Translate

Tuesday, April 3, 2012

हे महाराजांचे दुर्देव नसून आमचे दुर्देव आहे.....

इतिहासात आज दिनांक..
३ एप्रिल..........
 ....... जय शिवाजी जय भवानी म्हणत शिवाजी महारांजाचा वाढदिवस दोनदोनदा साजरा करणाऱ्या मराठी नेत्यांना , रस्त्यावर डीजे लाऊन मदिराक्षीच्या तालावर अचकट विचकट नाचणाऱ्याना शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या नेत्यांना , त्यांचा चाहत्यांना फेसबुक वरील गर्वच नाही तर माज आहे म्हणनारयाना आज महाराजांना श्रद्धांजली वाहण्या साठी,  एक श्रद्धांजली POST लिहिण्याची गरज वाटली नाही........वेळ नाही ....... हे महाराजांचे दुर्देव नसून आमचे दुर्देव आहे.
alt१६८० छत्रपती शिवाजीमहाराजांचे रायगड मुक्कामी निर्वाण झाले. अवघ्या ५० वर्षांच्या आयुष्यात छत्रपतींनी इतिहास बदलून टाकला. भारताच्या इतिहासात लोकहितकारी स्वराज्याचे दूरदर्शी संस्थापक म्हणून ते ज्ञात आहेत. आदिलशाही, मुघलशाही, पोर्तुगीज, सिद्दी, इंग्रज यांच्याशी झगडून महाराजांनी स्वराज्य स्थापले. हे स्वराज्य लोकहितकारी व धर्मसहिष्णू धोरण राबविणारे राज्य होते. उत्कृष्ट लष्करी यंत्रणा, किल्ले राखणे, आरमार उभारणे या बाबतीत महाराज अग्रेसर होते. महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब स्वत:ची राजधानी सोडून २७ वर्षे दक्षिणेत आला, परंतु तो स्वराज्य बुडवू शकला नाही.

No comments: