

अत्याचार करणारा क्रूर बलात्कारी बाल वयाचा म्हणून त्यास सौम्य शिक्षा द्या म्हणणारे मानवतावादी याच देशात राहतात मेलेल्या प्रेतावरील टाळूचे लोणी खाणारे आपले बेईमान भ्रष्ट्र राजकारणी , सेलिब्रेटीज आणि मिडीया मात्र झालेल्या बलात्कार आणि त्याच्या बातम्यांचा आपल्या फायद्या साठी दुरुपयोग करत आहेत ......असला दांभिकपणा, हलकटपणा फक्त इंडियातच होऊ शकतो.
सती गेलेली बिचारी महीला जळून जाऊन एकदाच मरून जात होती. पण बलात्कार झालेली महिला जर दुर्देवाने जिवंत राहिली तर तिला जगण्या पेक्षा मेले असते तर बरे झाले असते असे वाटायला लागते. तीची अशी दुरावस्था मिडीया,समाज आणि आपली न्यायव्यवस्था करते . त्याच बरोबर आरोपीचा बचाव करताना पीडीत महीलाच बदचलन होती असा आरोप सरास केला जातो. बलात्कार कसा झाला , आरोपीने कोठे हात लावला, कसा लावला इत्यादी अवमानकारक प्रश्नाची सरबती करत आरोपीचे कायदेपंडित वकील त्या महीलेवर भर न्यायालयात न्यायधीशांच्या साक्षीने शाब्दिक बलात्कार करत आपली असुरी कामवासना भागवत असतात. बलात्कारी आरोपीस सजा कोणती द्यावी याची वर्षानुवर्षे नुसती चर्चाच होते….

मिडीया बलात्कारी बातम्यांची ब्रेकिंग बातमी सतत क्लिप सह २४ तास दाखवत प्रेक्षकांना, त्यांच्या वैषयिक भावनाना चेतावत असतो. जात धर्म प्रांत शहर खेडे या वरून अश्या बातमीचे महत्व ठरवले जाते. वन्य श्वापदांच्या मागे धावणाऱ्या क्रूर लांडग्या प्रमाणे ,२४ तास ब्रेकिंग न्यूज च्या पाठीमागे धावणारा मिडीया ब्रेकिंग बातम्या साठी बलात्काराची खोठी बातमी तयार करण्यास मागे पुढे पाहणार नाही असे वाटावे इतकी परिस्थिती भयानक झाली आहे.



तर मी ममता बॅनर्जींना विचारू इच्छितो
की , बलात्कार करवून घेण्यासाठी त्या किती नुकसानभरपाई घेणार ? अनीसुर रहमान , प .
बंगालचे मार्क्सवादी आमदार महिलांविरोधातील गुन्ह्यांवर आमच्याकडे उपाय नाही . त्यांचे
सध्या ग्रहच फिरले आहेत , त्याला कोण काय करणार ? ही परिस्थिती कधी बदलणार ते फक्त
ज्योतिषीच सांगू शकतील .
नानकी राम कंवर , छत्तीसगडचे गृहमंत्री या सर्व वक्तव्या मुळे बलात्काराचे गांभीर्य मात्र कमी झाले .
नानकी राम कंवर , छत्तीसगडचे गृहमंत्री या सर्व वक्तव्या मुळे बलात्काराचे गांभीर्य मात्र कमी झाले .
कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया दुखः व्यक्त
करण्या करता सफदरजंग दवाखान्यात जातीने हजर झाल्या. ( रात्रंदिवस महात्मा गांधी च्या नावाने जप करणाऱ्या कॉंग्रेस आणि सोनिया
गांधीना; ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये लागू करण्यात आलेला लष्करी विशेषाधिकार
कायदा (AFSPA) मागे घेण्यात यावा यासाठी गांधीजीच्या अहिंसात्मक उपोषणा
च्या मार्गाने गेल्या १२ बारा वर्षांपासून उपोषण करीत असलेल्या
शर्मिला इरोम या सच्चा भारतीयास भेटण्यास वेळ मिळत नाही . तिच्या नाकात
नळ्या लावून अन्न जबरदस्तीने भरवल्या जाते. आणि उलट तीच्या वरच आत्महत्तेचा गुन्हा
केला म्हणून खटला भरणारे हे सरकार अश्या बलात्कार जातीय, धार्मिक दंगे झाले
तर मतांच्या लाचारी साठी धावून जाते ) आणि कडी से कडी सजा देणे चा वायदा केला.
तशी पत्रे ज्या शिला दिक्षिताना आपली मुलगी दिल्लीत सुरक्षित नाही हे कटू सत्य पचवता
येत नाही तीला आणि गृहमंत्र्याला ज्याला बॉम्ब स्फोटाची आगाऊ माहीती मिळवून देखील ते
थांबवता आले नाही त्यानां पाठविले. आता ही कडी से कडी म्हणजे काय हे हीच्या
सरकारी कायदेपंडिताना आज तारखे पर्यंत ठरवता आलेले नाही हे लक्षात घ्या.

सिंगापूर मध्ये जीव तोडून सर्व
प्रयत्न करून हि निर्भया जिवंत राहीली नाही . परत जन क्षोभ अनावर झाला . सरकारने तातडीने
एक खास विमान तीचे प्रेत आणण्यासाठी सिंगापूरला पाठवले . बलात्कारा नंतर आणि मेल्यावर
तीला विमान प्रवास घडवण्यातच सरकारला धन्य वाटले .
इंग्लंड विरुद्ध खेळलेल्या २०-२०
क्रिकेट सामन्यात युवराज सिंह याला मिळालेला मैन ऑफ दी मैच पुरस्कार याने दिल्ली
मधील बलात्कार पिडीत महीलेला समर्पित केला म्हणे . पुरस्कार समर्पित केला म्हणजे काय
होते हे मला अजुन पर्यंत समजलेले नाहीं . मिळालेला पैसा मात्र हे खिलाडू कधी समर्पित
करत नाही . फक्त बोलाची कढी आणि बोलाचाच भात अशी यांची प्रवृत्ती . नशीब या निर्भया
च्या नावाने रात्रंदिवस २०-२० क्रिकेट मालीका यांनी सुरु नाही केली .
या बलात्काराचा सरकारने इतका धसका
घेतला की त्याचे परिणाम रेल्वे अर्थसंकल्प आणि आर्थिक अर्थसंकल्पावर झाले . तीच्या
नावाने निर्भया एक्स्प्रेस बलिया ते दिल्ली चालू करण्याची घोषणा करण्यात आली . तर चिदंबरम
यांनी स्त्रियांच्या सुरक्षितेते साठी वार्षिक अर्थ संकल्पात रुपये १०००
कोटी चा निर्भया स्थापित केला. आणि सरकारचे बलात्कारा बद्दलचे दायित्व संपविले
.
हा सर्व गोंधळ कमी होता की काय
म्हणून हिंदी सिनेमा जगत या बलात्कारात उतरले . दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना स्वतःला
सुधारण्याची संधी मिळावी, अशी मागणी अभिनेता राहुल बोस याने केली आहे. महिलांवरील अत्याचार
कमी करण्यासाठी आणि स्त्री-पुरुष समानतेसाठी या आरोपींना काम करण्याची संधी दिली जावी,
असेही त्याने सांगितले आहे. राहुल बोस म्हणाला, की जर आपला समाज सभ्यतेकडे वाटचाल करीत
असेल ( कोणता सभ्य समाज बरे याला अभिप्रेत आहे. ) जर आपण भारता पलिकडच्या संस्कृतीचा
विचार करीत असू तर आपण माफीचा नक्कीच विचार करायला हवा. अशी ही मुक्ताफळे याने उधळली
. नशीब बाकी भट्ट कंपनी बोलली नाही. बहुतेक त्याना बलात्कार हे रोजचेच काम असल्या
मुळे फारसे कांही वाटले नाही
दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणावर
आधारित चित्रपटाच्या चित्रीकरणाला बंगाली चित्रपट निर्माते अग्निदेव चटर्जी यांनी सुरुवात
केली आहे. 'अ पॉलिटिकल मर्डर' असे या चित्रपटाचे नाव आहे. महेश भट्ट च्या तोंडाचा घास
याने पळविला . पण सन्नी लियोन ला घेवून भट्ट नवीन सिनेमा याच थीम वर काढत आहे.
बलात्कार पिडीताच्या बलिदाना
नंतर ही दिल्ली मधील बलात्काराचे तांडव थांबण्याची कांही चिन्हे दीसत नाही . उलट बलात्काराचे
प्रमाण अधिक वाढले . बलात्काराष्ट्र हीच दिल्ली ची नवी ओळख झाली आहे.
No comments:
Post a Comment