Translate

Wednesday, July 18, 2012

रिकामे स्टेडियम हाच पाकिस्तानचा धिक्कार ........

या देशात देशहिताचा हा आवाज ........फक्त मराठी माणूसच उठवू शकतो ........पाक क्रिकेट संघाला क्रिकेट प्रेमी खेळाडू असून हि आधी सुनील गावस्कर यांनी विरोध केला ....आता बाळासाहेब ......' संपूर्ण देश पाकिस्तानच्या विरोधात असताना ज्या क्रिकेट बोर्डानं पाकड्यांना भारतात आमंत्रित केलं ; त्या क्रिकेट बोर्डाला मुंबईच्या ताज हॉटेलसमोर आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसवर चाबकाने फोडून काढलं पाहिजे ',...भारतात स्फोट घडवून आणणा-या पाकड्यांशी शांतीवार्ता करणे हे ढोंग आहे व क्रिकेट खेळणे हा राष्ट्रद्रोह आहे. क्रिकेट बोर्ड पैशाला चटावले आहे व पैशांसाठी देशाची सुरक्षा व इज्जतीचा बाजार मांडायलाही तयार झाले आहे. इतके निर्लज्ज व भयंकर लोक ज्या देशात आहेत त्या देशाचे पाकिस्तान व्हायला कितीसा वेळ लागणार ?, असा उद्विग्न सवालही त्यांनी केला.  
पाकिस्तानसोबतच्या मालिकेला विरोध करणा-या लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांचं त्यांनी अभिनंदन केलंय. क्रिकेट बोर्डाचा राष्ट्रद्रोही मुखवटा फाडून गावस्करांनी शंभर कोटी देशवासीयांच्या भावनेला तोंड फोडलं आहे. पाकिस्तानशी क्रिकेट नको तर युद्ध हवे हीच देशवासीयांची भावना आहे. पाकिस्तानशी युद्ध करण्याची धमक काँग्रेस आघाडी सरकारमध्ये नाही. शिवसेना काय करायचे ते करीलच , पण ' २६/११ ' ची वेदना शिल्लक असेल , राष्ट्राभिमानाची ज्योत पेटली असेल , तर एकही क्रिकेटवेडा पाकिस्तानचा सामना बघायला स्टेडियमवर जाणार नाही. रिकामे स्टेडियम हाच पाकिस्तानचा धिक्कार आणि ' २६/११ ' च्या हुतात्म्यांना श्रद्धांजली ठरेल , अशी भावनिक सादही बाळासाहेबांनी घातली आहे.
म्हणूनच दिल्ही चा महाराष्ट्रा बद्दल कायम राग आहे......नेहरू  तर शिवाजी द्वेष्टे होतेच पण त्यांच्या पुढील वारसांनी सुद्धा महाराष्ट्रीय नेतृत्व खच्ची करण्याचा कायम प्रयत्न केला...आता हे सर्व गळे काढत क्रिकेट आणि दहाषदवाद यात सरमिसळ करू नका खेळला खेळ म्हणून बघा....दुश्मनीचे रंग भरू नका म्हणत नार्काश्रू ढालतील........

No comments: