Translate

Sunday, June 26, 2011

या सरकार ने आमच्या कुत्र्याचे SORRY DOGI चे जगणे देखील मुश्कील केले.

अहो ! मयुरजी आपण चांदोबा मधील  विक्रमादित्य  वेताळाच्या न संपणाऱ्या गोष्टी प्रमाणे इंडिया मधील TV मिडीयाच्या २४ तास चालणाऱ्या  बातम्या पाहत नाही का? काल दिवसभर या महागाई वरच बातम्या होत्या. त्या मध्ये तुम्ही म्हणता तो सामान्य माणूस मात्र कोठेच  दिसला नाही मला.

  हां पण लाखो-करोडोच्या  गाड्या बाळगणारे आणि उंची विदेशी दारू ढोसून नशेत बेफाम गाड्या हाकत  रस्त्यावरील सामान्य माणसांचा जीव घेणाऱ्या गाड्याचे मालक    मात्र पेट्रोल च्या वाढलेल्या भावा बद्दल संताप व्यक्त करत होते. .................

Friday, June 24, 2011

महाजनांची कवच कुंडले खतम झाली की मुंढे च्या कर्तत्व चा सुद्धा ऱ्हास झाला.

साहेब पक्ष मोठा की राजकारणी व्यक्ती मोठी हे तुम्हास सांगण्याची आमची पात्रता नाही. तरी पण एक मतदार या नात्याने लिहिण्याचा मात्र आम्हाला अधिकार आहे. लोकशाही मध्ये सत्ता बदल होतच असतात. नव्या निवडून आलेल्या नेत्याला पक्षाच्या कार्यकर्त्यां मधून त्याच्या मर्जी प्रमाणे काम करणाऱ्या माणसांची निवड करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि जगभरातल्या सर्व लोकशाही देशात हीच प्रथा परंपरा आहे. पण हा बदल भारतीय नेत्यांच्या पचनी पडत नाही. मग ते पक्षालाच ब्लक मेल करण्यास सुरवात करतात आणि स्वतः चे हसे करून घेतात. ज्या वेळी प्रमोदजी होते त्यावेळी ही त्यांनी त्यांच्या माणसांची टीम तय्यार केली होती आणि त्यात तुम्ही प्रथम क्रमांकावर होतात. त्या वेळी ज्यांची प्रमोदजी बरोबर काम करण्याची नाळ जुळत नव्हती असे अनेक जुने जाणते कार्यकर्ते पक्षाच्या प्रवाहा बाहेर फेकले गेले होते पण त्यांनी अशी बंडाची नाटक केली नाही हे ही तुम्हास चांगले माहीत आहे. आता काळ माना प्रमाणे आपण प्रवाहा बाहेर फेकला गेला एव्हढेच ..... पक्षाने आपल्याला मोठे केले हे जेंव्हा कार्यकर्ता विसरतो तेंव्हा त्याचा ऱ्हास सुरु होतो. आणि स्वतःची मुल मुली पुतणे जावई सासू सून यांनाच आमदारकी खासदारकी ची पद मिळवून देणे ,फ्लट सरकारी भूखंड जागा बेकायदेशीर मिळवून देणे म्हणजे पक्ष कार्य पक्ष सेवा समाज कार्य समाज सेवा नव्हे. हे लक्षात घ्या


आजच्या राजकारणात राजकीय पक्ष कार्यकर्त्याच्या सामाजिक राजकीय कामा पेक्षा त्याचे  उपद्रव मूल्य कीती मोठ्या  प्रमाणात आहे त्यावरून  त्याला सत्तेत भागीदारी देतात.  यामुळे कार्यकर्ते सुद्धा कामा पेक्षा आपले उपद्रव मूल्य जास्तीत जास्त कसे वाढेल याचा प्रयत्न करत जातीचे धर्माचे नात्या गोत्याचे राजकारण करत असतात. यातूनच मग आपलीच माणसे पक्षाच्या जागां न वर सरकारी , सहकारी संस्था वर नेमली जातात. आणि पक्षातल्या विरोधी गटाचे  पद्धतशीर खच्चीकरण केले जाते . महाजन-मुंढे या गटाने भाजपात ही खेळी महाजन जोरात होते त्यावेळी खेळली होती. प्रमोद महाजनांच्या काळात मुंढे - महाजनांनी भाजपमधील जुण्या  कार्यकर्त्यांची  राजकीय कारकीर्द केवळ आपल्या गटाचा नाही म्हणून खराब केली.  दिलीप गांधी , जयसिंग गायकवाड विमल मुंदडा शिवणकर सोमय्या असे कित्येक उदाहरणे आहेत.  मुंडे यांची पण काही खास पात्रता नव्हती फक्त प्रमोद महाजनाचे नातेवाईक म्हणून ते राजकारणात वरती आले पद मिळवले आणि मग लोकसेवा सुरू केली. हे कटू सत्य आहे. यामुळेच महाजनांची कवच कुंडले खतम झाली की मुंढे च्या कर्तत्व चा सुद्धा ऱ्हास झाला. आणि स्वतः चे अस्तित्व दाखवण्या साठी बंडाचे दबाब तंत्र वापरावे लागले . पण हि खेळी सुद्धा आज तरी फसली असे म्हणावे लागेल .

Wednesday, June 22, 2011

Saturday, June 18, 2011

कसाब भारतीय रहवाशी... दोन वर्ष झालेत ....भारतीय नागरिक त्यास चेष्टे ने  सरकारचा जावई म्हणतात . हिंदूत  जावयाचे फार महत्व आहे म्हणुन  या जावयाच्या संरक्षणाकरता भारत सरकारने   आता पर्यंत रुपये १० करोडच्या वर खर्च केलेत... .खाणे पिणे मान सन्मान खर्च वेगळा.    भारतीय नागरिक आयुष्यभर सुखसोयी युक्त चैनीचे जीवन आरामात जगला  तरी  एव्हढे करोड रुपये खर्च करू शकणार नाही यातील बरेच करोडो रुपये तो बचत करेल..... ही  गोष्ट वेगळी.. लवकरच कसाब  मतदानाच्या हक्कास पात्र होईल..............................

पक्ष मोठा की राजकारणी व्यक्ती मोठी


Thursday, June 16, 2011

ज्योतिर्मय डे तुमच चुकलंच!  पत्रकार म्हणुन मस्त राहायचे, उंची स्टार हॉटेल मध्ये खायचे प्यायचे ऐष करायची. मोठमोठ्या परिषदां मधून समाजाचे बौद्धीक घेत वांझोट्या चर्चा करायच्या, सल्ले द्यायचे आणि रात्री मैफीलीत समाज कंटक आणि राजकारण्यान बरोबर ( दोन्ही ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत) सोमरसाचे  जाम रिकामे करत उद्याच्या वर्तमान पत्राच्या मुख्य पानाची पेड बातमी तय्यार करायची. अशी पत्रकारिता करायची  सोडून तुम्ही अंडरवर्ल्ड मध्ये राहून अंडरवर्ल्डशीच वैर करावयास निघालात....
 
 

Tuesday, June 14, 2011

. ...... पण.... चष्मा हरवण्या इतपत आमचे नशीब बापू.......तुमच्या एव्हढे चांगले नाही..... हे आमचे दुर्दव्य .

बर झाल महात्म्याचा चष्मा चोरीला  गेला ते..... आता त्या महात्म्याला या राजकारण्यांचा काळाबाजार , बेईमानी, भ्रष्ट्राचार, गद्दारी , अत्याचार पीडीत महीला, त्रस्त सामान्य जनता मस्त टाग्गेगिरी करणारे राजकारणी , मुजोर नौकारशाही , त्यांच्याच अहिंसक मार्गाने देशहीता साठी   आमरण उपोषण करणाऱ्या स्वतःच्या नागरिकांवर   इंग्रजाला ही लाजवेल असा अत्त्याचार करणारे स्वदेशी काँग्रेसी सरकार , कुपोषित बालके , भाषावादाने होणाऱ्या दंगली, राजकारण्यांची अफाट डोळे दिपवून टाकणारी बेकायदेशीर संपत्ती, बापूने स्वतःह कधी ही न वापरलेल्या पांढऱ्या टोपी ला ..

Friday, June 10, 2011

अंतकवादी सरकारी पहचान पत्र लेने मे सबसे तेज

भारतीय नागरिक तो UID कोड ले नही रहै. सरकार की लाख कोशिश के बावजुद जनताने इस आधार कार्ड लेने मे कोई दिलचस्पी नही दिखाई . वैसे भी  चुनाव कार्ड भी कई भारतीय लेते नही. मगर हक्क के लिये सब आगे आते है. ऐसे वक्त अंतकवादी सरकारी पहचान पत्र लेने मे सबसे तेज कार्य करते है. सच्चे भारतीयोनको सब सही कागजात होते हुवे भी नौकारशाही  प्रमाणपत्र देती नही मगर इन देशद्रोही लोगोंको ये भ्रष्ट्र नौकारशाही झुठे कागजात के सहारे UID आधार नंबर तुरंत देते है. दहशदवादी अंतक के खिलाफ लढाई लढने के लिये अपने नागरिकों को ये UID आधार का प्रयोग कराने के सरकार के प्रयास को इस तरह सरकारी बाबु नाकाम क़र रहे हें

Wednesday, June 8, 2011

.इसी लिये हम कांग्रेसी ये अनशन और धरना स्विटज़रलैंड में स्विस बैंक के सामने कराने का ठहराया है.....

इंडिया में भ्रष्ट्राचार, कालाबाजार ये आम बात है. सामान्य नागरिक से लेकर विरोधी और शासन पक्ष भी इसमे सामिल है . मगर आज ऐसा माहोल तैयार हुवा की सिर्फ कांग्रेस ही भ्रष्ट्रचारी पक्ष है और बही सब दूध के धोये साफ है. इस बारे अब पक्ष को क्या निति अपनानी चाहीये इस बारे मे पुरे भारत भर से खास कांग्रेसी सेवकों से सुझाव मंगाये गये थे ....... और इसी सुझावों का अभ्यास करनेवाली हाय कमिटी ने कुछ सुझाव हायकमांड  खास सेवको के सामने रखे .......

 ईन सुझावों में से एक खास सुझाव था..... ये सब ख़तम करने के लिये  अब वक्त आ गया है.... हम कांगेसी सदस्य को ही आमरण  अनशन पर बैठना  चाहीये..... ...ये सुनते ही जमा कांग्रेसी के पेट में दर्द बल बढ़ने  लगा......

Saturday, June 4, 2011

तेंव्हा कोठे गेला होता भ्रष्ट्र नेता सूता तुझा धर्म ?

भ्रष्ट्राचार बेईमानी काळाबाजार या विरुद्ध आज आण्णा हजारे बाबा रामदेव आणि INDIA AGAINST CORRUPTION , पीपल्स सोसायटीचे चे हजारो ज्ञात अज्ञात कार्यकर्ते आवाज उठवत आहेत. हा आपल्या लोकशाही भ्रष्ट्र शासनप्रणालीचा पराभव आहे, यात वाद नाही. गेल्या ६० वर्ष भारतावर शासन करणाऱ्या कॉंग्रेस चे हे जसे अपयश आहे .त्या पेक्षा जास्त अपयश या देशातील विरोधी पक्षाचे आहे हे १०१% कटू सत्य आहे. या विषयावर विरोधी पक्षाच्या निषक्रियते मुळेच जनतेला आण्णा , रामदेव यांच्या आंदोलना कडे वळावे लागले ही विरोधी पक्षाची शोकांतिका आहे.भ्रष्ट्राचार, काळाबाजार या ज्वलंत विषयावर शासनास जाब विचारावयाचे सोडून हे विरोधी पक्ष सुद्धा भ्रष्ट्राचाराच्या गटार गंगेत आंघोळ करण्यात स्वतः ला धन्य समजू लागले. या मुळे हे विरोधी पक्षाचे जास्त अपयश आहे असे मानावे लागेल.बहरे चमन उजड़ने को एक उल्लू काफी हैयंहा तो हर डाल पर उल्लू बैठा है
आणि आज या आंदोलनाचा वणवा पेटल्यावर त्यात होरपळून जाण्याच्या भीतीने कॉंग्रेस पक्षा बरोबर विरोधी पक्ष सुद्धा हा लोकशाही शासन व्यवस्थे वर घाला घालण्याचा प्रकार आहे. या लोकांना असे आंदोलोन करण्याचा अधिकार नाही. इंग्रजाच्या काळात आंदोलन ठीक होते .आता आपल्याच सरकार विरुद्ध आमरण उपोषण करणे म्हणजे सरकारला BLACKMAIL करण्या सारखे आहे. लोकशाहीच्या प्रणाली प्रमाणे या लोकांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरून सत्ता हासील करावी पण बाहेरून शासनावर वचक ठेवण्याचा प्रयत्न करू नये . असे मानभावी सल्ले देत लोकशाही वर संकट आले आहे असे म्हणत मगरीचे अश्रू ढाळत आहेत. काळाबाजार, बेईमानी भ्रष्ट्राचार यांना पाठींबा देत असताना देश कंगाल करत असताना नेत्या हो तेंव्हा कोठे गेला होता भ्रष्ट्र नेता सूता तुझा धर्म ?असे विचारावेसे वाटते.

Friday, June 3, 2011

आजकाल शुभेच्छा या शुभेच्छा राहिल्या नाहीत,

शुभेच्छा….. आजकाल शुभेच्छा या शुभेच्छा राहिल्या नाहीत, तर तो बाजारीकारणाचा, आपल्या यांत्रिक जीवनाचा एक अविभाज्य घटक झाला आहे. या शुभेच्छा फारश्या भावनाप्रधान मनाने घ्यावयाच्या नसतात.यांत्रिकपणे ओपन करायच्या वाचायच्या आणि निर्जीवपणे डीलीट करायच्या असतात. किंवा उत्सवा प्रसंगी आलेल्या शुभेच्छा तर उघडायची सुद्धा तसदी न घेतलेली बरे.. असे म्हणावे वाटते. शब्द बापुडे केवळ वारा’ अशी या FORWARD MESSAGES ची अवस्था असते.ही मेसेजस निर्लेप भांड्या च्या (NONSTICK) सारखी खोट्या खोट्या मुलामा दिलेल्या आनंदाच्या कल्पनांनी शब्दबद्ध केलेली असतात.
खरंच फोन करा,….. मनापासून शुभेच्छा द्या……..बिलकुल नको….. कालच इडीयट बोक्स दिवसरात्र बोंबलत होता…… . कोणत्या तरी नवीन संशोधना प्रमाणे मोबाईल वर जास्त बोलण्याने मेंदूचा कर्करोग होतो म्हणुन…. आता कमी बोला…. आणि जास्त मेसेजस करा….. असा सल्ला वैज्ञानिकांनी दिला आहे… … म्हणजे जीवाला जास्त ताप होणार………. . हा ताप न होऊ देण्या करता परत शुभेच्छा देवू का??????

Thursday, June 2, 2011

देश को लुटने का षड्यंत्र गोपनीयता के कायदे का सहारा लेके बुना गया.

स्वित्ज़रलैंड दुनिया के काले धन कमाने वालों का स्वर्ग कहा जाता है. अमेरिका और दुनिया के तमाम शासक और बेईमान, भ्रष्ट्र , चोर, देशद्रोही कालाबाजार करने वाले उद्योगपति, व्यापारी, दलाल इन लोगोने खुद के स्वार्थ के लिये दुनिया के  भ्रष्ट्रचारी लोगोने  देश की अर्थव्यवस्था  खोखला करने का ये कारभार गये १७ वे शतक से  से सुरु कीया. और इस में दुनियाभर के हुकुमशाह से लेके लोकशाही के तमाम नेता सामिल हुवे और इन्होने इस भ्रष्ट्र व्यवथा का चोरी छुपे समर्थन ही कीया. जैसे जैसे कंपनीका कारभार बढ़ता गया कम्पनियोने ज्यादा अतिरिक्त मुनाफा इन बैंको में रखना शुरू कीया और खुद के स्वार्थ के लिये गोपनीयता के नियम बनाकर इसे गुपित रखना शुरू कीया.

Wednesday, June 1, 2011

शिक्षकाची व्यथा

शिक्षकांना वर्षातून 366 दिवसांपैकी तब्बल 144 दिवस अधिकृत सुटय़ा असून केवळ 234 कामकाजाचे दिवस आहेत़ यामध्ये किरकोळ, अर्जित  रजा आणि वैद्यकीय सुटय़ांचा हिशोब लावला तर शिक्षकांना सुटय़ा किती, याचा पालकांनी विचार न केलेलाच बरा, मात्र या सुटय़ा अधिकृत असल्यामुळे त्यांना या सुटय़ांच्या कालावधीत वेतन पूर्णपणे मिळत़े विद्यार्थ्यांच्या पालकांकडून घेणार्‍या शुल्काचा हिशेब हा पूर्ण वर्षभराचा असतो़
त्यामुळे पालकांना भुर्दंड  पडतो तो पूर्ण वर्षाचाच़ 2011-12 या शैक्षणिक सत्राचा विचार केल्यास मे 2011 पासून कामाला सुरुवात होईल़ एप्रिल 2012 मध्ये शैक्षणिक सत्र संपत़े .त्यामध्ये 366 दिवसांचे सत्र पकडल्यास 53 रविवार, 19 सार्वजनिक सुटय़ा, दिवाळी सुटय़ा 7, मुख्याध्यापक व जिल्हाधिकारी यांच्या अधिकारातील 6 सुटय़ा, उन्हाळी 47 आणि प्रत्येक शिक्षक हा 12 किरकोळ रजा घेतोच, अशा तब्बल 144 सुटय़ा शिक्षकांना अधिकृत मिळतात़.