Translate

Friday, May 6, 2011

लोकसभा विधानसभा मध्ये निवडून आणण्याची जबाबदारी घेतली जाईल


आपल्या पाक मध्ये ओसामा मारल्या गेल्या मुळे आणि  कसाब, अफजलगुरू सारख्या  आतिरेक्यांच्या , दहशदवाद्यांच्या  कॉंग्रेस भारत सरकारच्या संरक्षण क्षमतेचा भरवसा आल्या मुळे  अनेक दहशदवादी भारतात उघडपणे शरण येण्यास तय्यार झाले आहे.  या संदर्भात दिग्गीराजांना संपर्क साधून त्यांना मदत करण्याची विनंती त्यांनी केली.  राजांनी या कामात दहशदवाद्यांना   संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले असून मतांच्या राजकारणाच्या दृष्टी ने हे कसे आवश्यक आहे,  हे  त्यांनी हायकमांडला लक्षात आणून दिले आहे. . शरण आलेल्या अतिरेक्यांवर भारतात खटले भरून त्यांना तिहार जेल मध्ये Z सेक्युरिटी ची संरक्षण व्यवस्था देण्याची व्यवस्था करण्यात येईल. तसेच सुप्रीम कोर्टाने जरी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली तरी राष्ट्रपती कडे दयायाचना अधिकार असल्या मुळे आणि भारतातील कुप्रसिद्ध लालफितीच्या कारभारा मुळे यांना जन्मभर फाशी होणार नाही याची खात्री सरकारने दिली आहे . आणि पुढे मागे चांगल्या वर्तवणूकीच्या वागण्यामुळे शिक्षा कमी होऊन सुटल्या वर लोकसभा विधानसभा मध्ये निवडून आणण्याची जबाबदारी घेतली जाईल असे आश्वासन देण्यात आले.जय हो जय हो जय हो जय हो

No comments: