Translate

Saturday, February 13, 2010

लवकरच भारत-पाक खान कलाकारांचा रंगारंग शो होणार आहे, २५-३० लोक बॉम्बस्फोटात मेले तर काय भिघडले नाही

1) आणीबाणी नंतर इंदिरा गांधी पराभूत झाल्यावर या सोनिया गांधी आपला बाड-बिस्तरा गुंडाळून इटलीला जाण्यास निघाल्या होत्या. तसेच राजीव ला राजकारणात येण्यास यांनी टोकाचा विरोध केला होता हे जनता विसरली नाही. आणि एकदा सत्तेची नशा घेतल्यावर परत जाण्याचे नाव सोडले. आणि स्वातंत्र्यात सहभागा बद्दल नेहरू खानदानाने देश कडून भरपूर मोबदला वसूल केला. इंदिरा गांधी यांनी भिंदरवाल्याचा भस्मासुर स्वत: निर्माण केला. त्या भस्मासुराने राजकारणाने त्यांचाच बळी गेला.देशाचा त्यात कांही संबध नाही. जनतेला हे चांगले समजते


२) राज कोकणात जावून बोलण्या पेक्षा पुण्याला भेट दिली असती तर .. जावू द्या.कोळसा उगाळावा तेवढा काळाच. आपले मराठी प्रेम(कि कांग्रेस प्रेम) राहुल आणि शाहुरुख खान च्या वेळी दिसले .सवतीच कपाळ पांढरे करणाऱ्या करता स्वताचा नवरा मारणे असे आपले धोरण होते.पण मराठी मरणार नाही. सेनेचे नाक कापण्या साठी तुम्ही प्रयत्न केले. पण नियती ने २४ घंट्यातच तुम्ही चूक आणि बाळसाहेब बरोबर होते हे दाखवून दिले. ब्लू स्टार पंजाब, मराठा रेजिमेंट चा २५० वर्षाचा इतिहास डिजिटल बनर मुंबईत लावून राहुल ला उत्तर देवू शकत होता पण नाही.
3) सुशामाजी आपण वाजपायी आडवाणी  मुशरफ ला बिर्याणी,कबाब,रसगुल्ले,मिठाया हाताने भरवत होता.प्रेमाचे प्रतिक ताजमहाल दाखवत होतात.वाजपायी बस चालवत होते  त्यावेळी (पाक) मुशरफ  ने कारगिल केले हे आम्ही विसरलो नाही. जवानांनी तुमची लाज राखली म्हणून एक तरी कामगिरी तुमच्या सरकारच्या नावावर जमा झाली. कंदाहार प्रकरणात तर तुमच्याच जसवंत ने  त्या वेळेची पक्षाच्या धोरणाची लाज जगाच्या वेशीवर टांगली तुमच्या पक्षाला   डोळे मिटून दुध पिणाऱ्या मांजरी सारखी सवय झाली. मतदाता पाहत असतो व कंबरेत लाटणे कधी मारतो हे समजत नाही
4) संसदेवर बोंब हल्ला झाला त्यावेळी आपल्या सरकारने काय दिवे लावले हे माहित आहे सुशामाजी.आणि आपले लोहपुरुष  (का-पुरुष) यांनी पाक मध्ये जावून जिना च्या समाधी वर गुडघे टेकले आणि तोंड फाटे पर्यंत इतकी स्तुती केली कि त्यांचे अध्यक्ष पद गेले.आणि कंदाहार कांड मध्ये जसवंत यांनी स्वत: दहशतवादी दिले त्याच माणसाने नंतर भारतात बोंब हल्ले केले. या प्रकारात जसवंत यांनी त्यांच्या चरित्रात भाजपचे पुरे वस्त्रहरण करून तुमची पूर्ण लाज काढली.धोबी का कुत्ता ना भारत का ना पाकीस्थान का अशी पक्षाची अवस्था झाली.

5) चोरांच्या उलट्या बोंबा, यालाच म्हणतात. हिम्मत असेल, खरे भारतीय असाल तर पाक कलाकारांना बरोबरचे संबंध आधी तोडा. भारतात जे पाक कलाकार काम करण्यास आले त्यावर बहिष्कार टाका. नुसते बोलू नका. कला आणि दहशत वेगळे आहे असा सूर लावणे बंद करा. खान आता तरी चूक मान्य करून पाक खेळाडू घेणार नाही जाहीर  करून देशाची माफी मग. सर्वात महत्वाचे पाक मध्ये भारतीय सिनेमा प्रदर्शित करू नका. खान या सर्व गोष्टी ला तू स्वत: जबाबदार आहे. खालेल्ल्या मिठाशी जाग उघडपणे  पाकीस्थान चा निषेध या सेने कलाकारांनी करावा हे आवाहन आहे.
6) या सर्व नालायक राजकारणा मुळे पोलीस दलावर शारीरिक,मानसिक,भावनिक ताण पडतो याचा कोणीही विचार करत नाही ज्या लोकांना तुरुंगात टाकून मारठोक करून third degree लावून गुन्हा काबुल करून घ्यावयाचा त्यांना मंत्री नेता म्हणून सलूट मारावा लागतो, त्यांच्या देशद्रोही नटांच्या सिनेमाचे रक्षण करून स्वदेशीवर लाठ्या चालवाव्या लागतात. कितीही केले तरी आमचे भारतीय मन आहे हे सर्व दुश्मन वर करण्यास मिळाले तर आम्हास आनंद झाला असता . जनता जनार्दन हो आम्हाला माफ करा , दुख: समजून घ्या.... एक अगतिक  पोलीस मामा

7) हाल्लो, मी जर्मनी मधून शाहुरुख खान बोलतो. पुण्या मधील बॉम्बस्फोटा ची बातमी एकूण मला माझ्या यशाचा आनंद साजरा करता आला नाही पण पुणेकरांच्या दुख: पेक्षा माझा आनंद मोठा नाही म्हणून मी हा आनंद साजरा न करता फक्त शांत पणे झोपून गेलो. कारण एव्हढ्या लांब वरून मी दुसरे काहींच करू शकत नाही. स्फोट करणाऱ्यांनी नेमकी वेळ साधून माझ्या आनंदावर पाणी ओतले म्हणून मी यांचा धिक्कार करतो. आपण हि यांचा धिक्कार करून हिम्मत न हरता सिनेमा पाहावा यशस्वी करून अंतकवाद्यानचे पापी पाक इरादे उधळून लावावे शांतते नंतर येत आहे

8) बोलावं बोलवा पाकिस्थानंचे खेळाडू, कलाकार बोलवा. २५-३० लोक बॉम्बस्फोटात मेले तर काय भिघडले नाही तरी मरण कोणाला चुकणार आहे. म्हणून म्हणतो IPL धंदा झाला पाहिजे. अशोक आबा परकीय कलाकारांना खेळाडूना संरक्षण देण्यास तय्यार आहे. दहाषद वाद्यांचे बॉम्बस्फोट खपवून घेवूत पण स्वदेस प्रेमी भारतीयांना ठेचून काढण्यास ते समर्थ आहे .त्या करता तर तयान दिल्हीने सत्ता दिली. पण सरकार घाबरणार नाही. आणि पाक सरकारशी वाटाघाटी करणारच असे सरकारी प्रव्रक्त्याने सांगितले लवकरच भारत-पाक खान कलाकारांचा रंगारंग शो होणार आहे
9) कला, क्रीडा क्षेत्रात ही असली बंधने कशासाठी? खान हि बंधने तू पळू नकोस पण एक काम कर सरळ पाकिस्थानात निघून जा .ज्या समाजाच आपण मीठ खातो,त्या मिठाला आपण जागले पाहिजे. अरे कुत्रा सुद्धा दिलेल्या अन्नाचा मान राखत इमानदार राहतो. पण तुझ्या सारखे बेईमान आणि राजकारणी यांनी देशाचा सत्यानाश केला. भारतातील  कलाकारांना खेळाडूना मान द्या,त्यांना पाक मध्ये काम करू द्या.आंतकवादी हल्ले करू नका म्हणून आधी सांग या वेळी तू आणि लालची सिने जगत शेपूट का घालते. तू असे म्हणालास तर उद्या मन्नत वर पाक हल्ला करेल
10)काश्मीरमधे दहशतवादाचा सामना करायला सरकार रोज़ प्रचंड किंमत देतं. हा विचार १०१% चूक आहे. ही भरपाई भारतीय जनता देते  कांग्रेस पुढारी नेहरूंनी हिमालया एव्हढी मोठी चूक जी करून ठेवली त्याची भरपाई भारतीय जनता दहशत वादाच्या रूपाने आज भोगते. आणि काश्मीर मध्ये भारतीय कायदे सरकार कांग्रेस/भाजप कोणतेही असो का लागू करत नाही. यांच्या चुका मुळे हजारो भारतीय सैनिक नाहक बळी पडत आहे. नेते कधी दहशत वादी हल्ल्यात मेले का ? आणि जे मेले ते आपल्या कर्माने मेले, या मुळे उगीच छाती बडविण्यात अर्थ नाही.
११)  राहुलने बिहारींनी युपी ने महाराष्ट्राला वाचवले आस प्रचार खोटा केला तेंव्हा उलट इंदिरा गांधी च्या राजकारणामुळे पंजाब पेटला होता तेंव्हा महाराष्ट्राच्या जनरल अरुण वैद्य यांनी ऑपरेशन यशस्वी करून पंजाब वाचवला,तसेच मराठा बटालियन चा २४० वर्षाचा इतिहास का नाही सांगितला. आंदोलन न करता फक्त मोठे डिजिटल बनर लावले असते तर जगाला महाराष्ट्र काय आहे समजले असते.चीन च्या संकटात सह्याद्री यशवंतरावजी हिमालयाच्या मदती साठी धावले होते या गोष्टी हे आंदोलन करणारे का मांडत नाही.केवळ मराठी-मराठी करून फुट पाडु नका raj 
१२ ) राज च्या मराठी प्रेमा बद्दल शंका येते . आमदारांचे निलंबन मागे घेण्या साठी राज ने तडजोड केली असेल. बच्चन चा या वादाशी संबध नाही.याला या वादात ओढून राज जुने हिशोब पूर्ण करत आहे. त्याच प्रमाणे राज कडे कोण काम करतात हे सुद्धा त्याने जाहीर केले नाही. मराठी माणसाचा शत्रू मराठी माणूसच आहे. राज आंदोलन करतो तर उद्धव गप्प बसतो, आणि उद्धव आंदोलन करतो तर राज गप्प बसतो यांच्या भांडणात मराठी माणसाचे नुकसान होते. दक्षिणेत जेंव्हा असे होते तेंव्हा सर्व नेते एक होतात.यामुळे यांनी एकत्र यावे किंवा मराठीचे राजकारण  सोडावे
१३) राहुल गाँधी मुंबई मध्ये आल्यावर त्याचा साधा निषेध सुद्धा आपल्या नेत्यानी का नाही केला? सवत विधवा व्हावी म्हणून आपल्याच नवरयाला मारने असे खेड्यात म्हणतात हा सवती मत्सर इतका असतो की त्या  बाईला आपण आपलाच नवरा मारतो आहोत याचे भान  ही राहत नाही आणि ती स्वता ही नवरा मेल्या मुले विधवा होते.  आपले वागणे या सवती सारखे च झाले आहे. या सवती मत्सरात मराठी माणुस विधवा झाला.

   कमीत कमी  महाराष्ट्राचा गोरवशाली इतिहास सांगणारे डिजिटल  बनर  भिंदर वाला हे पंजाब मधील राक्षस मारणारे वैद्य अरुण महाराष्ट्रियन होते हे तर जगाला सांगू शकला असता .  आता मधे काय राजकारण शिजले आणि आपण माघार घेतली हे अशोकराव आणि राज साहेबानाच माहित. पण झाले ते चुक झाले मराठी च्या मुद्द्या वर महाराष्ट्राचे नेत्यात कांग्रेस ने फुट पाडून बाजी जिंकली
@@ )कांग्रेस ला महाराष्ट्रा बद्दल आकस आहे कारण दिल्ही च्या सुलतानाला महाराष्ट्रा तील शिवाजीने हेरण केले होते अखेर शिवाजी-शिवा करत य्ताचे येथेच थडगे उभारावे लागले मनमोहन मोन्तेक्सिंग सारखे अर्थतज्ञ असताना महागाई चे खापर शरद पवारावर फोडणे चूक आहे. आणि ते जर जबाबदार असतील तर त्यांना मंत्री मंडळातून का काढले जात नाही सरकारची हिम्मत का होत नाही पंजाब कांग्रेस मुळे तुटण्याच्या मार्गावर आला तेंव्हा सुद्धा अरुण वैद्य च्या रूपाने आणि चीन च्या संकटात यशवंतराव च्या रूपाने सयाद्री पर्वत दिल्ही च्या मदतीला गेलाThanks & regard,

No comments: