Translate

Tuesday, December 8, 2009

राजाच्या राणीचे ठीक आहे. हो. . .. तीला गरिबी,भूक, काय असते हे माहित असायचे कांहीच कारण नव्हते पण लोकशाहीत जनते कडून निवडून आलेले सरकार असे निर्णय घेते याचे दुख: जास्त..... ,


मोहाच्या फुला पासून दारू,ज्वारी,बाजरी अन्न धान्य यांचे पासून दारू असे क्रांतिकारक निर्णय घेणारे सरकार जगात गेल्या 10000 वर्षात झाले नाही. या निर्णया मुळे महाराष्ट्र सरकारचे नाव वर्ल्ड गिनीज बुक ऑफ रेकार्डस मध्ये ताबोडतोब सामील केले गेले पाहिजे.
मोर्च्या ने पाव रोटी धान्य मागायला आलेल्या जनतेस  फ्रांस च्या उर्मट राणीने जनतेला पाव भेटत नसेल तर केक खा असे उत्तर दिले दिले. त्या नंतर जनतेच्या रागाचा उद्रेक झाला , अक्षरश: रक्ताचे पाट वाहिले आणि देशभर अराजक, हिंसाचार याचे थैमान सुरू झाले. आणि जग प्रसिद्ध फ्रेंच राज्य क्रांती झाली.त्यात राज घराण्याचा  शिरच्छेद झाला.राजाच्या राणीचे ठीक आहे. हो. . .. तीला गरिबी,भूक, काय असते हे माहित असायचे कांहीच कारण नव्हते , ती तर तोंडात सोन्याचा चमच्या घेवून जन्मली होती.
पण लोकशाहीत जनते कडून निवडून आलेले सरकार असे निर्णय घेते 
याचे दु:ख जास्त आहे . हे धक्का:दायक चीड आणणारे आहे. हे  राजकारणी नेते इतिहासा पासून  कांही अक्कल शिकले नाही, असे वाटते. माझे  मना बन दगड..... या घाणी चेच खत होईल. असे झाले तर सरकारने असेच निर्णय  घ्यावे व क्रांतीचा मार्ग मोकळा करावा हीच आपण प्रा र्थ ना करू शकतो.
शराब की बोतल से जिन्न निकला
और उस नेता  से बोला  
-”हुकुम मेरे आका!
आप जो भी मुझसे मंगवाओगे
वह ले आउंगा
बस शराब की बोतल नहीं मंगवाना
वरना मुझसे हाथ धोकर पछताओगे..... मगर फिर भी नेताजी नही माने और शराब बनाने की ठान बेठे ... देखो आगे आगे होता हें क्या ?
??               

Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

No comments: