Translate

Thursday, December 19, 2013

" मारुती कांबळेचं काय झाल?" सामना चित्रपट

देवयानी खोब्रागडे  या प्रकरणा वरून सामना हा मराठी  चित्रपट आठवला…. 

आणि त्यातील " मारुती कांबळेचं काय झाल? " ……हा मास्तर, गप, गुमान र्‍हावा की… कशाला उगाच नसत्या चौकशा… आणि त्याच जोडीला ‘सख्या रे घायाळ रे हरिणी ’हे सामना चित्रपटांतील जबरदस्त गाणे व स्मशानशांतता असलेल्या महालांतील ती निघृण हत्या हे सारे आठवले …….… 


सत्तेच्या मस्तीत आपल्या विरोधातील सामान्य माणसाचा खून करणे आणि त्यावर पडदा टाकणे हे राजकारण्याचा/ उच्च पदस्थ नौकारशाहांचा  अधिकार  समजला जातो .…. 


देवयानी च्या अटकेच्या राजकारणाच्या गदारोळात अमेरिकेत देवयानीच्या घरातून गायब झालेल्या संगीता रिचर्डस या मोलकरणीचे काय झाले ??? हा प्रश्न मनाला सतावत आहे .

Tuesday, December 17, 2013

हा अडचणीचा प्रश्न ना सत्ताधारी - ना विरोधी पक्षाला पडतो



एकीकडे बेईमानी भ्रष्ट्राचार या विरुद्ध संसदेत जोकपाल… माफ करा…….   लोकपाल कायदा संसदेत मंजूर करत असतानाच दुसरीकडे मात्र  परदेशात भारताची नाचक्की , बदनामी करणाऱ्या भ्रष्ट्र नौकरशाहीला वाचवायचा जीव तोडून प्रयत्न सरकार करत आहे .…… हे फक्त इंडिया मध्येच घडू शकते … भारतीय सुसंस्कृतीचे परदेशात प्रतिनिधित्व करणाऱ्या परराष्ट्रीय सेवेत , कार्यालयात मुळात  अश्या भ्रष्ट्र बेईमान अधिकाऱ्यांची निवड कशी केली जातेब ????? …… हा अडचणीचा प्रश्न ना सत्ताधारी पक्षाला ना मांडावली- तोडपाणी करणाऱ्या  विरोधी राजकीय पक्षाला पडतो .…… ना बटीक मिडिया , वर्तमान पत्रांना  पडतो .


दहशदवाद अंतकवाद बॉम्बस्फोट अतिरेकी कार्यवाया घुसखोरी करत हजारो भारतीय जनतेच्या ,  सैनिकांच्या हत्या करणाऱ्या पाकिस्तान विरुद्ध कार्यवाई तर सोडाच पण चक्कार  शब्द न बोलणारे  भारतीय राजकारणी नेते ……. मात्र……  एका भ्रष्ट्र कारभार करणाऱ्या, बेईमानी करणाऱ्या, महीला कामगाराचे शोषण करणाऱ्या , बदनाम आदर्श इमारतीत ३-३  फ़्लैट घेणारया   एका सरकारी नौकराची कायदेशीर चौकशी अमेरिकन पोलिसांनी केली तर अमेरिके विरुद्ध कडक कार्यवाई करण्याच्या पोकळ घोषणा करत आहे …… पाकिस्तानात ईतर अनेक परदेशात सामान्य भारतीय नागरिकांना या पेक्षा अधिक चौकशीला सामोरे जावे लागते , त्या भारतीयांना ते देश बेकायदेशीर तुरुंगात ठेवतात तेंव्हा मात्र हे इंडिया सरकार साधा निषेध ही  करत नाही …… कारण ती सामान्य असतात ……… पण एका भ्रष्ट्राचाराची बेईमानीची परंपरा असणाऱ्या अधिकाऱ्याला वाचवण्या साठी इंडिया सरकार आपली प्रतिष्ठा पणाला लावत आहे. अजब आहे .


भारतातून अमेरिकेत राहण्यास गेलेल्या भारतीय नागरिकांशी या बाबत सामाजिक मिडीया द्वारे संपर्क साधला असता त्यांनी इंडिया सरकारच्या धोरणाची चेष्टा केली … कोणत्याही अपराध्याची गुन्हेगाराची अशी चौकशी ही  येथे सामान्य गोष्ट आहे . संशयीत गुन्हेगार कितीही मोठा अधिकारी,  राजकीय नेता असो त्यास अश्या चौकशीस सामोरे जावेच लागते , त्यात कांही चूक नाही .  देशाच्या हीतासाठी हे आवश्यक आहे . पुरुष पोलिस स्त्री पोलिस असा खुळचट प्रश्न येथे कोणाला पडत नाही . या मुळेच September 11, 2001. अमेरिकेवर  दहाषदवादी हाल्ला करण्याची कोण्या अतिरेक्यांची हिम्मत झाली नाही . तुमच्या कडे तर पाहुणे येतात तसे अंतकवादी येत असतात आणि हिंसाचार करून आरामात परत जातात . आणि तुमचे सरकार पोकळ दम देण्या पलीकडे कांही करत नाही .

Monday, December 2, 2013

WANTED SCHOOL PRINCIPAL

महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिक्षण संस्थेला त्यांच्या संस्थेच्या विविध शाळां मध्ये मुख्याध्यापक/ प्रिन्सिपाल यांच्या नेमणुका  करावयाच्या  आहेत . बालवाडी ते बारावी पर्यंत वर्ग असलेल्या आणि सरासरी दोन हजार विद्यार्थी आणि विद्यार्थिनी इंग्रजी बहुभाषिक शिक्षण घेत असलेल्या या शाळां मध्ये कायम स्वरूपी या नेमणुका साठी पुढील पात्रता असणाऱ्या उमेदवारां कडून online अर्ज मागविण्यात येत आहेत .
१) शिक्षण: कोणती ही पोस्ट ग्रैजुऐट पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण . खास करून खाद्य फुड , सेक्युरिटी ,  क्षेत्रातील विषयात प्राविण्य,अनुभव  असलेल्याना  प्राधान्य . 
२) नेमणूक झालेल्या मुख्याध्यापकांना पुढील अशैक्षणिक कामे करणे बंधनकारक आहे.
a ) मुख्याध्यापकाना शाळे तील विद्यार्थ्यां च्या दुपारच्या भोजनाची संपूर्ण व्यवस्था करावी लागेल . भोजन शिजविणे , स्वयंपाकाचे साहीत्य जमा करणे , इंधन ची सोय , पिण्याच्या पाण्याची सोय करणे , जेवणावळी च्या पंगती उठवणे इत्यादी कामे करावी लागतील . संस्था चालकांनी ठरवून दिलेल्या दर्जा चे पालन करत विद्यार्थ्याना विषबाधा होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल .
विषबाधा झाल्यास मुख्याध्यापकास जबाबदार धरले जाईल , आणि त्यावर कायदेशीर कार्यवाई करण्यात येईल . हे लक्षात ठेवावे .
b ) शाळेतील दोन हजार विद्यार्थी / विद्यार्थींनी च्या घर-शाळा-ते घर या दुहेरी मार्गाच्या वाहन वाहतुक व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी या मुख्याध्यापकांची असेल . या वाहतुकीच्या बसेस ची व्यवस्था करणे  ,  बस चालक वाहक यांच्या चालचलन ,वर्तुणूक, शिस्त याची संपूर्ण देखभाल करणे . बसेसच्या इंधन/ऑंईल-पाणी, साफ सफाई , वार्षिक परवाना, वाहतूक पोलिस नियम  यांची संपूर्ण जबाबदारी यांची राहील .

मुख्य म्हणजे बस मध्ये विद्यार्थी/विद्यार्थींनीन वर लैंगिक अत्याचार होणार नाहीत याची काळजी घेणे , यासाठी बसेस मध्ये CCTV कॅमेरे बसविणे , ते चालू राहतील याची दक्षता घेणे , कार्यालयातील पडद्या वरून या कॅमेरया द्वारे बस मधील हालचालीवर नजर ठेवणे , कांही अत्याचार होत असेल तर त्वरित हालचाल करून हा प्रसंग रोखणे . जर बस मध्ये कांही लैंगिक अत्याचार झाला तर मुख्याध्यापका वर कायदेशीर कार्यवाई करण्यात येईल.
c ) शाळा चालवत असतांना संस्था चालकांनच्या आर्थिक हितसंबंधास बाधा येईल असे निर्णय मुख्याध्यापकास कोणत्याही परिस्थितीत  घेता येणार नाहीत. त्याच बरोबर प्रवेश डोनेशन चा काटेकोर हिशोब त्यास ठेवावा लागेल .
d ) निवडणुकीच्या काळात संस्था चालकांच्या निवडणूक प्रचाराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून जिंकण्या साठी साम , दाम , भेद दंड या सर्व मार्गाचा वापर करण्याची धमक त्याच्यात असावी .

e ) संस्था चालकांच्या विविध सहकारी सोसायटी, कारखाने , बँक यांचे समभाग शिक्षकांना विकण्याची कामगिरी त्यास पार पाडावी लागेल .
f ) संस्थेच्या गोपानियतेला बाधा येणार नाही या बद्दल त्यास दक्ष रहावे लागेल .
g ) माहीती आधारा कायद्याच्या अंतर्गत आलेल्या तक्रारीना पळवाटा काढत माहीती न देता माहीती दिल्याचा देखावा त्यास करता आला पाहिजे .
h) शाळेतील संस्था चालकांच्या नौकरी करणाऱ्या नातेवाईकांना , शिकणाऱ्या विद्यार्थ्याना  सन्मानपूर्वक वागणूक त्याने दीली पाहिजे .
i ) सर्वात महत्वाचे म्हणजे पदभार स्वीकारताना त्याला स्व:खुषीने कोऱ्या कागदावर सह्या करून द्याव्या लागतील . त्याच बरोबर राजीनामा लिहून द्यावा लागेल .
वरील सर्व कामे करत असतांना शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याचे आणि विद्यार्थ्याना मेरीट मध्ये उत्तीर्ण करण्याची परंपरा त्यास पार पाडावी  लागेल .
चला तर महान शैक्षणिक कार्यात सहभागी होऊन आपले जीवनमान उच्च करा .

Saturday, September 28, 2013

पोफडे उडालेल्या ...भिंती आणि दरवाजा बरच कांही सांगून जातो

पोफडे उडालेल्या ...भिंती आणि दरवाजा बरच कांही सांगून जातो . जुन्या जमान्यातील एक लोखंडी पलंग …… आणि यशा मुळे आनंदी झालेले नैसर्गिक हसरे चेहरे … कोठला ही मेकअप नाही . शंभर रिटेक केले तरी असले नैसर्गिक हास्य सिनेमातल्या नट नट्या ना देता येणार नाही . खरेच यशा सारखे दुसरे कांही असत नाही ……

नाशिक - घरात अठरा विश्‍व दारिद्य्र... पती पेव्हर ब्लॉकचे काम करणारा मजूर... गोदावरीच्या काठावरील एका पालामध्ये दोन लहानग्यांसह पुढे चाललेला संसार... अशा अनेक आव्हानांशी लढत "ती' पदवीपर्यंतचे शिक्षण घेते... तिथेच न थांबता दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर चक्क फौजदारही होते..! ही कहाणी आहे पद्मशीला तिरपुडे या सामान्यांतील असामान्य नारीची!

महाराष्ट्र पोलिस अकादमीत आज झालेला फौजदारांच्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा या वीरांगनेसाठी आयुष्यातील परमोच्च आनंदाचा नि अभिमानाचा ठेवा ठरला. हा क्षण अनुभवण्यासाठी तिने केलेल्या प्रचंड संघर्षाची ही सुखद परिणती होती. राज्याच्या पोलिस दलास आजवर उपनिरीक्षक दर्जाचे 24 हजार अधिकारी देणाऱ्या महाराष्ट्र पोलिस अकादमीची यंदाची 108 वी तुकडी अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण ठरली. या तुकडीने सर्वाधिक 1,544 फौजदार दिले आणि त्यात चक्क 120 महिला पोलिस अधिकारी आहेत. त्यापैकीच एक असलेल्या पद्मशीलाचा दहा वर्षांतील प्रवास अनेकांना प्रेरणादायी आहे.

मूळच्या भंडारा जिल्ह्यातील असलेल्या पद्मशीला रमेश तिरपुडे हिचा त्याच जिल्ह्यातील वाळकेश्‍वरजवळच्या पहेला गावातील पवन तुकाराम खोब्रागडे याच्याशी दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता.

पोलिस अधिकारी व्हायचं स्वप्न पूर्ण झालं, याचा आनंद आहे. पण, त्याचं सगळं श्रेय पतीलाच आहे. त्यांनी खूप सोसलंय. हमाली केली. सामोसे विकले. मजुरी केली. त्यांनी घेतलेले सगळे कष्ट आज कामाला आले.
- पद्मशीला तिरपुडे, (पोलिस उपनिरीक्षक)

एक दिवस असा आला, की घरात दाणाही नव्हता. उसने आणलेले पन्नास रुपये बाजारात हरवले. दोघंही खूप रडलो नि तसेच उपाशी झोपलो. मनाशी एकच निश्‍चय केला, पद्मशीलाला शिकवायचं अन्‌ मोठी अधिकारी करायचं. त्यासाठी खूप कष्ट केले. पण, आज तिला फौजदार झाल्याचं बघून सगळा शीण गेला आहे.
- पवन खोब्रागडे (पद्मशीलाचा पती)नाशिक - घरात अठरा विश्‍व दारिद्य्र... पती पेव्हर ब्लॉकचे काम करणारा मजूर... गोदावरीच्या काठावरील एका पालामध्ये दोन लहानग्यांसह पुढे चाललेला संसार... अशा अनेक आव्हानांशी लढत "ती' पदवीपर्यंतचे शिक्षण घेते... तिथेच न थांबता दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर चक्क फौजदारही होते..! ही कहाणी आहे पद्मशीला तिरपुडे या सामान्यांतील असामान्य नारीची!

महाराष्ट्र पोलिस अकादमीत आज झालेला फौजदारांच्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा या वीरांगनेसाठी आयुष्यातील परमोच्च आनंदाचा नि अभिमानाचा ठेवा ठरला. हा क्षण अनुभवण्यासाठी तिने केलेल्या प्रचंड संघर्षाची ही सुखद परिणती होती. राज्याच्या पोलिस दलास आजवर उपनिरीक्षक दर्जाचे 24 हजार अधिकारी देणाऱ्या महाराष्ट्र पोलिस अकादमीची यंदाची 108 वी तुकडी अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण ठरली. या तुकडीने सर्वाधिक 1,544 फौजदार दिले आणि त्यात चक्क 120 महिला पोलिस अधिकारी आहेत. त्यापैकीच एक असलेल्या पद्मशीलाचा दहा वर्षांतील प्रवास अनेकांना प्रेरणादायी आहे.

मूळच्या भंडारा जिल्ह्यातील असलेल्या पद्मशीला रमेश तिरपुडे हिचा त्याच जिल्ह्यातील वाळकेश्‍वरजवळच्या पहेला गावातील पवन तुकाराम खोब्रागडे याच्याशी दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता.

पोलिस अधिकारी व्हायचं स्वप्न पूर्ण झालं, याचा आनंद आहे. पण, त्याचं सगळं श्रेय पतीलाच आहे. त्यांनी खूप सोसलंय. हमाली केली. सामोसे विकले. मजुरी केली. त्यांनी घेतलेले सगळे कष्ट आज कामाला आले.
- पद्मशीला तिरपुडे, (पोलिस उपनिरीक्षक)

एक दिवस असा आला, की घरात दाणाही नव्हता. उसने आणलेले पन्नास रुपये बाजारात हरवले. दोघंही खूप रडलो नि तसेच उपाशी झोपलो. मनाशी एकच निश्‍चय केला, पद्मशीलाला शिकवायचं अन्‌ मोठी अधिकारी करायचं. त्यासाठी खूप कष्ट केले. पण, आज तिला फौजदार झाल्याचं बघून सगळा शीण गेला आहे.
- पवन खोब्रागडे (पद्मशीलाचा पती)
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5477276778360155992&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE+%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20130928&Provider=-+%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3+%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80+%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8B+%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80+%E0%A4%AB%E0%A5%8C%E0%A4%9C%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0

Tuesday, September 17, 2013

लाविलेस तू भस्म कपाळा !!

काय तुला उपयोग आंधळ्या, दीप असून उशासी
रुद्राक्षांच्या गळ्यात माळा, लाविलेस तू भस्म कपाळा
कधी न घेऊन नांगर हाती, पिकविलेस मातीतून मोती
हाय अभाग्या भगवे नेसून घर सन्यासून जाशी
कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी
हृदयातील भगवंत राहीला, हृदयातून उपाशी

Wednesday, September 11, 2013

स्वतंत्र भारताचे आम्ही स्वैराचारी नागरिक .........


गरोदर स्त्रीच्या गर्भावर विपरीत परिणाम, अकाली प्रसूती , लहान मुलांची वाढ खुंटणे, डोके दुखणे, चिडचिड हे मोठ्या आवाजाचे दुष्परिणाम आहेत...……………… Raj Asrondkar>>>>>


……………. स्वतंत्र भारताचे आम्ही स्वैराचारी नागरिक असल्या मुळे कर्णकर्कश्श मोठ्या आवाजात सण साजरे करणे फटाके फोडणे ध्वनी , वायू प्रदुर्षण  करणे हा आमच्या बापजाद्याचा धर्म सिध्द हक्क आहे . आमच्या हक्कावर कोणी बंधने घालू पाहिलं तर त्यास गडावरून लोटून देवूत …। किंवा हत्तीच्या पाया खाली तुडवून ठार करुत ……. ज्याना हा प्रकार आवडत नाही त्यांनी सणा सुदीच्या दिवसात चक्क जंगलात जावून राहावे हा  नम्र आदेश ……आम्ही विनंती करत नाही तर फक्त आदॆश च देतो … आता समजल ना ………




मेडिकल टुरिझम चे ढोल ……. सरकारी बाबूंवर परदेशातही 'उपचार'.


मेडिकल टुरिझम  चे ढोल ……. सरकारी बाबूंवर परदेशातही 'उपचार'....विमानाचे भाडे, रुग्णवाहिकेचा खर्चही मिळणार

इंडिया  जागतिक आरोग्य सेवा देणारा जगातील महासत्ता झाला आहे . इंडिया मध्ये मेडिकल टुरिझम उद्योग वेगाने वाढतो आहे . अनेक देशाचे बिमार पेशंट इंडिया मध्ये येवून येथील वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्यास उत्सुक असतात . या मुळे इंडिया ला परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळते . या मेडिकल टुरिझम मुळे विमान कंपन्या पासून ते लहान आटो चालविणाऱ्या चालकास खूप फायदा होतो . असे ढोल इंडिया सरकार रात्रंदिवस बडवत असते …….
पण फक्त या सरकारच्या पक्ष प्रमुखांची तब्बेत मात्र  हि आरोग्य व्यवस्था चांगली राखू शकत नाही . या बिच्च्यारया पक्ष प्रमुखाला स्वतःह वर उपचार करून घेण्या करता परदेशात जावे लागते . लाखो करोडो डॉलर या करता खर्च करावे लागतात ……. या रहस्यमय बिमारी साठी परदेशात वारंवार चक्करा माराव्या लागतात . ही  बिमारी इतकी गुप्त आहे की  ती कोणती आहे??  हे इंडिया मिडीया अजून शोधू शकला नाही .  तर इंडिया चे डॉक्टर तर दूरच राहिले .
आता तर या पक्ष अध्यक्षान बरोबर इंडिया च्या भ्रष्ट्र , बेईमान  नौकरशाहीला खावून खावून बिमार झाल्या वर झालेल्या  स्वतः च्या बिमारीवर सरकारच्या  पैश्या ने इलाज करता येणार आहे . विमानाचे भाडे, रुग्णवाहिकेचा खर्चही मिळणार

नवी दिल्ली- देशातील सरकारी बाबू आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबीयांवरील परदेशात गुंतागुंतीच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च सरकार करणार आहे. नव्या नियमांनुसार अधिकाऱ्यांना उपचारांसाठी परदेशी जाण्यासाठी विमानाचे प्रवासभाडेही सरकारकडून देण्यात येणार आहे. अर्थव्यवस्था संकटात असतानाही सरकारने अधिकाऱ्यांच्या आरोग्यासाठी हा निर्णय घेतला आहे.. सर्व वर्तमान पत्रात या बातम्या झळकल्या पण कोणास हि यास विरोध करावा वाटला नाही . नागरिकांनी घाम गाळून कमावलेल्या पैश्या वर भरलेल्या  विविध करांचा असा दुरुपयोग करण्याचा या भ्रष्ट्र राजकारण्याना नौकर शाहीला कोणी अधिकार दिला . हेच जर परदेशात बिमारी इलाज साठी जात असतील तर इंडिया टुरिझम शायनिंग चे ढोल बडविले जात आहेत त्याचे काय????  हा सगळा बनाव आहे असेच म्हणावे लागेल . आणि आज या बदमाशी ला जबाब विचारणारा कोणी माई चा लाल सुद्धा नाही . आणि मिडीया चे पत्रकार संपादक आधीच या लुटारूंचे, दरवडेखोरां चे साथीदार झालेले आहेत .

http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4736369675042225089&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20130910&Provider=-%20%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF&NewsTitle=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A5%80%20%27%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%27  

Wednesday, September 4, 2013

मट्टी से नमी नही जाती !!

मैने अपनी माँ से पूछा ,
 जिनकी मायें मर जाती हैं उन के लिए कौन दुवा करता है !!
मेरी माँ ने कहां ,
बेटा दरिया अगर खुश्क भी हो जाये तो मट्टी से
नमी नही जाती !!

Tuesday, September 3, 2013

Ek tera saath hamko do jahaan se pyaara hai .

Ek tera saath hamko do jahaan se pyaara hai .


Thy Name is I Love !!!!!!

 


Friday, August 30, 2013

फटकळ हा सर्व तमाशा पहात गातल्या गालात हसत.........

........नमस्कार गृहमंत्री साहेब … मी फटकळ बोलतो …. अरे या नंबरवर कश्याला फोन केला । माझी कांही इज्जत आहे कि नाही .… माफ करा साहेब पण माझे कामच खूप अर्जंट आहे …। मला हार्ट ची सर्जरी करायचा  डॉक ने सल्ला दिला . आजकाल कडकी चालू आहे …। इतकी वर्षे आपल्या म्हणण्या प्रमाणे अनेक बॉम्ब हल्ले दहशदवादी हामले केले . तुम्ही निवडून याव म्हणून जीव धोक्यात घालून अंतकवाद करून समाजात दहशद बसविली , भांडणे लावली ….

हां गप बस जास्त बडबड करू नकोस … त्या बदल्यात करोडो रुपये मी तुला मोजले …तसेच पोलिसां पासून तुझे संरक्षण केले हे विसरला का गद्दारा …. मायबाप माफी असावी . सर्जरीचा खर्च मला झेपणारा नाही …कृपा करून कांही व्यवस्था करा …… हां एक काम कर पोलिस तुला अटक करण्यास येतील तेंव्हा थोडाफार धिंगाणा करून अटक करून घे …. लवकरच सरकारी खर्चाने तुझ्या वर सर्जरी केली जाईल . तुरुंगातील तुझ्या सारख्या आरोपीला खास खाना दिला जातो तो खाल्ला कि तुझी तब्बेत हि चांगली सुधारेल …। लवकरच निवडणुका आहेत तुला फार काम करायचे आहे …। बर ठेव आता …. पोलिस २ ४ घंट्या च्या आत तुला अटक करतील ……।

दुसऱ्याच दिवशी TV चेनल वर ब्रेकिंग न्यूज झळकू लागल्या …. कुप्रसिद्ध अंतक वादी २५ बोंब स्फोट घडवून आणणारा क्रूरकर्मा गेल्या १० वर्षा वर्ष पासून पोलिसाना हुलकावणी देणारया फटकळ यास पोलिसांनी देशाच्या सीमेवर शिताफीने अटक केली ……. तेंव्हा तो देश सोडून जाण्याच्या तयारीत होता . पोलिसांनी अत्यंत चातुर्याने धाडसीपणे त्यास कशी अटक केली याची रसभरीत वर्णन पोलिस प्रमुख करत होते …. TV प्रेक्षकाना मात्र फटकळ हा सर्व तमाशा पहात गातल्या गालात हसत असल्याचा भास होत होता. तर गृहमंत्री  AIIMS फोन लावून VVIP च्या हार्ट सर्जरी करण्याची तयारी करण्याची व्यवस्था करण्यास तयारी करण्यास सांगत होते .