Translate

Saturday, June 18, 2011

कसाब भारतीय रहवाशी... दोन वर्ष झालेत ....भारतीय नागरिक त्यास चेष्टे ने  सरकारचा जावई म्हणतात . हिंदूत  जावयाचे फार महत्व आहे म्हणुन  या जावयाच्या संरक्षणाकरता भारत सरकारने   आता पर्यंत रुपये १० करोडच्या वर खर्च केलेत... .खाणे पिणे मान सन्मान खर्च वेगळा.    भारतीय नागरिक आयुष्यभर सुखसोयी युक्त चैनीचे जीवन आरामात जगला  तरी  एव्हढे करोड रुपये खर्च करू शकणार नाही यातील बरेच करोडो रुपये तो बचत करेल..... ही  गोष्ट वेगळी.. लवकरच कसाब  मतदानाच्या हक्कास पात्र होईल..............................


आणि त्या  नंतर तो आपल्या महान भारतीय लोकशाहीच्या निवडणुकीस उभा राहण्यास पात्र होईल.... मग कॉंग्रेस वाल्याचा वाल्मिकी झाल्याचे उदाहरण देत त्यास  निवडणुकीत उभे करण्याचे कार्य करून  सर्वधर्म समभाव या गोडस तत्वा खाली तिकीट देऊन निवडून आणील . महेश भट्ट शबाना सारखे  पुरोगामी आहेतच प्रचाराला. ... आणि एक दीवस हाच  कसाब मंत्री... उपमुख्यमंत्री....खासदार... असा प्रवास करत.... थेट लाल किल्ल्यावरून १५ आगस्ट ला  तिरंगा  झेंडा फडकवताना दिसेल. लाल किल्ल्या  वरून राष्ट्राला उद्देशून भाषण करताना  भारताने  पाकच्या  दहशद्वाद्याचा अंतकवादाचा महात्मा गांधीजीच्या अहिंसेच्या   मार्गाने पराभव केला. हे सांगण्यास ही तो विसरणार नाही .  या करता आण्णा बाबा सारख्यांना लोकांनी अडथळे आणले पण सरकारने स्वबळावर यांना निपटले हे सांगण्यास ही तो विसरणार नाही...... जय हिंद जय पाक म्हणत आपले भाषण संपवेल तेंव्हा भारत-पाक च्या 150 कोटी जनतेचा उर अभिमानाने भरून येईल..... कारण त्यांचे भारत-पाक एकीकरणाचे स्वप्न पूर्ण झालेले असेल..... या खास प्रसंगी शबाना महेश भट्ट आणि इतर पुरोगाम्यांना भारत-पाक रत्नाने सन्माना ने नावाजले जाईल .  आता  आपणास  लवकरच संजूबाबा नंतर कसाब कडून गांधीगिरीचे धडे घ्यावे लागतील. आणि हा दुग्धशर्करा योग पाहून महात्मा स्वर्गात कींवा जेथे कोठे असेल देव जाणे तेथून हे प्रवचन ऐकून आनंदाने अश्रू ढाळेल.करोडो लोकांच्या डोळ्यातून ही आनंदाश्रु  वाहतील. कॉंग्रेसचा तर प्रश्नच नाही पण बाकीच्या जनतेनेही सिंधू नदी भारतातून वाहण्याचे जे स्वप्न पाहीले होते ते अश्या तऱ्हेने सत्यात उतरल्या मुळे त्यांच्या डोळ्यात ही आनंदाश्रू नक्कीच येतील

No comments: