Translate

Tuesday, December 17, 2013

हा अडचणीचा प्रश्न ना सत्ताधारी - ना विरोधी पक्षाला पडतो



एकीकडे बेईमानी भ्रष्ट्राचार या विरुद्ध संसदेत जोकपाल… माफ करा…….   लोकपाल कायदा संसदेत मंजूर करत असतानाच दुसरीकडे मात्र  परदेशात भारताची नाचक्की , बदनामी करणाऱ्या भ्रष्ट्र नौकरशाहीला वाचवायचा जीव तोडून प्रयत्न सरकार करत आहे .…… हे फक्त इंडिया मध्येच घडू शकते … भारतीय सुसंस्कृतीचे परदेशात प्रतिनिधित्व करणाऱ्या परराष्ट्रीय सेवेत , कार्यालयात मुळात  अश्या भ्रष्ट्र बेईमान अधिकाऱ्यांची निवड कशी केली जातेब ????? …… हा अडचणीचा प्रश्न ना सत्ताधारी पक्षाला ना मांडावली- तोडपाणी करणाऱ्या  विरोधी राजकीय पक्षाला पडतो .…… ना बटीक मिडिया , वर्तमान पत्रांना  पडतो .


दहशदवाद अंतकवाद बॉम्बस्फोट अतिरेकी कार्यवाया घुसखोरी करत हजारो भारतीय जनतेच्या ,  सैनिकांच्या हत्या करणाऱ्या पाकिस्तान विरुद्ध कार्यवाई तर सोडाच पण चक्कार  शब्द न बोलणारे  भारतीय राजकारणी नेते ……. मात्र……  एका भ्रष्ट्र कारभार करणाऱ्या, बेईमानी करणाऱ्या, महीला कामगाराचे शोषण करणाऱ्या , बदनाम आदर्श इमारतीत ३-३  फ़्लैट घेणारया   एका सरकारी नौकराची कायदेशीर चौकशी अमेरिकन पोलिसांनी केली तर अमेरिके विरुद्ध कडक कार्यवाई करण्याच्या पोकळ घोषणा करत आहे …… पाकिस्तानात ईतर अनेक परदेशात सामान्य भारतीय नागरिकांना या पेक्षा अधिक चौकशीला सामोरे जावे लागते , त्या भारतीयांना ते देश बेकायदेशीर तुरुंगात ठेवतात तेंव्हा मात्र हे इंडिया सरकार साधा निषेध ही  करत नाही …… कारण ती सामान्य असतात ……… पण एका भ्रष्ट्राचाराची बेईमानीची परंपरा असणाऱ्या अधिकाऱ्याला वाचवण्या साठी इंडिया सरकार आपली प्रतिष्ठा पणाला लावत आहे. अजब आहे .


भारतातून अमेरिकेत राहण्यास गेलेल्या भारतीय नागरिकांशी या बाबत सामाजिक मिडीया द्वारे संपर्क साधला असता त्यांनी इंडिया सरकारच्या धोरणाची चेष्टा केली … कोणत्याही अपराध्याची गुन्हेगाराची अशी चौकशी ही  येथे सामान्य गोष्ट आहे . संशयीत गुन्हेगार कितीही मोठा अधिकारी,  राजकीय नेता असो त्यास अश्या चौकशीस सामोरे जावेच लागते , त्यात कांही चूक नाही .  देशाच्या हीतासाठी हे आवश्यक आहे . पुरुष पोलिस स्त्री पोलिस असा खुळचट प्रश्न येथे कोणाला पडत नाही . या मुळेच September 11, 2001. अमेरिकेवर  दहाषदवादी हाल्ला करण्याची कोण्या अतिरेक्यांची हिम्मत झाली नाही . तुमच्या कडे तर पाहुणे येतात तसे अंतकवादी येत असतात आणि हिंसाचार करून आरामात परत जातात . आणि तुमचे सरकार पोकळ दम देण्या पलीकडे कांही करत नाही .

No comments: