिऑन फ्रेझर यांनी आत्महत्या केली.
(संदर्भ-शिव खेरा यांचं 'यश तुमच्या हातात')

Jack and Jill (nursery rhyme) BIHAR RHYME

soniya and rahul went in the bihar to fetch a pail of votes 
rahul fell down and broke his crown 
and soniya came tumbling after.



लगा बिहार में दाग छुपावुं कैसे बिहार जावूँ कैसे. चुनाव

लागा चुनरी में दाग छुपाऊँ कैसे  
चुनरी में दाग छुपाऊँ कैसे घर जाऊँ कैसे
हो गयी मैली मोरी चुनरिया कोरे बदन सी कोरी चुनरिया
जाके बाबुल से नजरें मिलाऊँ कैसे घर जाऊँ कैसे
 लगा बिहार में दाग छुपावुं कैसे बिहार जावूँ कैसे. चुनाव जितना ये काम मिडिया के सामने प्लास्टिक घमेले में प्लास्टिक पत्थर रखकर सफ़ेद कपडे को मिटटी का दाग भी न लगाते शूटिग कराने इतना आसन काम नही. ये राहुल जान गये होंगे.

Friday, November 5, 2010

आदर्श सोसायटी से लेकर राजीव गाँधी ( या और कोई गाँधी,नेहरू ) झोपड़पट्टी तक सब अवेध बेकायदा है तब मिठाईयों की दुकाने को ही लायसन्स लेना  क्या जरुरी है?
रागावण्याचे कारण काय?
ओबामा उद्या मुंबईत आमंत्रित मंत्र्यांनी त्या फॉर्मद्वारे पॅन क्रमांक,  छायाचित्र, पासपोर्ट क्रमांक आदी माहिती कळवावी अशी अमेरिकी वकिलातीची  अपेक्षा आहे. आपल्या महान नेत्यांची आदर्श कामगिरी सातासमुद्रापार  पोहचल्याने कोणीही अशी दक्षता घेईल. आबांनी नाही का ओळखपत्र असल्याशिवाय  स्टेज वर कोणालाही येवू-देवू नये म्हणून आदेश काढला.
 
राज यानी कडोंमपा च्या विजया नंतर त्वरित आपला  रंग दाखवत पुढील मुक्ताफळे उधळली . आणि   ..... ‘ आदर्श ’ प्रकरणात पहिल्यांदाच जाहिर प्रतिक्रिया देताना हें प्रकरण मुख्यमंत्र्या विरूद्धचे षड्यंत्र असण्याची शक्यता व्यक्त केली. 

Saturday, October 30, 2010

नवीन ग्राफिटी

नवीन ग्राफिटी
ज्यादा आदर्शवादी होना अशोकराव के जैसा  महंगा पड़ता है !
अशोकराव का हश्र देखते हुवे , आदर्श कुछ काम का नही!
आदर्श सोसायटी मुळे आदर्श शब्दाची व्याख्याच बदलली .
सासू  बद्दल आदर्श दाखवण पण महागात पडत.
सासू वरचढ  हायकमांड !
आदर्शवादी असाल तर सासुरवास अटळ आहे!
मैने ऐसा आदर्श तो कहा नही. महात्मा.
सावत्र आई असो की सख्खी सासू , वनवास अटळ आहे! 

ये नैतिकता भी अजीब चीज है भाई ! वैसे तो सभी नेता भ्रष्ट्र है, मगर जो भी  नेता भ्रष्ट्राचार , भूखंड घपले में पद से निकाला जाता तब वह नैतिकता के  ढोल पिटते हुवे राजीनामा देता है. मगर ये नैतिकता जब वो पद पर बने रहता तब कंहा खो जाती समज में नही आता.

सुप्रीम कोर्ट की टिपण्णी से और गुनहगार को बरी करनेसे समाज में गलत सन्देश जायेगा. बेंच ने रिश्वतखोर को बरी कीया ! बड़ी मछली सरकार पकड़ती नही और छोटी मचलियों  को सुप्रीम कोर्ट बरी कर दे रहा है ! जय हो भ्रष्ट्राचार की जय हो! ऐसा ही होते रहा तो देश को पाक जैसे दुश्मन की जरुरत नही. 

Saturday, October 23, 2010

अच्छा इस्तमाल मै बताता हुं. इस गुब्बरेको दिल्ही के लाल किल्ले पर बांधा जाये. और कॉम्मन वेल्थ खेलोमे जो घोटाला बेईमानी, भ्रष्ट्राचार हुवा इसका विवरण कलमाडी अन्ड शीला दीक्षित कंपनी के फोटो , कार्टून्स के साथ दुनियाको दिखाया जाय. उसपर रहमान का जय हो, और  गेम का थीम सोंग भी लिखा जाय. जनता को ये भारत का मानचिन्...ह बहोत अच्छा  लगेगा.१५ अगस्त को तिरंगे के साथ पुरी दुनिया ये गुब्बारा देखेगी तो गर्व करेगी !

Harish Joshi KBC में आपका स्वागत है!!!!
आपके लिए आखिरी एवं ५ करोड़ का सवाल ये रहा:
CWG २०१० के भ्रष्टाचार का नोबेल पुरष्कार इन्हें मिला है ..आपके विकल्प हैं ;
A ) सुरेश कलमाड़ी B ) शीला दीक्षित
C ) ललित भनोट D ) डॉ गिल

Saturday, October 16, 2010

वर्षाला 175 000 000 * 250 = 43 750 000 000 रुपयांचे तेल तूप जाळले जाते.

एकीकडे वस्तूंची टंचाई आणि दुसरी कडे परंपरा, चालीरीती या मुळे आपण वस्तूंचा योग्य वापर करण्या ऐवजी वस्तूंची नासाडीच जास्त करत असतो. पुरातन काळात वीज नसल्या मुळे रात्री प्रकाशा साठी तेला तुपाचे दिवे लावले जात असत. मोठ्यांच्या घरी यात उंची अत्तर मिसळून प्रकाशा बरोबर वातावरण सुगंधमय केले जात असे. पण सन १८८९ मध्ये विजेच्या दिव्याचा शोध एडिसन ने लावला आणि मानवी जीवनाच्या जगाच्या प्रकाशाचा इतिहासच बदलून गेला.

Friday, October 15, 2010

भिंतीना कान असतात . तसे माईक ला आवाजा बरोबर कान ही

राष्ट्रकुल स्पर्धा समाप्त होण्याच्या अखेरच्या दिवशी TV वाहिन्यांनी स्पर्धे दरम्यान स्वीकारलेली आचार संहिता ही समाप्त झाली . आणि ही खतम करण्यास आम्हीच भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले असा गोबेल्स ला ही लाजवेल असा खोटा प्रचार करून सत्ता राबवणाऱ्या कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र पक्षाध्यक्ष खुद्द कारणीभूत ठरले. कालचा दांडी यात्रा ते मेवाग्राम हा TV वाहिन्यांवरील तमाशा पहिल्या वर कांही खालील भारतीय म्हणी आठवल्या . आपणास अजून कांही आठवत असतील तर त्या लिहाव्यात .
१) तळे राखील तो पाणी चाखील
२) भिंतीना कान असतात . तसे माईक ला आवाजा बरोबर कान ही असतात (नवी म्हण) Sevagram near Wardha

Tuesday, October 12, 2010

आज पर्यंत मर्यादीत लोकांना उपलब्ध असलेला हा भ्रष्ट्राचाराचा अधिकार सर्वाना मिळेल

भारताच्या प्रमुख वर्तमान पत्रात खालील बातमी प्रसिद्ध झाली. आता खुद्द सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुद्धा भारतातील भ्रष्ट्राचाराने हतबल झाले आणि त्यांनी लाचेचे दर सरकारने ठरवून द्यावे अशी उपरोधिक सूचना सरकारला केली आहे.  सरकारी यंत्रणांमध्ये पैसे चारल्याशिवाय कोणतीही बाब पुढे सरकत नाही आणि खरे तर पैशाशिवाय या यंत्रणांमध्ये काहीही हलत नाही, हे सवोर्च्च न्यायालयाचे न्या. मार्कंडेय काटजू आणि टी. एस. ठाकूर यांचे निरीक्षण मन उद्विग्न करून टाकणारे आहे. 'सरकारने आता भ्रष्टाचाराला कायदेशीर मान्यताच देऊन टाकावी आणि कोणत्या प्रकरणी किती लाच घेतली जावी, याचे निकषही निश्चित करावेत, त्यामुळे किमान देशातील सामान्य नागरिकांना आपल्याला केव्हा किती लाच द्यावी लागेल, त्याचा अंदाज येईल आणि सौदेबाजीला आळा बसेल', असे उपरोधिक उद्गार या न्यायमूतीर्ंनी काढले आहेत. खरे तर आपल्या देशातील भ्रष्टाचाराची चर्चा अनेकवार झालेली आहे
 न्यायमूर्ती  यांनी हे उदगार उपरोधिकपणाने काढले असले तरी माझ्या सारख्या सामान्य माणसाला मात्र हा विचार पटला आहे. त्यास खालील कारणे आहेत 

Sunday, October 10, 2010

दसऱ्याचा उत्सव !!!

९० च्या दशका पर्यंत महाराष्ट्रात नवरात्रोत्सव दसऱ्याचा उत्सव हा घरोघरी घटस्थापना करून ब्रह्मांडातील आदिमायेची आश्विन महिन्यात नंदादीप तेवत ठेऊन मनोभावे पूजा करणे, नवमीच्या दिवशी देवीची महापूजा करून घरातच घटा पासून १०-१५ पावले चालत आईच्या नावे जोगवा मागून आणि दशमीच्या दिवशी सीमोल्लंघन करून शमीच्या वृक्षाची पूजा करत. आणि आपटयाची पाने सुवर्णमुद्रा म्हणून लुटण्याची पौराणिक काळापासून प्रचारात असलेली परंपरा पाळून दसरा व्ययक्तिक पातळीवर साजरा केला जात असे.......................
उपभोगवादी पुरुष संस्कृतीचा हा अत्त्याचार स्त्रिया सीता द्रोपती पासून युगानयुगे सहन करत आहे.

Saturday, October 9, 2010

तीर्थरूप दादां आई ना साष्टांग नमस्कार विनंती विशेष! ............. घरातील मोठ्यांना नमस्कार, लहान भावंडांना आशीर्वाद . कळावे लोभ असावा ही विनंती
आपला नम्र
अ ब क
एकेकाळी भारताच्या टपाल खात्याचे अभिन्न अंग असलेल्या पोस्ट कार्ड चे स्थान भारतीय कुटुंबात अनन्य साधारण होते
जिव्हाळ्याचे होते. ......READ MORE....http://www.thanthanpal.blogspot.com

Thursday, October 7, 2010

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्टुडंट्‌स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी)

या दोन्ही संघटनांमध्ये काही फरक नाही. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या आहेत. या दोन्ही संघटना विचाराने मूलभूततावादी आहेत, असे मत कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी येथे आज व्यक्त केले. सकाळ वर्तमान पत्र
मी संघ समर्थक नाही हे आधीच सांगतो. पण राहुलने संघा बद्दल जे अक्कलेचे तारे तोडले ते मात्र १०१% चुकीचे आहे. संघाच्या विचारसरणीला विरोध असू शकतो पण त्यांच्या देशभक्ती बदल संशय घेणे  म्हणजे वारांगना  ने  पतिव्रता स्त्री च्या चारित्र्या ची, शीला ची उठाठेव करण्या सारखे आहे.असे माझे ठाम मत  आहे. नजीकच्या काळात बिहार पासून बंगाल पर्यंतच्या निवडणुका डोळ्या समोर ठेवून मतांच्या लाचारी साठी हे विधान त्याने केले हे निश्चित .

Tuesday, October 5, 2010

पंतप्रधान वाजपेयी यांची गुप्त भेट, आणि युद्धाचे अवसान गळाले!!!


२००२ साली भारतीय संसदेवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी जेव्हा पाक सीमेवर आपले सैन्य उभे केले तेव्हा अमेरिकेने पडद्याआडच्या हालचालीने बंगलोरमधल्या अमेरिकेवर अवलंबून असलेल्या सॉफ्टवेअर व्यवसायाला वेठीस धरून संभावित युद्ध थांबविले. अमेरिकी अधिकाऱ्यांनी बंगलोरच्या कंपन्यांना गुप्तपणे इशारा दिला की, भारताने पाकिस्तानशी युद्ध सुरू केले तर अमेरिका भारताविरुद्ध इतर आर्थिक र्निबध तर घालेलच, पण त्याशिवाय भारताच्या हजारो, करोडो डॉलरच्या सॉफ्टवेअर व्यवहारावरही बंदी घालील. ही गोळी बरोबर लागू पडली. बंगलोर कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी तत्कालिन पंतप्रधान वाजपेयी यांची गुप्त भेट घेऊन अमेरिकेच्या इशाऱ्याची माहिती दिल्यावर भारताचे युद्धाचे अवसान गळाले, असा गौप्यस्फोट अमेरिकेच्या मीडियात नंतर केला गेला. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=105531:2010-10-04-17-15-08&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=१०
READ MORE 

Saturday, October 2, 2010

आयोध्या निकाला नंतरचे सामंजस्य

 आयोध्या निकाला नंतरचे सामंजस्य 

लोकांनी संयम वगैरे पाळला . अभिनंदनीय आहे. १९९२-९३ पेक्षा काही बाबतीत मॅच्युअर् झाला आहे.येथून पुढेही, ह्या विषयावर असेच सामंजस्य टिकुन राहण्यासाठी जे प्रयत्न सातत्याने घडणे आवश्यक आहे
या  सर्व बोलण्याच्या गोष्टी झाल्या . सरकारने आपले कणखर अस्तिव दाखवून दिल्या मुळे हे शक्य झाले. निकाला आधी हजारो गुंडा नेत्यांना स्थानबद्ध केल्या गेले होते, आणि जागोजागी बंदुकधारी अर्ध सैनिक , गावोगावी पोलीस संचालन , दिल्ही च्या जामामशीद च्या परीसरा पासून ते मंदिर परिसरात सैनिक गस्त चालू होती. या सर्वांमुळे आपण कांही आगलावे पणा केला तर सरळ जेल मध्ये रवानगी होईल हे मतलबी नेत्यांना  कळून चुकले. आणीबाणी नंतर देशात शासन नावाची गोष्ट अस्तिवात आहे हे प्रथमच जाणवले आणि याचा व्हायचा तोच परिणाम झाला. जनता नव्हे गुंड राजकारण्यांना हात चोळत गप्प बसावे लागले. जनतेला ना राम ना रहीम मध्ये रस आहे, त्यांना त्यांच्या रोजच्या रोजीरोटीची जास्त काळजी आहे. भारतात एक दीवस बंद झाला तर राजकारण्यांचे कांही वाकडे होत नाही पण ज्यांचे रोज कमावणे आणि प्रपंच चालवणे असते त्यांना उपाशी राहावे लागते.त्यांना कोणी फुकट जेवण आणून देत नाही,जसे नेत्यांना जेल मध्ये गेल्यावर सरकार यांचे चोचले पुरवत जेवण देते.
आजच  हळूहळू राजकारणी यांनी आपले आपले रंग दाखवण्यास सुरवात केली आहे. मतलबी राजकारण्यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याची भाषा सुरु केली आहे. कारण सामंजस्य राहिले तर यांची दुकानदारी बंद पडेल. आणि सरकारने निकाल ठरवून लावला असला तरी  देश हिता साठी ते आवश्यक होते. १९९२-९३ पेक्षा काही बाबतीत मॅच्युअर् झाला आहे. तसले कांही नाही. कायद्याच्या धसक्यानेच  सरळ  वागण्यास मिडिया  मजबूर झाला.

Sunday, September 26, 2010

भारतीय सैन्याचा इतिहास हा सत्ता हातात घेण्याचा नाही

आताच सकाळ पेपर मध्ये खालील बातमी वाचली. तशी TV वर सकाळी ११ वाजे पासूनच येत होती, पण TV ची बातमी म्हणजे सनसनीच असते.
नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी मुख्य जवाहरलाल नेहरु स्टेडियमबाहेर उभारण्यात आलेला पादचारी पूल कोसळल्यानंतर तो पुन्हा उभा करण्यासाठी दिल्ली सरकारने लष्कराला विनंती केली आहे.

प्रदूषणा चा विचार कोणत्याही प्रचंड संपत्ती जमा करणाऱ्या गणपती मंडळानी केला नाही.

गणपती उत्सव उत्साहात पार पडला . करोडोची माया गणपती मंडळानी जमा केली. ही संपत्ती कमी वाटली म्हणून की काय अजून जास्त पैसा जमा व्हावा म्हणून भक्तांनी देवाला अर्पण केलेल्या दागदागिन्यांचा जाहीर लिलाव मांडून अजून जास्त संपत्ती निर्माण केली .
लालबागच्या राजाच्या चरणावर अर्पण केलेल्या अनेक मौल्यवान वस्तूंची गेले दोन दिवस मोजदाद सुरू आहे. कुबेराचा खजिनाही फिका पडावा इतक्या सोन्या-चांदीच्या वस्तू लालबागच्या राजाच्या दरबारात जमा.अनेक ठिकाणी, निवासी वसतीत असलेला पन्ननास डेसिबलचा नियम तर धाब्यावर बसवताना आवाजाची पातळी १०० डेसिबल्स होती.


Thursday, September 23, 2010

सारे चानेल थकले गात कलमाडी भ्रष्ट्र गाथा

आता या अखेरच्या क्षणी राष्ट्रकुल'च्या गोंधळ सोडवायला पंतप्रधान धावले काय उपयोग? एक होवू शकते. सरकारी दूरदर्शन सोडून बाकी बातम्या देणाऱ्या TV  चनल वर बंदी घालावी.जशी बंदी आयोध्या निकाला करत्ता SMS वर घातली. आणि मग DD हे सरकारी बातमीपत्र खेळ कसे यशस्वी झाले, भव्य दिव्य झाले, भारत खेळ मध्ये जगातील पहिला  का त्याच्या आधीचा जो कोणता नंबर मिळवत खेळातील जगातील महासत्ता कशी झाला याचे २४ तास बातम्याचे दळण दळावे. हे पाहून भारतीयांची छाती अभिमानाने फुलेल सिर उंच उठेल.
जय देवा देवा जय कलमाडी देवा आरती उतारू खेळ खंडोबा देवा !
कॉमनवेल्थ खेळाला ला केले तू भ्रष्ट्र पैश्या चा मेवा. जय
उड्डाणे पूल तू अशी बांधसी देवा, वापरा आधी ती कोसळून धाराशाही होती देवा!
स्टेडीयम चे छत पावसाच्या पाण्याने गळी देवा!
खेलग्राम मध्ये डास वावर कुत्र्यांचा वावर मुक्त !
परदेशी खेळाडू होते भयभीत स्पर्धे आधी ,  करती नमस्कार माय भूमीतून देवा  !
5 करोड़ रुपए का थीम सांग पांच सेकंद ने नकारा देवा !
भ्रष्ट्राचार , धर्मांधता , भाषा दंगली त देश जळत होता !
दिल्हीत खेळाचा तमाशा रंगात होता!
आयोध्या निकाला चा खेळ रंगतो दरबारी जनता होते भयभीत सारी.
कलमाडी ना मात्र  चिंता पैश्याची  सारी
सारे चानेल थकले गात कलमाडी  भ्रष्ट्र  गाथा
आपण या सारख्या कविता लिहू शकता
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

Tuesday, September 21, 2010

आपला देश महान आहे. खरच विश्वास वाटत नाही?


आपला देश महान आहे. खरच विश्वास वाटत नाही? तर आजच्या वर्तमान पुढील  पत्रातील बातम्या वाचा. वर आस्मान  कधी नव्हे तर याच वेळी फाटले . गंगा , यमुना नद्यांनी गेल्या पन्नास वर्षात आपली सीमा कधी ही ओलांडली नव्हती त्या नद्या शहरेच्या शहरे मंदिर मस्जिद   उध्वस्त करत बेफामपणे वाहत आहेत  भारताच्या खेळाच्या तय्यारीचे  त्यांना कांही भान आहे का? हा प्रश्न पडतो.  पण गेल्या महिन्या पासून या दोघांनी ही महान भारताच्या यशावर पाणी फिरवण्याचे कार्य अविरत केले . देशाची इभ्रत पणाला लावणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धा दोनच आठवड्यावर येऊन ठेपल्या असताना सोमवारी जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या बाहेर, याच स्पर्धांच्या निमित्ताने उभारला जात असलेला पादचारी पूल कोसळून २३ मजूर जखमी झाले आणि देशाची लाज गेली.राष्ट्रकुल खेळांचे उद्धाटन समारंभ तसंच समारोप समारंभ होणा-या जवाहरलाल नेहरु मैदानाजवळच हा पूल आहे. या पार्श्वभूमीवर ही दुर्घटना म्हणजे शरमेची बाब असल्याचे जनतेचे मत आहे.वेलिंग्टन - राष्ट्रकुल क्रीडानगरीतील प्रश्‍न दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यातच दिल्लीत सातत्याने येत असलेल्या पुरामुळे वेगाने होत असलेल्या कामावर प्रतिकूल परिणामही होत आहे. आता यात सुधारणा झाली नाही, तर स्पर्धाच रद्द होईल, असे न्यूझीलंडचे पथकप्रमुख डेव्ह करी यांनी सांगत राष्ट्रकुल संयोजकांची झोप उडवली पण आपल्या कलमाडी अन्ड कंपनीने याला न भिता भारताची मान , शान जगभर उंचावण्या प्रयत्न चालू ठेवले यास दाद द्यायला पाहिजे. आज त्यांच्या जागी दुसरे कोणी असते आणि भारता शिवाय दुसरा देश असता तर कधीच स्पर्धा रद्द झाल्याची घोषणा करून बसला असता.

Sunday, September 19, 2010

रस्त्यावर या ४०% लाचेचे खड्डे पडतात हे काय या भ्रष्ट्र राजकारण्यांना माहित नाही.


'खड्डे असणाऱ्या राज्य रस्त्यांवरील टोल वसूल करण्यात येऊ नये, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अशा मार्गावरील टोल बंद करण्यात येतील. ' अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही रस्त्याची अवस्था वाईट असल्याचेही मान्य केले.





Wednesday, September 15, 2010

माँ तुझे सलाम!!!

 माँ तुझे सलाम!!!
एकदा एक निर्णय घेतला, की त्याच्याशी ठाम राहणे, प्रसंगी आत्मक्‍लेश सहन करणे आणि टीकाटिप्पणी होत असतानाही आपल्या निर्णयाशी तडजोड न करण्याला फार मोठे मानसिक बळ, तसेच धैर्याची गरज असते. आपल्या निर्णयाशी प्रतारणा न करणारी माणसे तशी कमीच असतात. योगायोगाने या गटात मोडणाऱ्या दोन स्त्रियांचं आहे. आणि या दोघीजणी आशिया खंडातील आहेत. फक्त फरक एकजणी लष्करी हुकुमशहाच्या लष्करी अत्त्याचाराला बळी पडली तर दुसरी आपण विचारकरू शकणार नाही अश्या महान अहिंसावादी, उठसुठ महात्मा गांधीच्या नावाचा जप करणाऱ्या लोकशाहीच्या भ्रष्ट्र बेईमान राजकारण्याच्या लोकशाही अत्त्याचाराला बळी पडली आहे. हे वर्णन वाचून तुम्हाला भारताची आठवण झाली असेल. तर दुर्देवाने आपल्या आठवणीने आपणास दगा दिला नाही असे मला खेदाने मान्य करावे लागेल. या मध्ये ईशान्य भारतातील मणिपूर येथील इरोम शर्मिला चानू आणि म्यानमार मधील आँग सान स्यू की या दोघींचा समावेश आहे. पहिल्या क्रमांकावर यांचे नाव इतिहासकाराला लिहावेच लागेल एव्हढे मोठे यांचे ऐतिहासिक कार्य आहे.

Tuesday, September 14, 2010

अमेरिकेच्या गिल्ट कॉन्शन्सचे आऊटसोर्सिंग

अमेरिकेच्या गिल्ट कॉन्शन्सचे आऊटसोर्सिंग
उपक्रमावर अभय बंग यांच्या उपचार पद्धतीस न्यायवैद्यकीय अनुमति नाही. आदिवासींना फसवून त्यांच्यावर उपचार केले जातात हे वैद्यकीय एथिक्स च्या विरुद्ध आहे म्हणून जोरजोरात चर्चा चालू आहे. वादविवाद आणि त्यात चांगली बाजू हिरहिरीने मांडणे हे ठणठणपाळ याची मजबुरी यामुळे ठणठणपाळ यानेही मोठ्या उत्साहाने भाग घेतला .कारण भारतात ज्या कांही चांगल्या गोष्टी आहेत त्यात श्री आणि सों अभय बंग , आमटे कुटुंबीय यांचा पहिला नंबर आहे. आणि या चांगल्या कार्यास जर कोणी अपशकून करत असेल तर विरोध करणे हे आपले कर्तव्य आहे यामुळे वादविवाद . हे चालत असतानाच आज लोकसत्तात पुढील बातमी वाचली . डॉरी स्ट्रॉम्र्स पुरस्कार स्वीकारण्यासाठी डॉ. अभय बंग अमेरिकेला रवाना. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=100...

Friday, September 10, 2010

‘ध्वनीकेंद्राला’ सेन्सर्स हा वर मी गणराया मागितला आहे.

कालच मिस्टर इंडिया! हा जाला वरील लेख वाचला . अदृश होवून इतरांच्या खाजगी जीवनात डोकावण्याची इच्छा , जादूची अंगठी, बाबा , बुवा , महाराज त्याच्या मनात आलेल्या सर्व कल्पना वा विचार अत्यंत घाणेरड्या, अश्लील, वात्रट या सदरात मोडणार्‍या होत्या.परंतु हेमंतला अशा वाईट गोष्टीपासून चार हात दूरच रहायचे होते . हे वाचत प्रतिक्रिया देतच झोप कधी लागली समजलेच नाही.
सकाळी उठल्या बरोबर वर्तमान पत्र लोकसत्ता वाचणे हा प्रमुख कार्यक्रम.प्रथम गजलीयत गझलीयत भीमराव पांचाळे यांचे उर्दू शेरोशायारीचे लहानसे पण मन प्रसन्न करणारे सदर वाचून अग्रलेखा कडे वळलो .शीर्षक वाचून अगं बाई,अरे बापरे !! वाटल हे काय आज संपादकांना विषय मिळाला नाही बाई, बाप असा अग्रलेख.

Wednesday, September 8, 2010

भारताच्या रुपयाला नवीन मानचिन्ह मिळाले.

भारताच्या रुपयाला नवीन मानचिन्ह मिळाले. यामुळे भारताच्या विकासाला झालेल्या  न झालेल्या विकासाचे ढोल पिटले गेले . हा विकास कसा झाला त्याचे एक मानचिन्ह.

Monday, September 6, 2010

UNKE DUSHMAN HAI BAHUT AADMI AACHA HOGA: मराठी माणसांनो , मराठी जगवा

UNKE DUSHMAN HAI BAHUT AADMI AACHA HOGA: मराठी माणसांनो , मराठी जगवा

भ्रष्ट्राचार मुक्त भारत !!

 
भ्रष्ट्राचार मुक्त भारत !! हे स्वप्न आता दूर राहिले नाही. राष्ट्रीय भ्रष्ट्राचार-विरोधी धोरण या मथळ्या खाली आज लोकसत्तेत केंद्रीय दक्षता आयोगाने एक जाहिरात दिली आहे. केंद्रीय दक्षता आयोगाने भ्रष्ट्राचार-विरोधी राष्ट्रीय  धोरण तय्यार करण्यात पुढाकार घेतला आहे. हे शासकीय धोरण निव्वळ सरकारी होवू नये म्हणून आयोगाने सर्व हितसंबधिता कडून म्हणजेच भारतीय नागरिक, सिव्हील सोसायटी,ऑर्गनायजेशनस, खाजगी व्यवसायिक,प्रसिद्धी माध्यम, राजकीय व्यक्ती, न्यायधीश, यांच्या कडून आयोगाने या मसुदा धोरणावर जनतेचा प्रतिसाद मागितला आहे. २०/०९/२०१०
पर्यंत आयोग कडे आपली मते पोहोचणे  आवश्यक आहे. आयोगाचा पत्ता पुढील प्रमाणे आहे. ज्या भारतीय नागरिकांना देश भ्रष्ट्राचार मुक्त भारत व्हावा असे वाटत असेल त्यांनी कृपया आपली मते, सूचना  आयोग कडे आवश्य पाठवाव्यात.  ही नम्र विनंती.
                 श्री. के.  सुब्रमण्यम
                 ओ एस डी टु सीव्हीसी
                 सेन्ट्रल व्हिजिलन्स कमिशन
                 सतक्रता भवन आयएनए ;
                 नवी दिल्ली ११००२३
                 फोन : ०११-२४६५१०८५
                 e mail: subramaniam.k@nic.in

Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-

मराठी माणूस मराठी भाषा ही सोन्याची अंडे देणारी कोंबडी आहे

मराठी माणूस मराठी भाषा ही सोन्याची अंडे देणारी  कोंबडी आहे. अंड च खा कोंबडी कापु नका एक कळकळीची विनंती दोघांना करत मराठीच्या हितचिंतकांनी मराठी माणसांनी उध्दव आणि राज या ठाकरे बंधूनी एकत्र यावे.  मराठी माणसा करता बरोबरीने काम करावे म्हणून  आज मुंबईत मूक मोर्चा दोघांच्या घरावर काढला..... या प्रयत्नाची दोघानाही कित्येक दीवस आधी कल्पना देण्यात आली होती. पण दोन मराठी माणस एकत्र येतील ते कसले मराठी या उक्तीनुसार आज या दोघांचे वागणे होते.