Translate

Thursday, June 21, 2012

उशिरा मध्यरात्री बाबाना या आगीचे मैनेजमेंट कसे केले? असे विचारणारा फोन......

मुंबईतील मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगी नंतर मुंबईतील राजकीय वातावरणा बरोबरच बिल्डर लोबी हि सक्रीय झाली असून या आगीचा फायदा करून घेत आपली राजकीय आर्थिक पोळी भाजून घेण्याची सर्वांची धडपड सुरु झाली आहे....

मुख्यमंत्री हे अकार्यक्षम असल्या मुळे हि आग लागल्याची भीषण घटना असून या मुळे महाराष्ट्राची मान खाली झाली आहे........त्यांचा त्वरित राजीनामा घेण्यात येऊन नवीन मुख्यमंत्री नेमण्यात यावा या करता मुख्यमंत्री विरोधी गट सक्रीय झाला आहे...नवीन मुख्यमंत्री अजित  दादना आणि राष्ट्रवादीला  पुरून उरणारा असला पाहिजे असे हि प्रयत्न सुरु झाले आहेत......

त्याच बरोबर या आगी मुळे मुख्यमंत्र्यांना अकार्यक्षम म्हणणाऱ्यांची तोंडे आपोआप बंद झाली आहेत.....या आगीत जळलेल्या फाईली मुळे कॉंग्रेस चा प्रचंड फायदा झाला असून याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल.....म्हणून दिल्ही ने पृथ्वीराज चव्हाणांचे हाथ मजबूत करावेत अशी मागणी मुख्यमंत्री गोटा तर्फे करण्यात आली.......

तर शिवसेनेने हे आगीचे  पाप, षड्यंत्र  कॉंग्रेसचेच  आहे असा आरोप करत २०१४ मध्ये हे आगलावे भ्रष्ट्र कॉंग्रेसचे  सरकार हाणून पाडण्याचे आव्हान मराठी जनतेला महाराजांच्या ,  आई अंबाबाई च्या साक्षीने केले......

या मागे  मंत्रालयातील बिहारी UP वाल्या नौकरशाही भय्यांचा  नक्कीच हाथ आहे.... तर म्हणून म्हणतो बाबानो आता फसू नका......मला माझ्या मनसेला मत द्या....आर्धी सत्ता नको ...पूर्ण बहुमत द्या........मग पाहतो आगी कश्या लागतात? ते.......माझ्या महाराष्ट्रतात आगी न लागण्याची मी ब्लू प्रिंट च तय्यार केली आहे.....सत्तेत आलो की ती मी राबवणार आहे.........

या आगी मागे पाकिस्थानी अंतकवाद्यांचा हाथ असण्याची शक्यता नाकारता येत नाही.....त्या दिशेने पोलीस तपास चालू झाला असून मुंबईत रेड अलर्ट जारी केला गेला आहे......देशातील सर्व लोकशाही मंदिरांची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.......नागरिकांनी शांतता पाळावी डगमगून जावू नये असे आवाहन मुंबई कमिशनर यांनी केले.......

रामदास आठवले यांनी ही आग लागलेली मंत्रालयाची नवीन इमारत येथेच पुन्हा न बांधता नवीन ठिकाणी बांधावी ...आणि या जागी बाबासाहेबांचे स्मारक उभे करावे अशी जोरदार मागणी केली आहे....लवकरच ते या जळलेल्या मंत्रालयावर धडक मोर्चा नेणार आहेत.........

मंत्रालय मेकओव्हरचे काम एका खाजगी बिल्डरकडून करुन घ्यायचे व त्या बदल्यात त्याला मंत्रालयासमोरचा मोठा भूखंड देण्याचा प्रस्ताव चर्चेत होता. मात्र,  उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी प्रत्येक विभागाने किमान पाच कोटी दिले तरी मंत्रालय चकाचक होईल असे सांगून मेकओव्हरच्या प्रस्तावातली हवाच काढून घेतली होती . या मुळे नाराज असलेल्या छगन भुजबळ यांनी या आगीचे मनातल्या मनात स्वागत केले.....आणि नव्या उमेदीने संपूर्णच नवीन मंत्रालय बांधण्याचा हजारो कोटीचा प्रस्ताव आपल्या सुनांच्या मालकीच्या कंपनी मार्फत सरकारला सादर करण्याचे ठरविले......

हा प्रस्ताव प्रकल्प आपल्यालाच मिळावा म्हणून बिल्डर्स लॉब्या सक्रीय झाल्या असून या दृष्टीने आपल्या मार्गात धोंडा असणाऱ्या बाबांना हटविण्यास जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत......मुख्यमंत्रीपदी अशोकराव किंवा विलासराव हेच आदर्श मुख्यमंत्री असावे असे पक्के झाल्याचे समजते.........

उशिरा मध्यरात्री बाबाना या आगीचे मैनेजमेंट कसे  केले? आणि याचा उपयोग महापालिकेच्या जुन्या झालेल्या इमारतीत करता येईल का ? असे  विचारणारा फोन मातोश्री च्या परिसरातून आला होता अशी पत्रकारात चर्चा आहे.....

मेरा अज़्म इतना बलंद है कि पराये शोलों का डर नही !
मुझे ख़ौफ़ आतिशे-गुल से है कही ये चमन को जला न दे !!

Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-

http://www.thanthanpal.blogspot.com

1 comment:

अमोल केळकर said...

हा हा हा मस्तच टिपण्णी ...