Translate

Sunday, December 23, 2012

तिसरे युग


सरकारप्रधान विकासाची विचारप्रणाली सर्वव्यापक असलेल्या काळात  जेआरडींची सारी कारकीर्द बहरली. निखळ बाजारपेठीय स्पर्धेची आणि  खासगी उद्यमशीलतेची महत्ता
शिरोधार्य मानणार्या  विचारपर्वादरम्यान रतन टाटा यांच्या  प्रगल्भ कर्तबगारीला  दशदिशा मोकळ्या मिळाल्या.  आता, ‘सरकारआणि बाजारपेठया दोन्ही संस्थांच्या  अंगभूत र्मयादांची प्रचीती  अनुभवलेल्या सध्याच्या टप्प्यावर  टाटा उद्योगसमूहाची सूत्रे  सायरस मिस्त्री  हातात घेणार आहेत.
प्रत्येक युगातील पिढीला  तिचा तिचा स्वतंत्र मंत्र जपावा लागतो.  जेआरडींची जागा घेण्याचे स्वप्नदेखील मी कधी  पाहिले नाही आणि  आताबी युवर ओन सेल्फहेच  मी सायरसला सांगतो आहे’,  असे रतन टाटा  अलीकडेच म्हणाले.  त्यामागील सूत्र हेच असावे का

Saturday, December 22, 2012

सपनोंका सौदागर


दीपक घैसास
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17721425.cms
येत्या २८ डिसेंबरला वयाची ७५ वर्षे पूर्ण करून रतन टाटा आपल्या 'टाटा समूहा'ची धुरा अवघ्या ४४ वर्षीय सायरस मिस्त्री यांच्याकडे सोपवत आहेत. ज्येष्ठांना डावलून त्यांच्यावर वयाच्या ५६व्या वर्षी 'टाटा समूहा'ची सूत्रे सोपवण्यात आली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण मोठी स्वप्न बघणे आणि ती प्रत्यक्षात आणणे, हा रतन टाटा यांचा आवडता उद्योग. त्यामुळेच जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या लाटेवर टाटा समूहाला आरुढ होऊन नवीन प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करता आली. एवढेच नव्हेतर एका पाठोपाठ एक परदेशी कंपन्या विकत घेऊन पूर्ण भारतीय उद्योगजगताला अभिमान आणि आत्मविश्वास मिळवून दिला. यातून जागतिक मंदीच्या काळात चीनप्रमाणे भारतीय उद्योगही जागतिक स्तरावर आपले हातपाय पसरू शकतात व जागतिक अर्थव्यवस्थेत लक्षणीय कामगिरी करून भारताला महासत्तेच्या दिशेने पुढे नेऊ शकतात, ह्याची चुणूकच दाखवणा‍ऱ्या रतन टाटा यांच्या उद्योजकीय कारकिर्दीचा घेतलेला मागोवा... 
 

जागतिकीकरणाचा मानवी चेहरा.....

Published: Sunday, December 23, 2012
भ्रष्टाचाराने बरबटलेल्या, गलथान प्रशासनाने पोखरलेल्या आणि विकासाच्या बहुतेक आघाडय़ांवर जगाच्या खूप मागे पडलेल्या आपल्या देशाचा अभिमान वाटावा असे प्रसंग हल्ली दुर्मीळच झाले आहेत. म्हणून अशा एका प्रसंगानेच सुरुवात करावीशी वाटते. 'चेंज फॉर बेटर' या इंग्रजी त्रमासिकाच्या मुंबईतील प्रकाशन समारंभात २३ ऑक्टोबर २०१० रोजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सांगितलेला हा प्रसंग. प्रकाशनाच्या काहीच दिवस आधी ते इंग्लंडमध्ये असताना घडलेला. रतन टाटा यांचा इंग्लंडमध्ये जाहीर सत्कार होत होता. तो स्वीकारायला टाटा स्टेजवर गेले, तेव्हा शेजारच्याच खुर्चीत बसलेला एक इंग्रज गृहस्थ माशेलकरांना म्हणाला, ''लक्षात घ्या, ज्याचा आम्ही आता सत्कार करतो आहोत तो उद्योगपती आजचा ब्रिटनमधला खासगी क्षेत्रातील सर्वात मोठा रोजगारनिर्माता आहे.'' हे सांगून मुंबईतल्या त्या प्रकाशन समारंभात माशेलकर पुढे म्हणाले, ''ज्या ब्रिटनचे आम्ही दीडशे वर्षे गुलाम होतो, त्या ब्रिटनमध्ये सर्वात जास्त नोक ऱ्या देणारा माणूस एक भारतीय आहे, माझा देशबांधव आहे, याचा मला त्या क्षणी प्रचंड अभिमान वाटला. एकेकाळी आमच्यावर राज्य करणाऱ्यांना आज आम्ही नोकरीवर ठेवत होतो. ब्रिटिश करत होते तो जणू फक्त टाटांचा नव्हे, तर संपूर्ण भारताचाच सन्मान होता.'' आपल्या खचलेल्या अस्मितेला उभारी देणारे असे क्षण आपल्या वाटय़ाला वरचेवर यायला हवेत. त्यासाठी आपल्या बाहूंना बळ देण्याचे सामथ्र्य रतन टाटा यांच्या वारशात आहे.


उपभोगशून्य स्वामी!......

Published: Sunday, December 23, 2012
टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा हे येत्या २८ डिसेंबर रोजी वयाची पंचाहत्तरी पूर्ण होत असल्याने टाटा समूहाच्या जबाबदारीतून निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी सायरस मिस्त्री टाटा समूहाची सूत्रे हाती घेत आहेत. त्यानिमित्ताने उद्याच्या समर्थ भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकेल अशा रतन टाटा यांच्या समृद्ध औद्योगिक आणि मूल्यात्मक वारशाचे मार्मिक विश्लेषण करणारे लेख..
बॉम्बे हाऊसमध्ये- म्हणजे टाटा समूहाचं मुंबईतलं मुख्यालय- इथं काम करणारे सांगतात- भारतातल्या सगळय़ात मोठय़ा उद्योगसमूहाचे अध्यक्ष रतन टाटा जेव्हा या इमारतीत आपल्या कार्यालयात येण्यासाठी शिरतात..
तेव्हा काहीही वेगळं होत नाही!
म्हणजे एरवी एखाद्या छोटय़ा-मोठय़ा उद्योगपतीच्या कार्यालयात त्याच्यासाठी स्वतंत्र लिफ्ट असते. तो यायच्या आधी त्याचे भालदार-चोपदार 'बाजू व्हा.. बाजू व्हा' असं म्हणत तिथे असलेल्या इतरांना उगाचच लहान वाटायला लावत असतात. पण रतन टाटा जेव्हा बॉम्बे हाऊसमध्ये शिरतात तेव्हा यातलं काहीही होत नाही. त्यांची गाडी आली की पहिल्यांदा दारात बसलेल्या कुत्र्यांना आनंद होतो. आता एवढय़ा मोठय़ा उद्योगपतीच्या दारी कुत्रे असणं नवीन नाही. पण बॉम्बे हाऊसमधले कुत्रे म्हणजे खरे कुत्रे. चार पायांचे. समस्त टाटा कुटुंबियांना त्यांचं प्रचंड प्रेम. रतन टाटा यांची गाडी आली की हा सारमेय संप्रदाय त्यांच्या गाडीभोवती जमतो. गाडीतून उतरले की लोक काय म्हणतील वगैरे विचार न करता रतन टाटा त्यातल्या काहींना थोपटतात. लाड करतात. 'दीज इंडियन डॉग्ज..' वगैरे शब्द त्यांच्या तोंडात काय, मनातही येत नाहीत. आणि मग ते लिफ्टच्या रांगेत उभे राहतात. इतर कर्मचाऱ्यांसारखे. म्हणजे त्यांच्यासाठी लिफ्ट राखून वगैरे ठेवली जात नाही. आपण कोण आहोत, काय आहोत, हे हा माणूस कधीही  मिरवत नाही. पेज-थ्रीच्या उथळ आणि उठवळ पाटर्य़ात पाचकळपणा करताना दिसत नाही. आणि उद्योगपतींच्या मतलबी गराडय़ातून स्वत:ला अलगद वेगळं ठेवू शकतो. स्वत:च्या घरासाठी २०-२५ मजल्यांचा इमला उभारणं टाटांना सहज शक्य आहे. पण ज्या शहरात ६५ टक्के जनतेच्या डोक्यावर आभाळाशिवाय काहीच नाही, त्या शहरात असं राहणं बरं नाही, हे त्यांना जाणवतं. त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्यासारखे ते फ्लॅटमध्ये राहतात. आणि शनिवारी आपले दोन जर्मन शेफर्ड कुत्रे आणि ते स्वत:च्या छोटय़ा यंत्रहोडीतून अलिबागला जातात.


Saturday, December 8, 2012

भारत कधी कधी माझा देश आहे......

सर, लहानपणी शाळेत ग्राउंड वर जन-गण-मन अधिनायक जय हे, भारत-भाग्य-विधाता या राष्ट्रगीता नंतर भारत माझा देश आहे ही प्रतीज्ञा म्हणताना छाती अभिमानाने भरून यावयाची देशा बद्दल गर्व वाटायचा .....कांही वात्रट विद्यार्थी सारे भारतीय माझे बांधव आहे म्हणताना हळुच एक सोडून म्हणत तेंव्हा आजूबाजूंच्या विद्यार्थ्याना हसू आवरत नसे...........हळूहळू काळ बदलत गेला. रामदास फुटाणे यांची भारत कधी कधी माझा देश आहे. आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत. माझा जयजयकार असो, माझ्या धर्माचा जयजयकार असो, माझ्या पंथाचा जयजयकार असो,माझ्या प्रांताचा जयजयकार असो. झालाच तर... कधी कधी... माझ्या देशाचा सुद्धा जयजयकार असो.-रामदास फुटाणें ही वात्रटीका वाचनात आली...... जे न देखे रवी ते देखे कवी या म्हणीची प्रचीती आली.....खरच फुटाणे यांनी देशाच कीती सार्थ वर्णन केल...आणि आजची देशाची भयानक दुरवस्था पाहता शाळेतल्या प्रतीज्ञे चा पोकळपणा जाणवतो आणि रामदास म्हणतात तेच पटते ...कधी कधी भारत माझा देश आहे.......अखेरीस ....जनगण मन अधिनायक जय हे राष्ट्र गीत इंग्लंडचा बादशहा जार्ज पंचम याच्या १९११ च्या भारत भेटीच्या वेळी त्याचे स्वागत करण्याकरता त्याचे गुणगान गाण्या साठी खास लीहले गेले होते हा कटु सत्य असलेला इतिहास समजल्यावर आणि स्वातंत्र्य लढ्यातील प्रेरणादायी  वंदे मातरम गीता ला डावलुन या जन-गण-मन गीताला राष्ट्रगीताचा दर्जा देण्याकरता जे घाणरडे राजकारण खेळले गेले ते समजल्यावर तर या राष्ट्रगीताचा सुद्धा तिटकारा वाटायला लागला............बऱ्याच वर्षांनी प्रतीज्ञा वाचल्यावर मनावरच्या जखमेतून अश्वत्थाम्याच्या जखमेप्रमाणे भळभळून रक्त वाहू लागल्याने प्रतिक्रया मोठी झाले.

Wednesday, December 5, 2012

....जोतिष्य वास्तुशास्त्राचा अतिरेक

आज घर बांधणीवर आर्किटेक्ट इंजिनिअर यांच्या पेक्षा  वास्तुशास्त्राचा, जोतिष्याचा दशदिशांचा  खूप अतिरेक परिणाम  झाला आहे...प्लॉट घेण्या पासून ते नवराबायाकोने पलंगावर कसे झोपावे , पूजा घरात देवाची पूजा कशी करावी दगडी मूर्तीच्या देवाचे तोंड कोणत्या दिशेला असावे, स्वयंपाक घरात जेवण कसे तय्यार करावे..... आणि कोणत्या दिशेला तोंड करून जेवावे.... हे सुद्धा हेच कुडमुडे लोक ठरवत असतात. आता तर संडासाचे भांड सुद्धा कसे बसवायचे, कोणत्या दिशेला बसवायचे हे सुद्धा हेच वस्तूतज्ञ दिशा तज्ञ  ठरवितात......पण या मुळे घरमालकाची कशी गोची होते, आपल्या सोयीसुविधा प्रमाणे घर न बांधता कोण्या मूर्ख  वास्तुतज्ञा च्या सल्ल्या प्रमाणे घर बांधल्यास काय अतिरेक दुष्परिणाम होतात, हे या व्यंग चित्रकाराने एकदम प्रभावीपणे चित्रात दाखवले आहे.....१०० ओळीचा लेख लिहून ही जो प्रभाव पडला नसता तो या चित्रा वरून पडला ....आता तरी जनता शहाणी होईल ....

Tuesday, November 27, 2012

आमच्या गुरुजीना आख्ख गाव लंगड्या मास्तर म्हणूनच ओळखायचे.

आमच्या गुरुजीना आख्ख गाव लंगड्या मास्तर म्हणूनच ओळखायचे. आणि लंगड्या मास्तराच्या शाळेत पोरग एकदा टाकल कि बाप कींवा माय शाळे कडे परत ढुंकून ही पाहत नसत.........एव्हढा विश्वास शाळेच्या शिवणकर लंगडे सर, कुलकर्णी आणि बारबिंड या शाळेच्या त्रिमूर्ती संस्थापक गुरुजींनी कमावला होता. सणासुदीला मुलाची/मुलीची माय माउली आठवणीने लंगड्या सरांन करता घरून गोड जेवणाचा  डब्बा पाठवत असे ........... तर कधी धपाटे कींवा साधी तिखट मिठाची पोळी सुद्धा  वेळप्रसंगी अगत्याने सरांना  दे म्हणून देत असे......कारण शाळेच्या संसारालाच लंगड्या सरांनी आपला संसार मानले होते.....सरांचे स्वच्छ धुतलेले पांढरे शुभ्र कपडे, विध्यार्थ्याना बसल्या जागे वरूनच मारण्या साठी खास बनवलेली लांब वेताची छडी अजून ही डोळ्या समोर उभी राहते. सगळ्या सरांनी आम्हाला भरपूर मारले पण आम्हाला कींवा आमच्या मायबापाना कधी राग आला नाहीं .उलट आम्ही तक्रार केली कि मायबाप सरळ म्हणत तुझीच चूक असेल मास्तर उगीच तुला कश्याला मारतील . आजच्या शिक्षण पद्धतीचे धिंधवडे पाहीले की नशीब आपण या काळात शिकत नाही म्हणत देवाचे आभार मानतो. शिक्षकांनी माझ्या मुलाना मारले तरी मी कधीही शाळेत तक्रार करण्यास गेलो नाही.....आणि आज सगळेच बदलले आहे....बालमनाचा गुरुजींनी मारण्याच्या आधीच पालक शाळेत तक्रार नाही तर भांडणाच्या आवेशात जातात. जर गुरुजींनी मुलाला मारलेले पालकांस पटत नसेल तर त्यांनी घरी खाजगी शिकवणी ठेऊन सरां बरोबर स्वतः बसावे .........

Thursday, November 22, 2012

यंहा सत्ता के हर खुर्सी पर उल्लू बैठा है ......

  यंहा सत्ता के हर खुर्सी पर उल्लू बैठा है ...

महाराष्ट्र load shedding मुक्त होता होता राजीनामा आला......


"उष:काल होता होता, काळरात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली."............हे गाण आठवण्याच कारण महाराष्ट्र load shedding मुक्त होता होता राजीनामा आला.......अरे आता पुन्हा पेटवा कंदीलाच्या वाती .......अजितदादा याचं महाराष्ट्र load shedding मुक्त करण्याच स्वप्न नव्हे तर ध्येय होत...... उगीच स्वप्न पाहणाऱ्या पेकी ते नव्हते.......वीज वसुलीची कठोर मोहीम, जेथे वसुली चांगली तो विभाग वीज भारमुक्त 
करणे २४ तास वीज पुरवठा......., ज्यादा वीज चोरी असलेल्या विभागात ज्यादा वीज कपात कपात लागू करणे असे फुकट्या जनतेला अप्रिय वाटणारे निर्णय लोकशाही असून घेण्याचे धाडस दाखवत दादांनी महाराष्ट्र राज्य भारमुक्त करण्याचा दिशेने वेगाने प्रगती केली.......पण का कोण जाणे दादांचा ठरवून गेम करण्यात आला. सिंचन घोटाळ्याच्या धुरात महाराष्ट्र राज्य भारमुक्त करण्याचे स्वप्न भंग पावले......आता असा खमक्या मंत्री या खात्याला मिळणे अवघड आणि महाराष्ट्राचा अंधार खतम होणे नजीकच्या भविष्यात अवघड ...................

चीन युध्दात भारताच्या दारुण पराभवामध्ये नेहरुंचा वाटा मोठा होता.

बाळासाहेबांचे दुखद निधन. त्यानंतर कसाब फासी  या बातम्यांच्या गदारोळात एका महत्वाच्या बातमी कडे दुर्लक्ष झाले. पंडित नेहरूंनी हिमालया पेक्षा जास्त मोठ्या चुका करून भारताताचे प्रचंड नुकसान केले पण नेहरू अंधभक्त आज ही नेहरूंच्या या चुका मान्य करण्यास तयार नाहीत , हे भारताचे दुर्देव .
नवी दिल्ली। दि. २0 (लोकमत न्यूज नेटवर्क)
सन १९६२च्या भारत-चीन युद्धादरम्यान भारताने हवाईदलाचा वापर का केला नाही, हा वादाचा मुद्दा असताना या युद्धातील भारताच्या पराभवाला तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू जबाबदार होते, असा ठपका भारतीय हवाईदलाचे माजी प्रमुख (एअर चीफ मार्शल) ए.वाय. टिपणीस यांनी ठेवला आहे. हवाई दलाचा वापर केला असता तर 1962 च्या युद्धाचे परिणाम वेगळे दिसले असते, असे मत विद्यमान हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल एन. ए. के. ब्राउन यांनी नुकतेच व्यक्त केले आहे. त्या पार्श्वभूमीवर एअर चीफ मार्शल टिपणीस यांनी ही टीका केली आहे. जागतिक पातळीवरचा नेता बनण्याची पंडित नेहरु यांची महत्त्वाकांक्षा होती. यासाठी त्यांनी देशाच्या सुरक्षा हितांकडे दुर्लक्ष केले. चीन युध्दातील भारताच्या दारुण पराभवामध्ये नेहरुंचा वाटा मोठा होता.‘युद्धाच्या पाच दशकांनंतर भारत व चीन’ या विषयावरील एका चर्चासत्रात टिपणीस बोलत होते. जागतिक नेता बनण्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी नेहरूंनी देशाच्या सुरक्षा हिताकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप टिपणीस यांनी या वेळी केला.http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=MainEdition-1-1-21-11-2012-7cc10&ndate=2012-11-21&editionname=mainhttp://online1.esakal.com/esakal/20121120/4639284476902441226.htmhttp://navshakti.co.in/featured/95602/

Saturday, November 17, 2012

महामृत्युंजय जपाची दुरावस्था चटा वरील श्राद्ध उरकण्या सारखी झाली आहे.

मरण अटळ आहे. राम-कृष्ण सारख्या देवतांना ही  मरण चुकले नाही..........आपण तर सामान्य माणसच..... असे असताना कोण्या मनुष्य प्राण्याने या महामृत्युंजय जपाची रचना करून मानवाला न मरण्याच्या खोट्या आशेवर झुलवत ठेवले देव जाणे.......   तो खरोखरच महान आहे. बर ज्याने कोणी हा मंत्र रचला तो सुद्धा मृत्यु  वर विजय मिळवू शकला नाही...तरी  असा जप वर्षानुवर्षे विश्वासाने जपुन मानव मृत्यूला    चुकविण्याचा का बर प्रयत्न करतो हेच समजत नाही????......आणि आता तर मिडीयाच जन्म-मृत्यु चा ठेकेदार झाल्या मुळे अश्या अमानवी उपचारांचे अतिस्तोम माजणे साहजिकच आहे. 
एखाद्या गंभीर आजारातून बरे होण्यासाठी. महामारीच्या प्रकोपापासून रक्षण करण्यासाठी. वात(वायू) पित्त(ताप) आणि कफ या दोषांमुळे झालेल्या आजारांपासून मुक्त होण्यासाठी. एखाद्या दुर्घटनेमुळे किंवा आजारामुळे जीवनावर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा जन्म कुंडलीतील ग्रह दोष, ग्रहांची महादशा, अंतर्दशा यांच्या अशुभ प्रभावाच्या शांतीसाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा..दरिद्रता दूर करण्यासाठी, धन प्राप्तीसाठी, सुखी आयुष्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.मानसिक अशांतता आणि क्रोध यामुळे धर्म आणि अध्यात्माप्रती निर्माण झालेली कटुता नष्ट करण्यासाठी. परिवार, समाज, आणि नात्यांमधील कलह दूर करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.संपत्तीचे वाद मिटवण्यासाठी. शासकीय कामातील अडचणी दूर करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. लग्न जमण्यात येणाऱ्या अडचणी नाडी दोष किंवा इतर बाधा दूर करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. दिव्य मराठी. http://divyamarathi.bhaskar.com/article/REL-mahamritunjay-mantra-chanting-3515952.html?seq=7 
थोडक्यात जन्मा पासून मृत्यु पर्यंतच्या सर्व प्रवासात हर बीमारी का एक ही शर्तिया  ईलाज असे या जपाचे महात्म्य आहे. शर्त एकच हा जप पवित्र शुद्ध मनाने कोणत्याही प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक पापच्या वर्तना शिवाय पूर्ण करावा. ॐ त्र्यम्बकम् यजामहे सुगन्धिम्पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीय मामृतात।।  इस मंत्र को संपुटयुक्त बनाने के लिए इसका उच्चारण इस प्रकार किया जाता है  ॐ हौं जूं स: ॐ भूर्भुवः स्वः  ॐ त्र्यम्बकम् यजामहे सुगन्धिम्पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीय मामृतात।। ॐ स्वः भुवः भूः ॐ सः जूं हौं ॐ  असा हा  देव भाषेतील  मंत्र  आजच्या काळात  प्रत्यक्ष देवाला सुद्धा शुद्ध  भाषेत उच्चारता येणार नाही तेथे  मृत्य  मानवाचे काय ???
आजच्या बाजारीकरणाच्या काळात या मंत्रौपचाराचे, मंत्र म्हणणारयांचे सुद्धा बाजारीकरण झाले असल्या मुळे  या  महामृत्युंजय जपाची दुरावस्था चटा वरील श्राद्ध  उरकण्या सारखी झाली आहे. या  मुळेच  मरणावर  मृत्यु  वर मानव विजय मिळवू  शकला नाही...निव्वळ मंत्र उच्चारून संकटावर मात करता येत नाही..तर संकटाना हिमंतीने सामोरे जावे लागते.... हेच खरे.

आम्ही जातो आमच्या गावा !!!!!!

Friday, November 16, 2012

मार्मिक मराठी व्यंगचित्र साप्ताहिक

  मार्मिक मराठी व्यंगचित्र साप्ताहिक हे बाळासाहेबांचे लढाईचे हक्काचे शस्त्र होते.ऑगस्ट, इ.स. १९६०मध्ये मार्मिक साप्ताहिक सुरू केले. या साप्ताहिकाचेमार्मिक हे नाव ठाकर्‍यांना त्यांचे वडील केशव सीताराम ठाकर्‍यांनी सुचविले. व्यंगचित्रात्मक असलेले हे मराठीतील पहिले साप्ताहिक ठरले. साप्ताहिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. प्रकाशनसमारंभास अनंत काणेकरही उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना यशवंतराव म्हणाले,“आज मी येथे रसिक म्हणून उपस्थित आहे. बाळ ठाकरे यांची व्यंगचित्रं मी नेहमीच आवडीने पहातो. अनेकदा मीही त्यांच्या कुंचल्याचा विषय ठरत असतो. त्यांच्या कुंचल्याचे बोचरे फटकारे ते त्यांच्या व्यंगचित्रातून मारत असतात, पण तो सगळा आनंददायी भाग असतो. त्यांच्या व्यंगचित्रांमुळे आम्हाला अंतर्मुख होण्याची संधी मिळते. जनतेची प्रतिक्रिया कळू शक‍ते. त्यांच्या या नव्या साप्ताहिकाला माझ्या शुभेच्छा.” शिवसेना साभार        
  या पहिल्या अंकाची किमंत फक्त पंचवीस पैसे (चार आणे) एव्हढीच होती.....आजच्या महागाईच्या वणव्यात शासनाला पंचवीस पैश्याचे नाणे रद्द करावे ....... पण त्या काळी एव्हढ्या पैशात महाराष्ट्राला हादरवून सोडणारे साप्ताहिक मिळत होते हे आपल्या नातवांना सांगितले तर  ते विश्वास ठेवत नाहीत .






Saturday, October 13, 2012

मलाला यूसुफजई...पंतप्रधान होण्याचे ....ध्येय....

काल tv वर मलाला यूसुफजई ची मुलाखत पाहीली....अणि तिच्या हिम्मतीला, तीच्या नजरे समोर असलेल्या ध्येयाला साष्टांग दंडवत घातला......अवघ्या १४ वर्ष वयाची..... प्रेम कविता गाणी सिनेमा च्या स्वप्नमय जीवनात जगण्याच , धिंगाणा मस्ती करण्याच वय असताना 
ती चक्क राजकारणात जाऊन देशाची पंतप्रधान होण्याचे स्वप्न नव्हे ध्येय आपल्या समोर आहे हे खणखणीत पणे सांगते.......आपण राजकारणात आलो तरच आपल्या देशाची परिस्थिती सुधारू शकतो आणि मुलींच्या शिक्षणा करता काम करू शकतो या वर तीचा ठाम विश्वास आहे.....आपल्या कडील तरुण तरुणींच्या राजकारणा पासून दूर पळण्याच्या पार्श्वभूमीवर या बंदुकीच्या तोफेच्या गोळ्यांच्या आवाजातच जीवन जगणाऱ्या मलाल च्या रोखठोक विचारांचे कौतुक वाटते....... कदाचित या युद्धमय वातावरणा मुळे ती अधिक शक्तिशाली काटक झाली असावी....ज्या पाश्चिमात्य देशांनी पाकिस्तानच्या स्वात अफगाण खोऱ्यात दहशदवाद जोपासला तेच देश आता मलाला यूसुफजई वरील प्राणघातक हल्ल्याचा निषेध करत नार्काश्रू ढाळत आहेत.........ती लवकर बरी व्हावी या साठी ईश्वर , अल्लाह कडे प्रार्थना

Friday, October 12, 2012


Thursday, October 11, 2012

In short Indians call it " Banana Republic "

 In short Indians call it " Banana Republic "
Wintson Churchill statement proving to be correct.

क्यों की सोनिया ही इन भ्रष्ट्रचारीयों की GOD FATHER है

..............फिर भी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे कहते है इन पर करवाई करे इतनी बड़ी ये बात नहीं........हम परिस्थिति पर नजर रखे हुवे है. हम मंदिर में  अन्दर जाकर ये अलगवादी , खुनी लोगोंका जो स्मारक बना है, वो तोड़ेंगे नहीं......हां कुछ अलगवादी गट सक्रीय हुवे है......ये कहते वक्त वो ये भूल गये की उनकी पार्टी की इण्डिया की पंतप्रधान इंदिरा गाँधी ने ही गोल्डन टेम्पल्स के अन्दर मिलट्री भेजी थी और अंतकवाद का खात्मा किया था.......शिंदे जैसे शिखंडी गृहमंत्री हो तो देश को बरबाद ख़तम करने के लिए पाकिस्तान जैसे दुश्मन देश की जरुरत नहीं.......अमेरिका के चक्कर में अपने पंतप्रधान को तो इस अलगवाद से तो कोई संबंध नहीं ऐसा उनका बरताव है.........और बाकि सलमान खुर्शीद जैसे भ्रष्ट्र मंत्री जो विकलांग बच्चों के नाम पर आये फंडस में बेईमानी करके पैसा खाते है और इसीलिए अपने हायकमांड सोनिया के दामाद पर भ्रष्ट्राचार करने का आरोप हुवा  तो।।।। सोनियाके लिए जान देने को तैयार होते है.......मगर देश के लिए नहीं ....क्यों की सोनिया ही इन भ्रष्ट्रचारीयों की GOD FATHER है http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-money-being-collected-in-uk-for-khalistan-claims-terror-suspect-3909944-PHO.html?seq=2&HT5

Wednesday, October 10, 2012

इंडिया का आज के हालत का यथार्थ चित्रण

  इंडिया का आज के हालत का यथार्थ चित्रण
*** जिस राज्य का राजा चोर हो, वहां प्रजा से ईमानदारी की अपेक्षा करना न्यायपूर्ण नहीं है। ***
एक बार एक चोर चोरी करते रंगे हाथों पकड़ा गया। उसे राजा के सामने पेश किया गया। राजा ने उसे मौत की सजा सुना दी। फांसी का दिन निश्चित कर दिया गया। उस
दिन जब जल्लाद उसे लेने आए तो उसने कहा- मैं सोने की खेती करना जानता हूं। यदि मैं मर गया तो वह हुनर भी मेरे साथ ही खत्म हो जाएगा। जल्लादों ने यह खबर राजा को दी। राजा ने चोर को अपने पास बुलवाया और पूछा- बताओ कैसे की जाती है सोने की खेती? चोर बोला- महाराज, एक किलो सोने के सरसों जैसे दाने सुनार से बनवाकर मंगवा दीजिए और अपने ही राजमहल के प्रांगण में क्यारी बनाने की जगह मुझे बता दीजिए। जब तक सोने के दाने आएंगे, तब तक मैं क्यारियां तैयार कर लूंगा। चोर ने फावड़े से मिट्टी खोदी। फिर खुरपे और हाथों की सहायता से मिट्टी भुरभुरी की। इतने में सोने के दाने आ गए।

चोर ने राजा से कहा- मुझे अपने उस गुरु की बात याद आ गई जिनसे मैंने यह विद्या सीखी थी। चूंकि मैंने चोरी की है इसलिए मैं अपने हाथों से यह सोने के दाने नहीं बो सकता। सोने की खेती सिर्फ वही कर सकता है जिसने कभी चोरी या कोई गलत काम न किया हो। राजा शर्मिंदा होकर बोला- मैंने तो एक षड्यंत्र के तहत पहले राजा को मरवा कर राजगद्दी हथियाई थी, इसलिए मैं भी तो चोर हुआ। राजा ने एक-एक कर सभी मंत्रियों को बुलाया और सोने की खेती की शर्त बताई। लेकिन एक भी मंत्री ऐसा नहीं निकला जिसने कभी हेराफेरी न की हो। राजा चोर से बोला- यहां सभी चोर हैं इसलिए सोने की खेती नहीं हो सकती। राजा की बात सुनकर चोर बोला- जिस राज्य का राजा चोर हो, वहां प्रजा से ईमानदारी की अपेक्षा करना न्यायपूर्ण नहीं है।

Monday, October 8, 2012

रॉबर्ट वाड्रा सोनिया का दामाद है,

रॉबर्ट वाड्रा सोनिया का दामाद है,
रॉबर्ट सोनियाका ही नही पुरे कांग्रेस इंडिया का दामाद है.
हम रॉबर्ट वाड्रा से प्यार करते है,
वाड्रा की संपत्ति उसके धंदे पर हमें गर्व है.
हम सदा वाड्रा के आदर्श मार्गपर चलने कोशिश करेंगे.
मै सदा सोनियाजी,प्रियंका, रॉबर्ट उनके बेटा बेटी रेहन मिराया का 
पूरा सम्मान करूँगा,
और इन सबके साथ विनम्रता पूर्वक पेश आऊंगा.
वक्त आने पर इस सोनियाजी के परिवार के लिये में जान नौछवर क़र दूंगा.
मै सोनियाजी और उनके खानदान के प्रति सत्यनिष्ठा की प्रतिज्ञा करता हुं,
सोनिया गाँधी और उनके दामाद के परिवार के
कल्याण एवं समृद्धि में ही मेरा सुख निहित है.
भारत मेरा देश है ......कभी कभी ............... 
मेरा अज़्म इतना बलंद है कि पराये शोलों का डर नही !
मुझे ख़ौफ़ आतिशे-गुल से है कही ये चमन को जला न दे !!
THANTHANPAL

Saturday, October 6, 2012

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा

अजितदादांचा राजीनामा........ याच रहस्य , गूढ २०१४ साली जेंव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागेल तेंव्हाच  जनतेला समजेल..तो पर्यंत या राजीनाम्याची कारणे शोधणे, अजितदादांचा गेम कोणी केला या रहस्या भोवतीच सर्व चर्चा होत राहतील आणि......हिंदी सिनेमा प्रमाणे एक एक नाव  बाद होत जाईल......आणि  द एंड काय असेल हे आज फक्त म्हणजे फक्त शरद पवार साहेबच जाणून असतील......आणि साहेबांच्या मनात काय आहे हे खुद्द साहेबच सांगू शकणार नाही...
एक मात्र खरे....... गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या वगनाट्याचा प्रयोग महाराष्ट्रात तुफान रंगणार आहे...आणि महाराष्ट्रात शाहीर ,मावशी, राधा गवळणी, कीसन देवा,पेंद्या, नायक, राजा, राणी, राजपुत्र, प्रधान, खलनायक, हवालदार, शिपाई, राजपुत्री, कोतवाल, दिवाणजी, हुजर्या,  भालदार, चोपदार, दासी, नर्तीका, आणि... विदुषक-सोंगाड्या यांची कमी नाही ....आणि यात नवीन भर पडली ती म्हणजे पत्रकार आणि मिडीया..... शरद पवार यांच्या मनाविरुद्ध अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्या मुळे पवार कुटुंबात कलह कधी होतो आपण ब्रेकिंग न्यूज सर्वात आधी कधी देतो या साठी मिडीयावाले  २०१० पासून व्ह्यूव  रचना करत आहेत .....आतील गोटातील खास बातम्या प्रसिद्ध करत आहेत.....

२०१४  पर्यंत कोणी कोणाचा कात्रज चा घाट केला.....काका विरुद्ध पुतण्या विरुद्ध बहीण  काका मला वाचवा .......उलट पुतण्या मला वाचाव ......... असे म्हणण्याचे सध्या महाराष्ट्रात दीवस आले आहेत......बघा नजदीक चा इतिहास .......बाळासाहेब काका पुतण्या मनसे-राज,  मुंढे काका पुतण्या धनंजय बघा जनता काय म्हणते???.....कोणाच्या बाजूने आहे.......????अजून ही ९९.९९ % जनता अजितदादांचे हे सर्व जरा चुकलेच...पाहत रहा कॉंग्रेस V/S राष्ट्रवादी कॉंग्रेस V/S भाजपा V/S शिवसेना V/S मनसे V/S आठवले V/S आंबेडकर V/S जनता  महाराष्ट्राचा जंगी सत्ता सामना २०१४.