Translate

Thursday, October 20, 2011

अबबब!!!!!!! केव्हढा मोठा भ्रष्ट्राचार......डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे.

अबबब!!!!!!!  केव्हढा मोठा भ्रष्ट्राचार......डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. बेदी नी भ्रष्ट्राचार करावा आता हद्द झाली. अश्याच  छोट्या छोट्या भ्रष्ट्राचारातून करोडो रुपयांचा  घोटाळा पुढे होतो. या बाईना ताबोडतोब अटक करून राजा कलमाडी कानमोली रेड्डी बंधू  येडाआप्पा, अमरसिंग यांच्या बरोबर तिहाड जेल मध्ये टाकावे.......... टीम आण्णा ची जाहीर चोकशी सरकारी न्यायधीश आणि लोकसभा सांसद सदस्या मार्फत करून...... त्यांच्या वर महाभियोगाचा खटला भरावा. आणि त्वरित सजा द्यावी. पुढे या प्रकाराला भ्रष्ट्राचारास आळा बसेल........... या भ्रष्ट्राच्यार्याना आंदोलन करण्यास मनाई करावी..........






सरकारी नौकारीतील उच्च पदाचा दुरुपयोग करत या किरण बेदी, केजरीवाल यांनी स्वतः चे महत्व वाढवले. आणि प्रामाणिकपणाचा मुखवटा घालून संपूर्ण नौकारषाहीस वेठीस धरले होते. पण ते न जमल्याने राजीनाम्याचे नाटक करत नौकरी सोडल्याचा आव आणला......... पण प्रत्यक्षात आपल्या महान नौकारशाही आणि राजकारण्यांनी त्यांना त्यांची योग्य जागा दाखवली म्हणुन ते या दोन्ही शासन यंत्रणा खिळखिल्या करण्याचा प्रयत्न करत आहेत. आण्णा टीम यांना  आधुनिक राबिन्हूड कींवा ठकसेनच म्हणावे लागेल. श्रीमंत लोकांना लुबाडणे आणि ही लुबाडलेली संपत्ती गरीबात वाटून जनते मध्ये लोकप्रियता मिळवणे, जनतेत सरकार विरुद्ध रोष निर्माण करणे हाच यांचा  छुपा अजेंडा आहे असे डिग्गी म्हणतात ते खरे असावे


स्वत: भ्रष्ट्र व्यवहार करून तो लपवण्या साठी  सरकार विरुद्ध भ्रष्ट्राचाराचे आरोप करत  सरकार पाडण्याचे कट-कारस्थान रचणे , देशात अशांतता माजवणे , लोकशाही दुर्बल करण्याचा प्रयत्न करत राज्यघटना मोडीत काढण्याच्या राजद्रोहाच्या कारवाया केल्या बद्दल जार्ज वरील बडोदा डायनामिक खटल्या प्रमाणे आण्णा टीम वर खटला भरावा त्यांना सजा द्यावी . आपण कणखर ताकदवान पंतप्रधान आहोत हे मनमोहन सिंग यांनी जगाला , देशाला , शरद पवारांना आणि आडवाणी यांना दाखवून द्यावे.   देशात १९७५ प्रमाणे आणीबाणी जाहीर करून सोनिया पुत्र राहुल ला पंतप्रधान म्हणुन सांसद सदस्यांनी निवडून द्यावे. जय हो जय .सिंग इज किंग च्या धर्तीवर राहुल इज किंग हे नवे राष्ट्रगीत कॉंग्रेस भाटां काढून तय्यार करून घावे. नाही तरी जणगण मन ....... हे गीत इंग्लंड च्या राजाची स्तुती करणारे आहे म्हणून वाद आहेच. त्या पेक्षा स्वदेशी राजाची स्तुती करणे चांगले.......आता भाजपा जनता काय म्हणेल या कडे दुर्लक्ष करावे म्हणजे झाले..............

No comments: