Translate

Sunday, December 27, 2009


मार्केटिंग च्या या जगात, देवाच्या नावाखाली जनतेला लुबाडले जात आहे.आणि हे कटू सत्य सांगितले तर आमच्या श्रद्धेवर घाला घातला म्हणून (भक्त नाही) तर देवाचे दलाल ओरड करून सांगणाऱ्याचा निषेध करणार . धार्मिक स्थळे हि मोजमज्जा ( सभ्य भाषेत) करण्याची ठिकाणे झाली आहेत. अशी मंदिरे उभारून लोकांच्या अंधश्रद्धेचा गेरफायदा घेऊन गावोगाव हस्तक नेमून नवस केल्या वर कसा फायदा होतो याचा नियोजितपणे प्रचार केला जातो.भक्त येवू लागले म्हणजे मग पंचतारांकित सुखसोयी येतात, या सोयी आणि देव एकाच पकेज मध्ये मिळाल्यावर गर्दी होते. आपण कधी गंगा नदीवर गेला असाल तर आपणास याचा प्रत्यय येईल . पवित्र गंगेत स्नान करत असताना तेथील पुजारी आपल्या न कळत मोबाइल वर चित्रण करत असतात.देवाच्या पुजारयाला दलालाला  ब्लैक मनी दिल्याशिवाय देवाचे दर्शन होत नाही. असे दर्शन त्या देवाला आवडत असेल का? शनि मागे लागला हें ऐक असेच भोळ्या जनतेला, भक्ताला  फसवीण्याचे राजरोस साधन. शनिला देव मानल्या जाते.मग  देव भक्ताला का परेशान करेल, त्रास देईल . याचा कोणी विचारच करत नाही. मग रोज हजारो किलो तेल वाया घालवले जाते. आणि गणिताचा विचार केला तर सेकंदाला ऐक भक्ताचे दर्शन झाले तर 86400 भक्ताचे दर्शन ही होत नाही, यात देवाच्या आरामाचा,पूजेचा वेळ पकडला नाही , देव 24 तास काम करतो हा हिशोब धरला.तर मग 24 तासात २ ते ३ लाख भक्त कसे दर्शन घेतात आपणच हिशोब करा .

Friday, December 25, 2009

आख्या महाराष्ट्रातील वीज चोरून, होय चोरुनच!!!,मुंबई चा खरा भयानक बकाल चेहरा लपणार नाही ,



कोंबड कितीही झाकले तरी सूर्य उगवणारच. त्या न्यायाने मुंबईचे कितीही मेकअप केले तरी मुंबई चा खरा भयानक बकाल चेहरा  लपणार नाही , हेच या पाण्याने दाखऊन दिले. आख्या महाराष्ट्रातील वीज चोरून, होय चोरुनच!!! त्याला अंधारात लोटून  मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हणावण्याच्या नादात आणि राजकीय स्वार्थात मुलभूत सोई कडे दुर्लक्ष झाले. त्याचा हा  परिणाम आहे.याला कॉंग्रेस राष्ट्रवादी सोबत शिवसेना सुद्धा तेव्हढीच जबाबदार आहे. आवो चोरो लुटो सारा आधा तुम्हारा आधा हाम्हारा..!! असा महानगर पालिकेत कारभार चालू आहे. या वर बोलणे हा गुन्हा आहे . आणि जे बोलतात तेही राजकीय फायद्या साठी . जनतेचे कोणालाही कांही देणे-घेणे नाही. जनतेच्या मुलभूत प्रश्ना कडे लक्ष देण्या ऐवजी रेल्वे चा पाणी पुरवठा कमी करण्याचा महंमद तुघलकी निर्णय घेऊन सरकार आणि नोकरशाही मोकळी झाली आहे.या पेक्षा वाटर पार्क , रेन वाटर बंद करावेत . पंचतारांकित होटल चा पाणी पुरवठा कमी करावा.

भारतीय रेल्वे मध्ये सामान्य डब्ब्यात बसून या निर्णय घेनारया माणसांनी कधी प्रवास केला होता का? आधीच बकाल अस्वछ आसलेल्या डब्ब्यात नाक मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी आत्मःहत्या कराव्यात हाच सरकारचा उद्देश असावा यामुळे लोकसंख्या  ही कमी होईल.  महाराजांच्या काळात असा निर्णय घेतला गेला असता तर ... महाराजांनी आख्या मंत्री मंडळा सह नोकरशाहीस हत्तीच्या पायाखाली शिरच्छेदाची शिक्षा दिली असती व अपील करण्याची पळवाट न देता ताबोडतोब  अमंलात आणली असती . जय महाराष्ट्र !!!


Thursday, December 24, 2009

आपल्या पत्नीच्या प्रेमा करता एकट्याने आख्खा पहाड फक्त छाननी हातोड्याने.......


माझा भारत महान आहे.पण तो महान आजच्या 3 पेज वर चमकणाऱ्या क्रिकेट खेळाडू, फिल्मी नट-नट्या किंवा आपल्या राजकारणी नेत्या मुळे नव्हे, 100 स्रीया बरोबर लग्न करून प्रेमाचा आव आणणाऱ्या  ताजमहल बांधणाऱ्या आणि काम झाल्यावर कारागिरांचे हात तोडणार्या  राजा मुळे तर नव्हेच नव्हे .तर स्वर्गातून गंगा पृथ्वी वर आणणाऱ्या भगीरथ , अजिंठा , वेरूळ चे पहाड खोदून त्यावर नावाची साधी पाटी न लावता कर्म करणाऱ्या कारागीरा मुळे भारत महान आहे
महात्मा फुले. बाबासाहेब आबेडकर,योगी विवेकानंद , बाबा आमटे , मेधा पाटकर, आणि इतर अनाम अज्ञात  सामान्य माणसा मुळे माझा भारत महान आहे. आज अश्याच एका अवलियाची गोष्ट आहे .बिहारी भारतीयाने  आपल्या पत्नीच्या प्रेमा करता एकट्याने  आख्खा पहाड फक्त छाननी हातोड्याने फोडून गावकऱ्या साठी बोगदा ३५० फूट लांब १६ फूट रुंद आणि १२ फूट उंच अशा आकाराचा कल्पनाही करू शकत नाही असा तयार केला.

Wednesday, December 23, 2009

असा प्रकार महारांजाच्या काळात झाला असता तर हत्तीच्या पायाखाली चिरडले असते,


 Is Maharashtra Govt hiding something?
भ्रष्ट नोकरशाही, मुजोर राजकारणी हे मुंबई वरील हल्ल्या कडे किती गंभीरपणे पाहत आहे हे स्पष्ट होते. बायो मेडिकल कचरा हा इतरवेळी रस्त्यात पडलेला असतो , तेंव्हा कोणी तो लवकर उचलत नाही. आणि आता आपल्या पापावर चादर टाकण्या साठी बायो मेडिकल कचरा हि शुद्ध थाप मारून वेळ मारून नेत आहे. असा प्रकार महारांजाच्या काळात झाला असतातर महाराजांनी मुख्यमंत्री,गृहमंत्री सकट सर्व पोलीस अतिमहत्वाच्या अधिकार्यांना हत्तीच्या पायाखाली चिरडले असते, आणि त्यांची मालमत्ता सरकारी खजिन्यात जमा केली असती. पण त्या काळात ......  असे कांही करण्याची शत्रूची  हिम्मत झाली नसती.

Friday, December 11, 2009

भारत रत्न विनायक दामोधर सावरकर भारतीय आदर्श

                                                                 नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
                                  प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी  

सरकारने जरी सावरकरांना भारत रत्न दिले नसले तरी वाईट वाटण्याचे कांही कारण नाही. आपण भारत रत्न ची यादी पहाल तेंव्हा;आपणस कळून येईल की J.R.D. टाटा आणि  इतर 2 - 4  नावे सोडली तर सर्व नावे केवळ राजकीय फायद्या साठीच निवडली गेली आहेत. उद्वेगाची गोष्ट म्हणजे सरदार पटेल आणि बाबासाहेब आंबेडकराना स्वातंत्र्या नंतर ४३ वर्षांनी  सरकारने नाईलाजाने जनमताच्या प्रखर दबाब मुळे गोंरवले. यामुळे आपणच सावरकरांना भारत रत्न हा संम्मान देऊ ; या करता या सरकारच्या परवानगीची गरज नाही 

Wednesday, December 9, 2009

जनताको खाने को अनाज मिले या ना मिले , अनाज से शराब की ईकाया लगते चलो .


जनताको खाने को अनाज मिले या ना मिले , अनाज से शराब की ईकाया लगते चलो .
शराब की गटारे बहाते चलो , जनता को शराब की गटर में डुबोते रहो. २


कोन है छुत कोन हें अछुत , सब  में पैसा ही समाया है,
सत्ताधारी  और विरोधी  ये सब  झूठे भरम है सारे, इस झूठे भरम में जनता  भरमाई हें , २
झूठे आश्वासन झूठे विकास की  खाब्बों का अभास करवाते रहो .
शराब की जय जय करते रहो . २


सारे अनाज के कण कण में है , दिव्य सोमरस की मात्रा
इक वाइन है ,दूसरी हें देशी ,  सबकी नशा ही समाधी हें
भूके पेट नशे की समाधी लगाते रहो .
जिंदगीके सब गम मिटाते रहो
जनता को जाम पे  जाम पिलाते रहो . जय हो जय  हो !!!!!

Tuesday, December 8, 2009

राजाच्या राणीचे ठीक आहे. हो. . .. तीला गरिबी,भूक, काय असते हे माहित असायचे कांहीच कारण नव्हते पण लोकशाहीत जनते कडून निवडून आलेले सरकार असे निर्णय घेते याचे दुख: जास्त..... ,


मोहाच्या फुला पासून दारू,ज्वारी,बाजरी अन्न धान्य यांचे पासून दारू असे क्रांतिकारक निर्णय घेणारे सरकार जगात गेल्या 10000 वर्षात झाले नाही. या निर्णया मुळे महाराष्ट्र सरकारचे नाव वर्ल्ड गिनीज बुक ऑफ रेकार्डस मध्ये ताबोडतोब सामील केले गेले पाहिजे.
मोर्च्या ने पाव रोटी धान्य मागायला आलेल्या जनतेस  फ्रांस च्या उर्मट राणीने जनतेला पाव भेटत नसेल तर केक खा असे उत्तर दिले दिले. त्या नंतर जनतेच्या रागाचा उद्रेक झाला , अक्षरश: रक्ताचे पाट वाहिले आणि देशभर अराजक, हिंसाचार याचे थैमान सुरू झाले. आणि जग प्रसिद्ध फ्रेंच राज्य क्रांती झाली.त्यात राज घराण्याचा  शिरच्छेद झाला.राजाच्या राणीचे ठीक आहे. हो. . .. तीला गरिबी,भूक, काय असते हे माहित असायचे कांहीच कारण नव्हते , ती तर तोंडात सोन्याचा चमच्या घेवून जन्मली होती.
पण लोकशाहीत जनते कडून निवडून आलेले सरकार असे निर्णय घेते 
याचे दु:ख जास्त आहे . हे धक्का:दायक चीड आणणारे आहे. हे  राजकारणी नेते इतिहासा पासून  कांही अक्कल शिकले नाही, असे वाटते. माझे  मना बन दगड..... या घाणी चेच खत होईल. असे झाले तर सरकारने असेच निर्णय  घ्यावे व क्रांतीचा मार्ग मोकळा करावा हीच आपण प्रा र्थ ना करू शकतो.
शराब की बोतल से जिन्न निकला
और उस नेता  से बोला  
-”हुकुम मेरे आका!
आप जो भी मुझसे मंगवाओगे
वह ले आउंगा
बस शराब की बोतल नहीं मंगवाना
वरना मुझसे हाथ धोकर पछताओगे..... मगर फिर भी नेताजी नही माने और शराब बनाने की ठान बेठे ... देखो आगे आगे होता हें क्या ?
??               

Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

Sunday, December 6, 2009

माय-बाप सरकार बालकामगार विरोधी कायदे करून काम करू देईना.







आई खाऊ घालेना , बाप भिक मागू देईना आणि माय-बाप सरकार बालकामगार विरोधी कायदे करून काम करू देईना. कोटयावधी बालकांना गुन्हेगारीच्या मार्गावर वाटचाल
करावयाला लावणारा असा हा  भारत सरकारचा बाल कामगार विरोधी कायदा आहे. बाल कामगाराच्या हीता करता काहींचं नाही करता फक्त बालकाना कामावर न ठेवण्याचा  कायदा करून आणि कामावर ठेवल्यास मालकांना जेल मध्ये टाकण्याचा,त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक दंड लावण्याचा  अजब कायदा करून   सरकार, राजकारणी नेते आणि नोकरशाही आपण बाल कामगाराच्या सर्व समस्या दूर केल्याचे आणि आपण बालकाचे मुलांचे हित पाहत असल्याचे ढोल पिटत आहे. पण वास्तवात हा कायदा नोकरशाहीच्या भ्रष्ट्राचाराला आधिक वाव देत आहे. पण शासन बुद्धीजीवी वर्ग वेड पांघरून पेडगावला जात आहेत. आणि बालक काम करून घराची चूल पेटण्यासाठी राबत आहे. हेच दाहक सत्य आहे. आणि शासन यंत्रणा वार्षिक 
श्राद्धा  प्रमाणे बालकामगार दिवस "आमच्या विभागात बालकामगार नाहीत" अश्या पाट्या लाऊन साजरा करतात. 

रेल्वे ने प्रवास करत असताना स्
टेशन वर अनेक पदार्थ मिळतात . का सेलू स्टेशन वर चणे गरमागरम मिळतात. गरीब चणे खात असेल तर ,देखो घरमे खाणे को मिलता नही स्टेशन पर चणे खा राहा आणि  श्रीमंत माणूस तेच चणे खात असेल तर देखो शौक से चणे खा राहा है. चणे तेच पण खाणाऱ्या च्या सामाजिक दर्जावर खाण्याचा दर्जा ठरत असतो. या वरून बालकामगार  ही सामाजिक  दर्जावरून वर्ग ठरवले जातात . घरी चूल पेटावी घरच्यानन च्या पोटात दोन घास जावे , भावंडाना शिक्षण घेता यावे , आजारी मात्या-पित्याच्या आजारपणासाठी औषधा करत मदत व्हावी म्हणून हि कोवळी बालक काम करत असतात. तेंव्हा समाज यांचे कोतूक करावयाचे सोडून आपला बुद्धिवाद पाजळत बसतात. आणि बालकामगार समाजाला कलंक आहे असे सांगत हे बंद करण्या करता कायदे , अधिक कडक कायदे करत बसतात.


तेच उच्चभ्रू , मध्यम  समाजातील मुल, मुली अभ्यास सोडून रियालिटी शो च्या नावाखाली टी.व्ही वर वेडे वाकडे तोडक्या कपड्यात सरक्यालो खटीया १२ बजे असे विचित्र गाणे घाणरडे हावभाव करत असतात; कमरे खालचे विनोद सांगत असतात ,  तेंव्हा हेच उच्च वर्ग , या बाल कलाकार उर्फ बाल कामगार याचे कोतूक करत असतात. या कलाकारांना बाल मजदूर ,कामगार म्हणतो  म्हणून दचकलात? हां हे बाल कलाकार १००% बाल कामगार आहेत हे  विदारक  कटू सत्य आहे. नैसर्गिक जीवन जगण्याचे, खेळाचे,अभ्यास करण्याचे सोडून हे बाल कामगार  8 - 10  तास  चेहऱ्यावर मेकअप चे थर चढवून, अक्शन, कट, च्या वातावरणात, फ्लूड लाईट च्या प्रखर प्रकाशात ,घामने ओलेचिंब होत काम करत असतात. याच वेळी परीक्षेकांची कुजकट, अवमान करणारी शेरेबाजी ऐकत अपमान गिळून चहेर्या वर  खोटे हसू आणत काम करत असतात. राग, त्रागा केला तर स्पर्धेतून बाहेर फेकल्या जाण्याची भीती असते.जशी भीती कामावरून काढून टाकण्याची बाल कामगाराला असते.  त्याच बरोबर आई वडिलांच्या अंतहीन अपेक्षांचा फुगा फुटला तर काय होईल याची पण भीती मनात असतेच. पण आजच्या उपोभोगवादी, बाजारू संस्कृतीत या कडे कोणाचेच लक्ष जात नाही, कारण बाजारू संस्कृतीत बाबूजी तुम क्या क्या खरीदोगे यांहा तो हर चीज बिकती है हेच सत्य आहे . यामुळे  या कडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते.हीच या मुलांची म्हणण्या पेक्षा आपल्या समाजाची शोकांतीका आहे.मुख्य गोष्ट आज जगात 22 - 23 कोटी बाल कामगार काम करत आहेत. विषम सामाजिक, आर्थिक परिस्थिती मुळे, बाजारू अर्थ व्यवस्थे मुळे ;  जगातील कोणत्याही कायद्याने ही बाल कामगार व्यवस्था बंद पडणार नही . मग अतिरेकी कायदे करण्या पेक्षा या बाल कामगारांना कायद्याने कामगार हक्क देऊन त्यांची ताकद वाढविण्याची गरज आहे. या करता मालकांना बाल कामगारांच्या शिक्षणाची जबाबदारी देण्यात यावी.या मुलांचा सरकारी  शिक्षणाचा आर्थिक भार या मालकांवर टाकावा. शाळे मध्ये आई-वडिलांच्या नावा बरोबर या मालकांचे जबाबदार पालक म्हणून नाव टाकावे. मुलांचे कामाचे तास शाळेच्या तासा बरोबर नियमित करावे. 5 - 6 तासा पेक्षा मुलांचे कामाचे तास जास्त होणार नाही, या मुलांना ओवर टाइम मध्ये काम करणे, ओवर टाइम काम करण्या करता सक्ती करणे कायद्याने बंद करणे. संघटीत कामगारा चे हक्क या बहाल करणे. अश्या व्यवस्थित नियमावली करून या  बालकांच्या श्रम शक्तीला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देऊन देशाच्या या भावी नागरिकांना सशक्त बनविणे हीच काळाची गरज आहे. नाही तर समाज कंटक , गुन्हेगारांच्या, शुद्र राजकारण करणाऱ्या नेत्यान च्या सापळ्यात अलगद सापडून ही पिढी बरबाद होईल , आणि याचे गुन्हेगार तुम्ही आम्ही सगळेच असुत. हे ध्यानात घ्या.



हसने के लिये कुछ वाक्य !!!


पहली भेंट..नए-नए डॉक्टर ने अपने जीवन का पहला ऑपरेशन किया, लेकिन ऑपरेशन के थोड़ी ही देर बाद मरीज मर गया...
डॉक्टर ने दीवार पर टंगी काली मां की तस्वीर की ओर हाथ जोड़कर सिर झुकाते हुए पूरी श्रद्धा से कहा, "हे मां, मेरी ओर से यह पहली भेंट स्वीकार कीजिए..."

Saturday, December 5, 2009

पूसा के वैज्ञानिक ने बांस से बनाई बिजली

पूसा के वैज्ञानिक ने बांस से बनाई बिजली



Sep 13, 11:54 am
मुजफ्फरपुर [गणेश कुमार मेहता]। राजेन्द्र कृषि विश्वविद्यालय वानिकी विभाग के वरीय वैज्ञानिक डा. आरएन झा के अद्यतन शोध ने वैज्ञानिक हलकों में जिज्ञासा पैदा कर दी है। उन्होंने बांस से बिजली बनाने की तकनीक इजाद की है। इंटरनेशनल जर्नल में प्रकाशित उनके आलेख ने जहां बायोमास [घास से बिजली] पर सबसे अधिक काम करने वाले चीनी वैज्ञानिकों का ध्यान आकर्षित किया है वहीं नेशनल थर्मल पावर कारपोरेशन ने भी उनसे तकनीक मांगी है। चीन में तो इस पर काम भी शुरू हो गया है। इधर, डा. झा अपने लैब में इसे विकसित करने में रात-दिन जुटे हुए हैं। कृषि के अलावा पावर सेक्टर में शोध कर रहे वैज्ञानिकों की नजर भी अब उन पर टिकी हुई है।

कई वर्षो से डा. झा की बांस से बिजली बनाने की तकनीकी लगभग अंतिम चरण में है। डा. झा ने बताया कि बायो इनर्जी में सबसे अधिक संभावना बांस में है। एक किलो बांस से एक घंटा में 15 सौ वाट बिजली पैदा की जा सकती है। बांस का औसतन उम्र पांच वर्षो का होता है। वह जितना पुराना होगा, उतनी अधिक बिजली पैदा की जा सकती है। इसके लिए उन्होंने बड़ा बक्सा के आकार की एक मशीन इनर्जी बायोसूट गैसफायर मशीन बनायी है। इसके अंदर 440 वोल्ट का ट्रांसफार्मर लगा हुआ है। इसमें बांस का बिस्कुट डाला जाता है। इस बाक्स को जेनरेटर पर चलाया जाता है। डा. झा के अनुसार यह ईधन के अन्य स्रोत से भी चलाया जा सकता है। बांस का बिस्कुट बनाने की भी मशीन बनायी गयी है। डा. झा ने बताया कि इस पद्धति से बिजली की लागत 1.35 रुपये प्रति यूनिट आयेगी। यह पद्धति पूरी तरह से प्रदूषण मुक्त होगी। डा. झा के अनुसार बांस कार्बन डाई-आक्साइड का सबसे बड़ा अवशोषक है। बांस की अधिक खेती कर पर्यावरण से कार्बन डाई-आक्साइड को कम किया जा सकता है। इंटरनेशनल जर्नल आफ बैम्बू में यह शोध रपट छपने के बाद बायोमास पर काम करने वाले वैज्ञानिकों ने इसे हाथोंहाथ लिया है। उन्होंने कहा कि इस दिशा में पहल कर किसानों के भविष्य को संवारा जा सकता है और ऊर्जा संकट से मुक्ति पाई जा सकती है





 




Thursday, December 3, 2009

It hurts a lot : (.


Wednesday, December 2, 2009

भारतीय नेत्याच्या भ्रष्ट्राच्यारा वर हकीम लुकमान कडेही ओषध मिळणार नाही,


लोकशाही म्हणजे जनतेचे , जनतेकरता , जनतेने निवडलेले सरकार.हि अब्राहीम लिंकन यांनी केलेली व्याख्या . पण भारतात जनतेने निवडून दिलेले सरकार, नेत्याच्या भ्रष्ट्राचारा करता, भ्रष्ट्र नेत्या कडून चालवले जाणारे सरकार म्हणजे लोकशाही अशी झालेली आहे. जो पर्यंत मताची खरेदी विक्री , धर्म , जातीपातीचे राजकारण कायद्याने बंद होत नाही तो पर्यंत हकीम लुकमान कडेही यावर ओषध मिळणार नाही,  आणि या करता  खुले जनमत घेण्या करता सरकारवर जनमताचा प्रचंड दबाब आणणे आवशक आहे.