Translate

Thursday, May 20, 2010

बलात्कार,खून राजकारण्यांची दगाबाजी या बातम्या सकाळी उठून वाचून मन खराब करण्या पेक्षा

बंगल्याला नाव देऊन 'ऍग्रोवन'बद्दल कृतज्ञता
सातोना (जि. जालना) - एखादे वृत्तपत्र कोणाच्या आयुष्यावर किती प्रभाव पाडू शकते, त्याचे पूर्ण आयुष्यच बदलण्याचे सामर्थ्य वृत्तपत्रात असते काय, या प्रश्‍नांचे उत्तर आहे, "होय!' "ऍग्रोवन'चा नियमित वाचक असलेल्या बाळासाहेब बिडवे यांचे आयुष्य या दैनिकाने बदलले आहे. काही वर्षांपूर्वी हजारांत कमाई करणारा हा शेतकरी आता लाखांत उत्पन्न मोजू लागला आहे. "ऍग्रोवन'मधून मिळालेल्या ज्ञानाप्रती कृतज्ञता म्हणून या शेतकऱ्याने आपल्या नव्याने बांधलेल्या घराचे नाव ठेवले आहे, "ऍग्रोवन!' अवघ्या कुटुंबासह जाणतेपणाने आणि नियोजनबद्धरीत्या शेती करणाऱ्या सातोना येथील बाळासाहेबांची ही यशोगाथा महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरावी!
On 5/20/2010 5:13 PM thanthanpal said:
बलात्कार,खून राजकारण्यांची दगाबाजी या बातम्या सकाळी उठून वाचून मन खराब करण्या पेक्षा मी स्वत शेतकरी नसून सुधा सकाळी उठल्या उठल्या प्रथम अग्रोवन वाचतो.आजच्या अंधकारमय जगात शेतकरी परिवारांच्या विकासाच्या, मेहनतीच्या बातम्या वाचल्या तर सकाळ मंगलमय होते जगण्याची उम्मीद निर्माण होते.आज मी ५० च्या पुढे आहे.शेती करण्याची जिद्द मात्र अग्रोवन मुळे आली.आणि मी नक्कीच शेती करेन.मनात एक विचार नेहमी येतो. जर शेतकऱ्याने संप करून शेती उत्पादन बंद करावे म्हणजे या सर्व मस्तवाल लोकांचे डोळे उघडतील .शुभ
Thursday, May 20, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: agrowon,   agriculture,   snn,   jalna


आनंद गाडे : सकाळ न्यूज नेटवर्क
सातोना (जि. जालना) - एखादे वृत्तपत्र कोणाच्या आयुष्यावर किती प्रभाव पाडू शकते, त्याचे पूर्ण आयुष्यच बदलण्याचे सामर्थ्य वृत्तपत्रात असते काय, या प्रश्‍नांचे उत्तर आहे, "होय!' "ऍग्रोवन'चा नियमित वाचक असलेल्या बाळासाहेब बिडवे यांचे आयुष्य या दैनिकाने बदलले आहे. काही वर्षांपूर्वी हजारांत कमाई करणारा हा शेतकरी आता लाखांत उत्पन्न मोजू लागला आहे. "ऍग्रोवन'मधून मिळालेल्या ज्ञानाप्रती कृतज्ञता म्हणून या शेतकऱ्याने आपल्या नव्याने बांधलेल्या घराचे नाव ठेवले आहे, "ऍग्रोवन!' अवघ्या कुटुंबासह जाणतेपणाने आणि नियोजनबद्धरीत्या शेती करणाऱ्या सातोना येथील बाळासाहेबांची ही यशोगाथा महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरावी!

बाळासाहेब दररोज न चुकता दोन किलोमीटरवरून "ऍग्रोवन' घेऊन येतात अन्‌ मगच कामास प्रारंभ करतात. सतत पाच वर्षे त्यांचा हा नित्यक्रम सुरू आहे! ते म्हणाले, ""काही वर्षांपूर्वी हजारांत उत्पादन घेणारे आम्ही "ऍग्रोवन'मुळे आज लाखांत उत्पन्न घेऊ लागलो आहोत. व्यावसायिक शेतीचे महत्त्व आम्ही जाणले. पीक, पाणी, खत, कीटकनाशकांचा शास्त्रशुद्ध वापर करू लागलो. यंदा दहा लाख रुपये खर्चून घरही बांधले! "ऍग्रोवन'मुळे हा आत्मविश्‍वास मिळाला, म्हणून नव्या बंगल्याला "ऍग्रोवन' हे नाव अभिमानाने दिले.''
लाखात उत्पन्न वाढणे हा बाजारभावाचा परिणाम नाही. माझ्या शेतमालाचा दर्जा, उत्पादनाबाबत "ऍग्रोवन'मुळे आत्मविश्‍वास निर्माण झाल्यानेच मी उत्पादनाचे उत्तम नियोजन करू शकलो. पाण्याचे महत्त्व जाणून संपूर्ण 15 एकर क्षेत्र ठिबक व तुषार सिंचनाच्या माध्यमातून बागायती केले. त्यामुळे आमचा कोरडवाहू भाग मला आता बागायतदार म्हणून ओळखतो, असे त्यांनी सांगितले.

बाजारभाव, तंत्रशुद्ध लेख, देश-विदेशातील शेतीविषयक घडामोडी बाळासाहेबांच्या नजरेतून सुटत नाहीत. शेतकऱ्यांच्या यशोगाथांना त्यांचे प्राधान्य असते.
दहावी उत्तीर्ण असलेले बाळासाहेब आपल्या यशाची तंत्र-शास्त्रशुद्ध मांडणी करतात. ते म्हणाले, ""यशोगाथांमधून आत्मविश्‍वास मिळतो. राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांशी संवाद साधता येतो. एकत्रित बाजारभावांमुळे बाजाराचा अंदाज येतो. निर्णय घेणे सोपे जाते. शेतकरीविरोधी धोरणाविरोधात पहिला आवाज हा "ऍग्रोवन'चाच असतो.''








माझा अग्रोवनला शतशः प्रणाम ....अग्रोवनने जी काही कृषी शास्त्राच्या ज्ञानाची मुक्त हस्ताने उधळण केली...ती वाखाणण्याजोगी आहे ...अग्रोवनच्या प्रत्येक पत्रकाराचा दृष्टीकोन शास्त्रीय तर असतोच पण त्याला जोड असते ती मधाळ मायबोलीची आणि शब्दांची......कौतुक कराव तेवढ थोडच......सकाळला विनंती अग्रोवानाच्या लेखांचा डेटाबेस तयार करून तो CD - ROM च्या रुपात उपलाभ्ध करून द्यावा.
On 5/20/2010 5:37 PM rahul said:
हो अइहे गरज ऐशा दैनिका चे
On 5/20/2010 5:13 PM thanthanpal said:
बलात्कार,खून राजकारण्यांची दगाबाजी सकाळी उठून वाचून मन खराब करण्या पेक्षा मी स्वत शेतकरी नसून सुधा सकाळी उठल्या उठल्या प्रथम अग्रोवन वाचतो.आजच्या अंधकारमय जगात शेतकरी परिवारांच्या विकासाच्या, मेहनतीच्या बातम्या वाचल्या तर सकाळ मंगलमय होते जगण्याची उम्मीद निर्माण होते.आज मी ५० च्या पुढे आहे.शेती करण्याची जिद्द मात्र अग्रोवन मुळे आली.आणि मी नक्कीच शेती करेन.मनात एक विचार नेहमी येतो. जर शेतकऱ्याने संप करून शेती उत्पादन बंद करावे म्हणजे या सर्व मस्तवाल लोकांचे डोळे उघडतील .शुभ
On 5/20/2010 4:52 PM Vishwambhar Borde said:
बेस्ट wishes तो agro-one
On 20/05/2010 15:35 majesheer puneka said:
अग्रोवान आगे बढो हम तुम्हारे साथ हे
On 5/20/2010 2:24 PM Sumeet Mali said:
Sakal paper ni "Agrovan" ha Khup changla upakram rabavila ahe. Hya mule Balasaheb Bidve ya sarkha shetakaryanna uttam pik ghenyasathi madad milte.
On 5/20/2010 2:12 PM S.R.Jadhav said:
I am working in a agri bank and over the years I clould get valuable information from Agrovon. Long live agrovon
On 5/20/2010 1:17 PM ek wachak said:
अतिशय छान! सकाळ ने असे उपक्रम चालू ठेवावेत.
On 5/20/2010 12:42 PM prajakta said:
फारच छान!
On 5/20/2010 11:55 AM AM said:
शेती हा चांगला व्यवसाय आहे पण बहुतेक वेळा जमिनीचे वाद भाऊ बंदकी याच गोष्टीत जास्त वेळ जातो.
On 20/05/2010 11:54 Kirti said:
मझ्या बाबांची factory आहे . शेतीशी काहीही संबध नाही तरी पण ते नियमितपणे agrovan वाचतात . आता मला पण सवय लागली आहे आणि खूप चांगली माहिती मिळते .
On 5/20/2010 11:26 AM janaki said:
सकाळ चे अभिनंदन.
On 5/20/2010 11:15 AM vaibhav said:
आपले हार्दिक अभिनंदन.अग्रोवन ला शुभेच्चा.
On 5/20/2010 11:00 AM अस्सल मराठी said:
असाच बळीराजा प्रगती करत राहो...
On 5/20/2010 10:13 AM VASANTA said:
Very good Project By SAKAL PAPERS LTD.Heartly Congrass SAKAL PAPERS
On 5/20/2010 9:29 AM Ek Wachak said:
छान बातमी आहे. शेतकऱ्यांसाठी आधुनिक आणि सोयीस्कर प्रयत्न केले हि फार गर्वाची बाब आहे. इतर शेतकऱ्यांनी यातून प्रेरणा घ्यायला हवी म्हणजे शेतीत उद्पादन चांगले होईल.
On 5/20/2010 6:52 AM Sakeena Khan said:
Nice news...
On 5/20/2010 1:08 AM sam said:
इसकाळ खूप छान. असेच पुढे जात राहा. तुम्हाला आमच्याकडून शुभेछ्या.
On 5/20/2010 12:13 AM Sangamnath, NJ, USA said:
'ऍग्रोवन' अजूनही चालतो यातच सकाळच यश आहे...अश्या दैनिकाची खूप गरज होती आणि अजून हि इतर भाषांमध्ये ती आहे...
  
 
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

No comments: